शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मातीच्या दिव्यांना मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 01:32 IST

दीपोत्सवात सर्वाधिक महत्त्व पणत्या आणि विविध आकारांतील आकर्षक दिव्यांना असल्याने यंदाही बाजारात विविध प्रकारचे दिवे, पणत्या पहायला मिळत आहेत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मातीच्या दिव्यांना मागणी वाढली असून, यात वेगळे आकार, लहान-मोठ्या पणत्या, प्राण्यांची चित्र, धनलक्ष्मी यांसारखे पर्याय आहेत.

नाशिक : दीपोत्सवात सर्वाधिक महत्त्व पणत्या आणि विविध आकारांतील आकर्षक दिव्यांना असल्याने यंदाही बाजारात विविध प्रकारचे दिवे, पणत्या पहायला मिळत आहेत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मातीच्या दिव्यांना मागणी वाढली असून, यात वेगळे आकार, लहान-मोठ्या पणत्या, प्राण्यांची चित्र, धनलक्ष्मी यांसारखे पर्याय आहेत.  दिवाळी हा दिव्यांचा उत्सव असल्याने त्याला दीपोत्सव असे म्हटले जाते. यात आकाशकंदिलानंतर येतात त्या पणत्या आणि दिवे. या दिवाळीत नाशिकच्या बाजारामध्ये मातीच्या साध्या पणत्यांबरोबरच पणत्यांची थाळ, दिव्यांची माळ, मातीची समई, हत्तीवर दिवा घेऊन बसलेली लक्ष्मी, मातीचे झुंबर यांसारखे प्रकार पहायला मिळतात. यांच्या किमती साधारण १५ रुपये डझनपासून सुरू होऊन हजार रुपयांपर्यंत आहेत. ज्या ठिकाणी मातीच्या पणत्या मिळतात, त्याच ठिकाणी हे दिवेदेखील उपलब्ध आहेत. अनेक घरांमध्ये रांगोळीबरोबर ठेवण्यासाठी दिवे वापरले जातात. म्हणून या दिव्यांवर विशेष सजावट केलेली पहायला मिळते. कुंदन, मोती यांचा वापर करून पणत्या आणि मोठ्या दिव्यांवर सजावट केलेली आहे. सजावटीप्रमाणेच किमतीदेखील वाढलेल्या दिसतात.याशिवाय तेल बचत करणारे, तसेच तेलाच्या डागांपासून वाचू पाहणाऱ्यांसाठी फ्लोटिंग कँडलचा पर्याय आहे. दिव्यांसाठी नाशिकची मुख्य बाजारपेठ म्हणजेच रविवार कारंजा, मेनरोड याशिवाय गंगापूरनाक्यावरील सिग्नलवरदेखील दुकाने पहायला मिळतात. दिवाळीनिमित्त बाजारात आलेल्या आकर्षक दिव्यांची खरेदी करताना महिला. यावर्षी सजविलेल्या पणत्यांना मागणी. यावर्षी पर्यावरणपूरक वस्तूंना मागणी वाढलेली दिसते आहे. मातीच्या पणत्या असल्या तरी त्यांना सुरेख सजावट केलेली असल्यास त्याला मागणी आहे. यावर कुंदन वर्क किंवा मोती वर्क असल्यास जास्त पसंती मिळत आहे.

टॅग्स :DiwaliदिवाळीNashikनाशिक