शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

बारावी बोर्डाची परीक्षा शाखानिहाय घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:13 IST

महाराष्ट्र राज्य भारतात एक नंबरचे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असून २०२० मधला कोरोना विषाणूपेक्षा २०२१ चा हा विषाणू भयानक आहे. ...

महाराष्ट्र राज्य भारतात एक नंबरचे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असून २०२० मधला कोरोना विषाणूपेक्षा २०२१ चा हा विषाणू भयानक आहे. दुसऱ्या लाटेमध्ये विषाणूचा प्रसार फार झपाट्याने होत आहे. अनेकांना याची लागण झाली असून कुठेही बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळत नाही. सर्व दवाखाने फुल्ल झाले आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आलेख वाढतच आहे. महाराष्ट्र शासनाला दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. तसेच १३ विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय झाला. बारावीची परीक्षा घेण्याचे शिक्षण मंत्रालयाने जाहीर केले. परीक्षा देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी तसेच इंजिनिअरिंग मेडिकल व इतर कोर्सेससाठी गुणवत्ता सिद्ध केल्याशिवाय त्याची सिद्धता असणे गरजेचे आहे. पण ही परीक्षा शाखानिहाय घ्यावी. म्हणजे कला, वाणिज्य व विज्ञान या विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या दिवशी परीक्षा घ्यावी, अशी मागणी जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रा रवींद्र मोरे, सचिव प्रा. अनिल महाजन यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

आरोग्य संघटनेच्या मतानुसार अजून दोन-तीन महिने कोरोनाचा प्रवास राहू शकतो. शासन बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेणार आहे. दहावी व विद्यापीठाच्या परीक्षा रद्द केल्या. तसेच बारावीची परीक्षा घेताना विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची एक दिवस वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांची एक दिवस कला शाखेच्या विद्यार्थ्यांची एक दिवस असे पेपर घ्यावे. प्रश्नपत्रिकेचा संच एबीसी संच देऊन परीक्षा घ्यावी जेणेकरून गोपनीयता राहील. कोरोनाचा संसर्ग होणार नाही. कारण वरिष्ठ महाविद्यालयांना जोडून असणारे कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कमीत कमी सहाशे ते जास्तीत जास्त पंधराशे विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ आहेत. एकाच दिवशी ही परीक्षा होणार विद्यार्थी एकाच वेळेस एकाच दिवशी परीक्षेस आल्याने कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता आहे. सुपरव्हिजन करताना काही शिक्षक बाधित मिळून आल्यास प्रश्न निर्माण होईल. ज्या त्या शाळेतच परीक्षा घ्यायचे जरी खरे आहे; पण काही कनिष्ठ महाविद्यालयात हजारो विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले आहेत तर त्या ठिकाणांची परीक्षा कशी घ्यायची, असा प्रश्न आहे. जर शाखांनिहाय परीक्षा घेतली तर तर ती संख्या कमी येईल वर्गखोल्या कमी राहतील त्याचप्रमाणे सुपरव्हिजन ला शिक्षक मिळतील. परीक्षा सुरळीत पार पडेल. जेणेकरून कोरोनावर आपल्याला प्रतिबंध करण्यास मदत होईल जरी विषय डबल असेल तरी संच एबीसी ठेवले तर येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांची गोपनीयतादेखील राहील व कोरोनाचा फैलाव होणार नाही राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. संजय शिंदे यांच्याकडे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे मालेगाव तालुकाध्यक्ष प्रा. रवींद्र मोरे सचिव प्रा. अनिल महाजन प्रा. दीपक सूर्यवंशी प्रा. रवींद्र शिरुडे प्रा. सुनील शिरोळे प्रा. हेमराज भामरे आदींनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.