शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

देवळा तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 13:08 IST

खर्डे : देवळा तालुका दुष्काळी जाहीर करण्यात यावा ,व गिरणा नदीचे आवर्तन पूर्वीसारखे पूर्ववत करण्यात यावे ,या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तहसीलदार दत्ता शेजूळ यांना देण्यात आले .

खर्डे : देवळा तालुका दुष्काळी जाहीर करण्यात यावा ,व गिरणा नदीचे आवर्तन पूर्वीसारखे पूर्ववत करण्यात यावे ,या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तहसीलदार दत्ता शेजूळ यांना देण्यात आले . निवेदनात म्हटले आहे की, चालू वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून , जिल्ह्यातील देवळा तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद तहसील दप्तरी आहे. आजही काही गावांना पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर असून ,पूर्व भागात टँकर द्वारे पाणी पुरवठा सुरु आहे . जनावरांच्या चार्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे . नोव्हेंबर ते जून या आठ महिने तालुक्यातील जनतेला दुष्काळाला सामोरे जावे लागणार असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले असून ,शासनाने संपूर्ण वीजिबल आणि कर्जमाफी देऊन मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा तसेच शालेय विदयार्थ्यांची फी माफ करण्यात यावी . तसेच जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे . गिरणा नदीचे आवर्तन पूर्वी ४० ते ४५ दिवसांचे होते . ते आता ६० दिवसांचे केले आहे . देवळा व सटाणा शहरांना गिरणा नदीवरून पाणी पुरवठा करण्यात येतो . गिरणा नदी काठावरील सर्व गावांच्या पाणी पुरवठा योजना गिरणा नदीवर असल्याने याचे रोटेशन पूर्वीसारखे पूर्ववत करण्यात यावे , असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पंडितराव निकम ,जिल्हा परिषद यशवंत शिरसाठ , पंचायत समिती सभापती कुसुमबाई अहिरे ,माजी सभापती उषा बच्छाव ,बाजार समिती माजी सभापती योगेश अहेर , संचालक जगदीश पवार ,राघो अहेर , गटनेते जितेंद्र अहेर , खुंटेवाडीचे सरपंच भाऊसाहेब पगार ,अतुल अहेर ,अमोल अहेर , संतोष उर्फ गोटू शिंदे , महेंद्र अहेर , चिंतामण अहेर , सचिन सूर्यवंशी ,रजत अहेर ,निखिल अहेर ,मुरलीधर अहेर ,सतीश कोठावदे , बाबाजी निकम ,शशी चितळे , सतीश सूर्यवंशीं ,डॉ कृष्णा आहेर , समाधान आहेर आदींच्या सहया आहेत .

टॅग्स :Nashikनाशिक