शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील रोहित्रांसाठी ५५ कोटींची शासनाकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 00:23 IST

नाशिक जिल्ह्यातील रोहित्रांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अतिरिक्त ५५ कोटी रुपयांची मागणी आपण शासनाकडे केली असून, लवकरच निधी प्राप्त होऊन जिल्ह्यातील विजेचे प्रश्न मार्गी लावले जातील, अशी घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

ठळक मुद्देछगन भुजबळ । कानळदे वीज उपकेंद्रातून वीजपुरवठा सुरू

लासलगाव : नाशिक जिल्ह्यातील रोहित्रांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अतिरिक्त ५५ कोटी रुपयांची मागणी आपण शासनाकडे केली असून, लवकरच निधी प्राप्त होऊन जिल्ह्यातील विजेचे प्रश्न मार्गी लावले जातील, अशी घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.निफाड तालुक्यातील कानळदे येथील ३३/११ केव्ही उपकेंद्राच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. भुजबळ म्हणाले, देवगाव सबस्टेशनमधून शिरवाडे, वाकद, कानळद, कोळगाव या गावांना वीजपुरवठा होत होता. मात्र वीजपुरवठा सुरळीत नसल्याने मोठ्या समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी उपकेंद्र निर्मितीसाठी मागणी होती. प्राधान्याने हे काम हाती घेण्यात आले. आता या उपकेंद्रामुळे वाकद, शिरवाडे, कोळगाव, कानळदे आदी गावांतील शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा होणार आहे.तसेच शिरवाडे, वाकद, कोळगाव, कानळदे हे तीनही फिडर स्वतंत्र करण्यात आले आहे. राज्यमार्ग सातवरील कानळदे, खेडले हा रस्ता जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आला असून, बजेटमध्ये तरतूद करून या रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावले जातील, असेही भुजबळ म्हणाले. राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेतून नाशिक जिल्ह्यात दीड लाख शेतकºयांना दीड हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. त्याचबरोबर दोन लाखांहून अधिक कर्ज असलेल्या शेतकºयांसाठी तसेच नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांसाठी लवकरच नवीन योजना तयार करून मदत देण्याचा निर्णय विचाराधीन असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता बिजपालसिंह जनवीर, अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, संजय खंडारे, रवींद्र आव्हाड, नीलेश चालीकवार, प्रांत डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार दीपक पाटील, सरपंच शांताराम जाधव, विनोद जोशी आदी उपस्थित होते.४.३५ कोटींचा खर्चसबस्टेशनच्या कामासाठी ४ कोटी ३५ लाख रुपये खर्च करण्यात आला असून, या केंद्राच्या निर्मितीबरोबरच देवगाव येथे पाच एमव्हीएचे रूपांतर १० एमव्हीएमध्ये, तर ३३ केव्हीची ९ किमीची, तर ११ केव्हीची किमीच्या नवीन वाहिनी जोडण्यात आली.

टॅग्स :mahavitaranमहावितरणChagan Bhujbalछगन भुजबळ