शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
7
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
8
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
9
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
10
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
11
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
12
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
13
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
14
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
15
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
16
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
17
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
18
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
19
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
20
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  

कृषिविषयक योजनांना विलंबाचा ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:23 IST

नाशिक : शेती आणि शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेकविध योजना राबविल्या जातात; परंतु कृषिविषयक योजना वेळेत पूर्ण होत ...

नाशिक : शेती आणि शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेकविध योजना राबविल्या जातात; परंतु कृषिविषयक योजना वेळेत पूर्ण होत नसल्याने अनेकदा शासनाकडे निधी परत जाण्याची नामुष्की ओढावते. गावपातळीवर तर योजनांची माहिती कित्येकदा स्थानिक लोकप्रतिनिधींनादेखील दिली जात नाही. स्थानिकांचा सहभाग नसल्यानेही अंमलबजावणीत योजना फसण्याचे प्रकार घडत असल्याचे निरीक्षण नोंदवत खासदारांनी नाराजी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवन सभागृहात जिल्हाविकास समन्वय व सनियंत्रण (दीक्षा समिती) समितीची बैठक शुक्रवारी पार पडली. यावेळी खासदार हेमंत गोडसे, भारती पवार, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, प्रकल्प संचालक उज्ज्वला भावके, कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक संजीव पडवळ आदी उपस्थित होते. प्रारंभी कृषी अधीक्षक जीव पडवळ यांनी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री फसल विमा योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि कृषी यांत्रिकीकरण, परंपरागत कृषी विकास योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय खाद्यसुरक्षा कार्यान्वयन आणि मृदा स्वस्थ कार्ड या योजनांचा लेखाजोखा सादर केला.

दीक्षा समितीच्या मागील बैठकीत वेळेअभावी कृषी विभागाचा आढावा घेण्यात आला नव्हता. त्यासाठी शुक्रवारी बैठक घेण्यात आली. शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबाजवणी करणे गरजेचे आहे. कृषी विभागामार्फत प्रत्येक योजना गावपातळीपर्यंत पोहोचण्यासाठी लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची असते. मात्र त्यांनाच अनेकदा योजनांची माहिती दिली जात नाही किंवा सामावून घेतले जात नाही. वास्तविक गाव तसेच तालुकापातळीवरील सर्वच लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्त्वाचा आहे. यासाठी लोकप्रतिनिधींना कृषी योजना अंमलबजावणीच्या कामात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाविकास समन्वय व सनियंत्रण (दीक्षा समिती) समितीचे अध्यक्ष तथा खासदार हेमंत गोडसे यांनी केले. सायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी शेतकऱ्यांमध्ये विशेष जनजागृती करण्याचे निर्देश यावेळी खासदार डॉ. भारती पवार यांनी दिली.

बैठकीस राकेश वाणी, राजेंद्र निकम, के. आर. शिरसाठ, संजय सूर्यवंशी, गोकुळ वाघ, डी. जे. देवरे, के.पी. खैरनार, रवींद्र वाघ, संदीप वळवी, अरविंद पगारे, शीतलकुमार तुवर, बी.जी. पाटील, ए. एच. पगारे, विलास सोनवणे, के. के. नवले, बाळासाहेब व्यवहारे, सुधाकर एस. पवार, जे. आर. पाटील, विजय पाटील, अभिजित जमधडे, प्रशांत राहणे, एस. एस. देवरे आदी तालुकास्तरावरील कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

(फोटो:आर:०४आढावा बैठक)