शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

देवगाव परिसरात पावसाअभावी भात लावणीच्या कामांना खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 01:54 IST

देवगाव : पावसाचे माहेरघर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दक्षिण भागात पावसाने दडी मारल्याने भातासह नागलींच्या रोपांची लावणी खोळंबली आहे. रोपे तयार झाली असून पावसाअभावी लावणी करता येत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून देवगाव परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शेतीची कामे रखडली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला असून भात लावणी करण्यासाठी आवणांत चिखल नसल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.

देवगाव : पावसाचे माहेरघर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दक्षिण भागात पावसाने दडी मारल्याने भातासह नागलींच्या रोपांची लावणी खोळंबली आहे. रोपे तयार झाली असून पावसाअभावी लावणी करता येत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून देवगाव परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शेतीची कामे रखडली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला असून भात लावणी करण्यासाठी आवणांत चिखल नसल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. जुलै महिन्याच्या उत्तर्धात भात लावणी पूर्ण करण्याचा कल शेतकऱ्यांचा असतो. त्यानुसार याहीवर्षी शेतकऱ्यांनी आषाढी एकादशीला लावणी संपेल अशी तयारी केली होती. परंतू,पाऊस योग्यवेळी न पडल्याने नाईलाजाने शेतीची कामे थांबवावी लागली आहेत. पंधरा दिवसांपासून पावसाने माघार घेतल्यामुळे देवगाव परिसरातील भात, वरई नागलीची रोपे उन्हामूळे करपू लागली आहेत.विहिर, शेततळ्याच्या पाण्यावर केली भाताची लागवडदेवगावसह वावीहर्षे, टाकेदेवगाव, येल्याचीमेंट, श्रीघाट,चंद्राचीमेंट, आव्हाटे, डहाळेवाडी, टाकेहर्षे या भागात तुरळक पाऊस पडत असला तरी उन्हाच्या तडाख्यामुळे तो भातशेतीसाठी किंवा नागली वरईसाठी फायदेशीर नाही. त्यामुळे काही शेतकºयांनी विहीर, शेततळ्याच्या पाण्यावर भाताची लागवड केली़४पाऊस पडत नसल्याने देवगाव परिसरातील शेतकरी आजही भात, नागली,वरईला पूरक असलेल्या दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा असताना आतापर्यंत ५०० मिमीसुद्धा पाऊस पडला नाही. पुनर्वसू नक्षत्र संपले तरी या नक्षत्रात हवा असलेला पाऊस पडला नाही.दरवर्षी आषाढी एकादशीला लावणीची कामे जवळपास संपलेली असतात. परंतू,यावर्षी पावसाने दगा दिल्याने आवणांमध्ये चिखल नसल्याने लावणी रखडली आहे. आता जोरदार पाऊसाची आवश्यकता आहे.

-------------------------------- लक्ष्मण देहाडे, शेतकरी (बरड्याचीवाडी) टाकेहर्षे.त्र्यंबकेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भात,नागली व वरईचे पीक घेतले जाते. शेतकºयांनी महागडी बियाणे, खते,मजुरीचा खर्च, लागवडीचा खर्च करून या पिकांची लागवड केली आहे. भात,नागलींच्या रोपांची बर्यापैकी वाढ झाल्याने त्यांना जोरदार पावसाची अपेक्षा आहे. मात्र, पाऊस नसल्याने भात रोपांना खतेसुद्धा देत येत नसल्यामुळे देवगाव परिसरात शेतकºयांना खिरप हंगाम वाया जाण्याची भीती वाटत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक