शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

...तर राष्टÑवादाची व्याख्या चुकीची ठरते : सुभाष वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:30 IST

पुरोगामी विचार बाजूला करून केवळ सनातनी विचारधारेतून या देशात राष्टÑवादाची व्याख्या केली जात असेल तर ते दुर्दैवच म्हणावे लागेल.

नाशिक : पुरोगामी विचार बाजूला करून केवळ सनातनी विचारधारेतून या देशात राष्टÑवादाची व्याख्या केली जात असेल तर ते दुर्दैवच म्हणावे लागेल. देशात जेव्हा शेतकरी, शेतमजुरांसारखे घटक कष्ट उपसतात तेव्हा राष्टवाद सिद्ध होतो, असे प्रतिपादन समाजवादी अभ्यासक प्रा. सुभाष वारे यांनी  केले.डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे ६३वे पुष्प वारे यांनी ‘संवैधानिक राष्टÑवाद’ या विषयावर बुधवारी (दि.२०) गुंफले. औरंगाबादकर सभागृहात बोलताना ते यावेळी म्हणाले, भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्टÑामध्ये ‘राष्टÑवाद’ या शब्दाचा वापर चिथावणीसाठी होत असेल तर ही मोठी शोकांतिका आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्या पक्षाला जनतेने प्रचंड बहुमत मिळवून दिले. त्या सत्ताधाऱ्यांना आगामी निवडणुकीला सामोरे जाताना विकासाचा कोणताही मुद्दा नसावा, यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते असू शकेल? असा प्रश्नही वारे यांनी यावेळी उपस्थित केला.देशाच्या सीमांचे रक्षणासाठी सैन्यदल सक्षम असून राजकीय व्यवस्थेपासून ते लांब राहून आपले कर्तव्य बजावत आहेत; मात्र त्यांच्या धाडसी आणि शौर्यपूर्ण कामगिरीचेही भांडवल सत्ताधाऱ्यांकडून केले जाणे ही लाजिरवाणी बाब आहे. अन्नधान्याच्या बाबतीत भारत देश स्वयंपूर्ण आहे, तो केवळ शेतकरी अन् शेतमजुरांच्या जिवावर. मात्र या शेतकºयाला आज कोणते दिवस सत्ताधाऱ्यांनी बघायला लावले, ते वेगळे सांगायला नको, असेही वारे म्हणाले.

टॅग्स :Nashikनाशिक