शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

पाथरे भागात तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: July 12, 2014 00:30 IST

पाथरे भागात तीव्र पाणीटंचाई

सिन्नर : तालुक्याच्या पूर्वभागातील पाथरे परिसरातील वाड्या-वस्त्यांवर पावसाअभावी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावात प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, वाड्या-वस्त्या या योजनेपासून वंचित राहिल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.यंदा पावसाने प्रचंड ओढ दिल्याने खरिपाचा हंगाम हातचा जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी पाणीटंचाई तीव्र झाली आहे. शेतीच्या पाण्यासह पिण्याचे पाणी तसेच जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण केले असून, यापुढे काही दिवस पाऊस झाला नाही तर पाण्याची स्थिती खूपच बिकट होण्याची चिन्हे आहे. त्यामुळे आतापासूनच नियोजन करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून ११ गाव नळपाणीपुरवठा योजनेसाठी येथील गोदावरी उजव्या कालव्यालगत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे सध्यातरी गावात पाणीपुरवठा सुरळीत आहे. मात्र गावाच्या परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील रहिवाशांसाठी या योजनेचा काहीही लाभ झाला नाही. यापूर्वी विहिरींना पाणी असल्याने वाड्या-वस्त्यांवरील रहिवाशांना पाण्याच्या टंचाईच्या झळा जाणवत नव्हत्या. यंदा मात्र पाऊसच नसल्याने विहिरी व अन्य जलस्रोत ठणठणीत कोरडे पडले आहेत. परिणामी शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाथरेकरांना पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. या योजनेतून वाड्या-वस्त्यांवर पाणीपुरवठा करण्यासाठी या योजनेतून पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी वाड्या-वस्त्यांवरील रहिवाशांकडून केली जात आहे. (वार्ताहर)