शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

दररोज पाच वीज ग्राहकांच्या जोडण्या तोडण्याचे फर्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 01:54 IST

थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरण कंपनीने अधिक कठोर निर्णय घेत वीज ग्राहकांसह आपल्या कर्मचाऱ्यांनाही वेठीस धरले असून, तसे फर्मानच महावितरणने काढले आहे. दररोज किमान पाच थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याची सक्ती कर्मचाऱ्यांवर करण्यात आली आहे,

नाशिक : थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरण कंपनीने अधिक कठोर निर्णय घेत वीज ग्राहकांसह आपल्या कर्मचाऱ्यांनाही वेठीस धरले असून, तसे फर्मानच महावितरणने काढले आहे. दररोज किमान पाच थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याची सक्ती कर्मचाऱ्यांवर करण्यात आली आहे, तर वीजपुरवठा तोडण्याची कोणतीही लेखी नोटीस ग्राहकांना देण्यात येणार नसल्याची भूमिका घेतल्यामुळेही महावितरणचा हा निर्णय सुलतानी फतवा असल्याची टीका होऊ लागली आहे.सातत्याने विस्कळीत होणारा वीजपुरवठा आणि चुकीच्या वीज बिलांमुळे सोसावा लागणारा आर्थिक भुर्दंड यासारख्या प्राथमिक पातळीवरील अडचणींचे आजतागायत निवारण होऊ शकलेले नसताना थकीत वीज बिल वसुलीसाठी मात्र महावितरणकडून नेहमीच सक्तीची भूमिका घेतली जाते. यंदा तर महावितरणने कळसच गाठला आहे. ग्राहकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची कोणतीही संधी न देता थेट वीजजोडणी तोडण्याचा इशारा देण्यात आला आहे. थकबाकीदार असतानाही वेळेत वीज बिल भरले नसेल आणि वारंवार बिल भरण्याच्या सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असेल तर अशा ग्राहकांना पूर्व सूचना न देता वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याचे महावितरणे म्हटले आहे. विशेष म्हणजे वीजपुरवठा खंडित करताना वायरमनला दमदाटी, शिवीगाळ, हाणामारीचे प्रकार केले किंवा धमकी दिली तरी कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.थकबाकीदार ग्राहकांपैकी किमान पाच ग्राहकांची वीजजोडणी दररोज तोडण्याची सक्ती महावितरणच्या कर्मचाºयांना करण्यात आली आहे. थकबाकीदार ग्राहकांची यादी हातात आल्यानंतर कर्मचाºयाने संबंधीतील यादीतील पाच ग्राहक निवडून त्यांची वीजजोडणी खंडित करणे बंधनकारक केले आहे. तसे केले नाही तर कर्मचाºयांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहक हिताचे सर्व नियम मोडून ग्राहकांवर मनमानी करण्याचा हा प्रकार असल्याच्या संतप्त भावना ग्राहकांमध्ये उमटत आहेत.मागील महिन्यात शहर परिसरातील असंख्य ग्राहकांना जादा वीजबिल देण्यात आले होते. या ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्याऐवजी त्यांना अगोदर वीजबिल भरण्यास सांगण्यात आले. असंख्य ग्राहकांना यामुळे आर्थिक फटका बसला आहे. अशा त्रुटींबाबत महावितरण मात्र कोणतीही भूमिका घेण्यास तयार नाही. मात्र वीजबिल वसुलीसाठी तत्पर भूमिका घेतली जाते. महावितरणच्या या भूमिकेविषयी शहरात मोठी नाराजी निर्माण झाली आहे.ग्राहकविरोधी भूमिकामहावितरणकडून अशाप्रकारे वीज बिल वसुलीची सक्ती केली जात असेल तर हा सुलतानी फतवा म्हटला पाहिजे. वीज कायद्याच्या विरोधात हा निर्णय असून, यामुळे ग्राहकांच्या हक्कांची पायमल्ली होणार आहे. ग्राहकांना सात दिवसांची पूर्व सूचना देऊनच कारवाई केली जाते. याप्रकरणी वेळीच लक्ष घालून ग्राहकांचे होणारे नुकसान टाळले पाहिजे. संबंधित खात्याचे मंत्री यांनी लक्ष घातलेच पाहिजे. या प्रकरणावरून ग्राहक संघटनांना स्वस्थ बसता येणार नाही. या निर्णयास न्यायालयात आव्हान द्यावे लागेल.-प्रा. दिलीप फडके, ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ नेतेनियमानुसारच कारवाईथकीत वीजग्राहकांची जोडणी तोडणे हे अन्यायकारण नव्हे तर नियमित कारवाई आहे. ज्या थकीत वीजग्राहकांना एसएमएसद्वारे बिल भरण्याचे आवाहन केले जाते तीच नोटीस समजली जाते. आता पूर्वीसारखी नोटीस थेट दिली जात नाही. एसएमएसही ग्राह्य धरले जाते. त्यामुळे लिखित नोटीस दिलीच पाहिजे असे नाही. वीज बिल भरणे सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे कारवाई ही होणारच. अकार्यक्षम कर्मचाºयांनाही दंड केला जातो. नियमानुसारच वीजजोडणी तोडली जाते.-प्रवीण दरोली, अधीक्षक अभियंताकर्मचाºयांची नाराजीविशेष म्हणजे वीजकर्मचारी अशा प्रकारच्या धमकीवजा आदेशामुळे प्रचंड नाराज आहेत. रोजच वीजजोडणी तोडण्याच्या प्रकारामुळे वायरमनला फिल्डवर काम करताना नाहक तणावाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. दैनंदिन एकाच गावात काम करीत असताना दांडगाई करून कारवाई केली तर विसंवाद निर्माण होण्याची शक्यता कर्मचारी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :electricityवीजPower Shutdownभारनियमन