शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

दररोज पाच वीज ग्राहकांच्या जोडण्या तोडण्याचे फर्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 01:54 IST

थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरण कंपनीने अधिक कठोर निर्णय घेत वीज ग्राहकांसह आपल्या कर्मचाऱ्यांनाही वेठीस धरले असून, तसे फर्मानच महावितरणने काढले आहे. दररोज किमान पाच थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याची सक्ती कर्मचाऱ्यांवर करण्यात आली आहे,

नाशिक : थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरण कंपनीने अधिक कठोर निर्णय घेत वीज ग्राहकांसह आपल्या कर्मचाऱ्यांनाही वेठीस धरले असून, तसे फर्मानच महावितरणने काढले आहे. दररोज किमान पाच थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याची सक्ती कर्मचाऱ्यांवर करण्यात आली आहे, तर वीजपुरवठा तोडण्याची कोणतीही लेखी नोटीस ग्राहकांना देण्यात येणार नसल्याची भूमिका घेतल्यामुळेही महावितरणचा हा निर्णय सुलतानी फतवा असल्याची टीका होऊ लागली आहे.सातत्याने विस्कळीत होणारा वीजपुरवठा आणि चुकीच्या वीज बिलांमुळे सोसावा लागणारा आर्थिक भुर्दंड यासारख्या प्राथमिक पातळीवरील अडचणींचे आजतागायत निवारण होऊ शकलेले नसताना थकीत वीज बिल वसुलीसाठी मात्र महावितरणकडून नेहमीच सक्तीची भूमिका घेतली जाते. यंदा तर महावितरणने कळसच गाठला आहे. ग्राहकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची कोणतीही संधी न देता थेट वीजजोडणी तोडण्याचा इशारा देण्यात आला आहे. थकबाकीदार असतानाही वेळेत वीज बिल भरले नसेल आणि वारंवार बिल भरण्याच्या सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असेल तर अशा ग्राहकांना पूर्व सूचना न देता वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याचे महावितरणे म्हटले आहे. विशेष म्हणजे वीजपुरवठा खंडित करताना वायरमनला दमदाटी, शिवीगाळ, हाणामारीचे प्रकार केले किंवा धमकी दिली तरी कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.थकबाकीदार ग्राहकांपैकी किमान पाच ग्राहकांची वीजजोडणी दररोज तोडण्याची सक्ती महावितरणच्या कर्मचाºयांना करण्यात आली आहे. थकबाकीदार ग्राहकांची यादी हातात आल्यानंतर कर्मचाºयाने संबंधीतील यादीतील पाच ग्राहक निवडून त्यांची वीजजोडणी खंडित करणे बंधनकारक केले आहे. तसे केले नाही तर कर्मचाºयांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहक हिताचे सर्व नियम मोडून ग्राहकांवर मनमानी करण्याचा हा प्रकार असल्याच्या संतप्त भावना ग्राहकांमध्ये उमटत आहेत.मागील महिन्यात शहर परिसरातील असंख्य ग्राहकांना जादा वीजबिल देण्यात आले होते. या ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्याऐवजी त्यांना अगोदर वीजबिल भरण्यास सांगण्यात आले. असंख्य ग्राहकांना यामुळे आर्थिक फटका बसला आहे. अशा त्रुटींबाबत महावितरण मात्र कोणतीही भूमिका घेण्यास तयार नाही. मात्र वीजबिल वसुलीसाठी तत्पर भूमिका घेतली जाते. महावितरणच्या या भूमिकेविषयी शहरात मोठी नाराजी निर्माण झाली आहे.ग्राहकविरोधी भूमिकामहावितरणकडून अशाप्रकारे वीज बिल वसुलीची सक्ती केली जात असेल तर हा सुलतानी फतवा म्हटला पाहिजे. वीज कायद्याच्या विरोधात हा निर्णय असून, यामुळे ग्राहकांच्या हक्कांची पायमल्ली होणार आहे. ग्राहकांना सात दिवसांची पूर्व सूचना देऊनच कारवाई केली जाते. याप्रकरणी वेळीच लक्ष घालून ग्राहकांचे होणारे नुकसान टाळले पाहिजे. संबंधित खात्याचे मंत्री यांनी लक्ष घातलेच पाहिजे. या प्रकरणावरून ग्राहक संघटनांना स्वस्थ बसता येणार नाही. या निर्णयास न्यायालयात आव्हान द्यावे लागेल.-प्रा. दिलीप फडके, ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ नेतेनियमानुसारच कारवाईथकीत वीजग्राहकांची जोडणी तोडणे हे अन्यायकारण नव्हे तर नियमित कारवाई आहे. ज्या थकीत वीजग्राहकांना एसएमएसद्वारे बिल भरण्याचे आवाहन केले जाते तीच नोटीस समजली जाते. आता पूर्वीसारखी नोटीस थेट दिली जात नाही. एसएमएसही ग्राह्य धरले जाते. त्यामुळे लिखित नोटीस दिलीच पाहिजे असे नाही. वीज बिल भरणे सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे कारवाई ही होणारच. अकार्यक्षम कर्मचाºयांनाही दंड केला जातो. नियमानुसारच वीजजोडणी तोडली जाते.-प्रवीण दरोली, अधीक्षक अभियंताकर्मचाºयांची नाराजीविशेष म्हणजे वीजकर्मचारी अशा प्रकारच्या धमकीवजा आदेशामुळे प्रचंड नाराज आहेत. रोजच वीजजोडणी तोडण्याच्या प्रकारामुळे वायरमनला फिल्डवर काम करताना नाहक तणावाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. दैनंदिन एकाच गावात काम करीत असताना दांडगाई करून कारवाई केली तर विसंवाद निर्माण होण्याची शक्यता कर्मचारी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :electricityवीजPower Shutdownभारनियमन