शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

कमी पावसाने खतांच्या विक्रीत घट

By admin | Updated: October 8, 2015 23:31 IST

कमी पावसाने खतांच्या विक्रीत घट

नाशिक : यंदाच्या मोसमात पावसाने अपेक्षित हजेरी न लावल्याने बळीराजाने खतांच्या खरेदीकडेही पाठ फिरविल्याचे खत विक्रीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. खरीप हंगामासाठी १ लाख ८८ हजार ४२५ मेट्रिक टन खतांची उपलब्धता असताना प्रत्यक्षात १ लाख ५४ हजार ९६३ मेट्रिक टनच खतांची विक्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, येत्या रब्बी हंगामासाठी कृषी विभागाने २ लाख ३६ हजार मेट्रिक टन खतांची मागणी केलेली असताना प्रत्यक्षात जिल्ह्यासाठी २ लाख ११०० मेट्रिक टन खत आवंटन मंजूर झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आता त्यात या खरीप हंगामातील ३३ हजार ४६३ मेट्रिक टन शिल्लक खतांची भर पडणार असल्याने रब्बीसाठी मुबलक प्रमाणात खते उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत.जिल्ह्यात खरीप हंगामासाठी युरिया खताची १ लाख २० हजार मेट्रिक खतांची मागणी नोंदविण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात ७८ हजार २५० मेट्रिक टन खतांचा पुरवठा होऊन त्यातील ७३ हजार ८३८ मेट्रिक टन खतांची विक्री झाल्याचे व त्यातील ४४१३ मेट्रिक टन खते शिल्लक आहे. १०:२६:२६ या खतांची २२ हजार ५०० मेट्रिक टन खताची मागणी नोंदविण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात २४ हजार ९०० मेट्रिक टन खतांचा पुरवठा झाला. यात अमोनियम सल्फेटचा अपवाद वगळता सर्वच खते शिल्लक राहिल्याचे दिसून येते. एकूण खरीप हंगामात १ लाख ८८ हजार ४२५ मेट्रिक टन खत पुरवठा होऊन त्यातील १ लाख ५४ हजार ९६३ मेट्रिक टन खतांची विक्री होऊन ३३ हजार ४६३ मेट्रिक टन खतसाठा शिल्लक असून, आता हा खतसाठा रब्बी हंगामासाठी उपलब्ध राहणार आहे.(प्रतिनिधी)