शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

कांदा उत्पन्नात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 14:40 IST

मनोज बागुल, वटारबागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यात कांदा काढनीच्या कामांना वेग आला असून रखरखत्या उन्हात मजूर वर्ग व शेतकरी आपल्या चार महिन्याच्या कष्टाच लाल सोन काढण्यासाठी उन्हाच्या झळ अंगावर सोसताना परिसरात दिसत आहे. चालू वर्षी सततच्या हवामान बदलामुळे उत्पन्नात सरासरी ३० ते ४० टक्के घट झाली आहे.सध्या परिसरात तपमानात मोठी वाढ ...

मनोज बागुल, वटारबागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यात कांदा काढनीच्या कामांना वेग आला असून रखरखत्या उन्हात मजूर वर्ग व शेतकरी आपल्या चार महिन्याच्या कष्टाच लाल सोन काढण्यासाठी उन्हाच्या झळ अंगावर सोसताना परिसरात दिसत आहे. चालू वर्षी सततच्या हवामान बदलामुळे उत्पन्नात सरासरी ३० ते ४० टक्के घट झाली आहे.सध्या परिसरात तपमानात मोठी वाढ झाल्याने उन्हाचा पारा चाळिशीच्या आसपास गेल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.कडक उन्हाच्या झळा अंगावर लाही-लाही होत असतानाही बागलाण तालुक्यात कांदा काढणीच्या कामे चालू आहेत. रणरणत्या उन्हाचा चटका गेला दहा-बरा दिवसापासून चांगलाच जाणवत असून,रात्रीच्या वेळेस थंडी,दिवसा कडक उन्हाचा चटका या वातावरणातील उकाडा चांगलाच जाणवत आहे. वटार, डोंगरेज, चौंधाणे, कंधाने, विंचुरे आदी गावांच्या परिसरात सध्या उन्हाळी कांद्याची काढणी सुरु असून,चालू वर्षी नदी, नाले, विहिरी, कुपनलिका यांनी पाणी बर्यापैकी असल्यामुळे परिसरात चालू वर्षी कांद्याचे लागवड क्षेत्रात वाढ झाली होती तसेच चालू वर्षी कांद्यासाठी पोषक वातावरण नसल्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत सरासरी उत्पन्नात ३० ते ४० टक्के घट झाली आहे.एकीकडे नागरिकांना उन्हामुळे घराच्या बाहेर न निघण्याचे सागितले जातेय तर दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकरी व मजूर वर्ग उन्हाच्या झळा अंगावार सोसत कष्ट करताना दिसतोय. दुपारच्या वेळेस कडक उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत असून,तापलेली जमीन व त्यातून निघणार्या तप्त झळा शेतात काम करणार्या महिला व पुरु षाच्या अंगावर चांगलेच चटके देऊन जात आहेत.काढणीस आलेले कांदा पिक उन्हाच्या चटकक्याने भाजू न्हाये म्हणून शेतकरी कांद्याची पात व उसाच्यापाचटाचा वापर करीत असताना दिसत आहेत तर काही ठिकाणी शेतातून कांदा काढून लगेचच चाळीत भरण्यावर शेतकर्यांनी भर दिल्याचे चित्र दिसत आहे. उन्हाच्या चटक्याने शेतातील पिके हि पाणी कमी पडल्याने सुकताना दिसत आहेत,दिवसभर काम करताना स्वसंरक्षणासाठी अंग झाकून घ्यावे लागत आहे.म्हणून संरक्षणासाठी मजूर वर्ग टोप्या उपरण्याचा वापर करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. बागलाण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचे उत्पादक घेतले जाते.व कांदा हे पिक शेतकर्याच्या अर्थकारणात महतवाची भूमिका बजावणारे पिक असल्याने त्याच्या बाजारभावावर शेतकर्यांची आर्थिक गणतिे अवलबून असतात.कांदा रोप उपलब्ध करण्यापासून ते कांदा लागवड,खुरपणी, औषध फवारणी,काढणी ,भरणी आदीपासून ते काढणीपर्यंत मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांची भांडवली गुंतवणूक होते.त्यातच समाधानकारक बाजारभाव मिळाला नाही तर भांडवलही सुटत नसल्याची खंत शेतकर्यांनी व्यक्त केली.कांद्याला हमीभाव देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकर्याकडून केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक