शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

कांदा उत्पन्नात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 14:40 IST

मनोज बागुल, वटारबागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यात कांदा काढनीच्या कामांना वेग आला असून रखरखत्या उन्हात मजूर वर्ग व शेतकरी आपल्या चार महिन्याच्या कष्टाच लाल सोन काढण्यासाठी उन्हाच्या झळ अंगावर सोसताना परिसरात दिसत आहे. चालू वर्षी सततच्या हवामान बदलामुळे उत्पन्नात सरासरी ३० ते ४० टक्के घट झाली आहे.सध्या परिसरात तपमानात मोठी वाढ ...

मनोज बागुल, वटारबागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यात कांदा काढनीच्या कामांना वेग आला असून रखरखत्या उन्हात मजूर वर्ग व शेतकरी आपल्या चार महिन्याच्या कष्टाच लाल सोन काढण्यासाठी उन्हाच्या झळ अंगावर सोसताना परिसरात दिसत आहे. चालू वर्षी सततच्या हवामान बदलामुळे उत्पन्नात सरासरी ३० ते ४० टक्के घट झाली आहे.सध्या परिसरात तपमानात मोठी वाढ झाल्याने उन्हाचा पारा चाळिशीच्या आसपास गेल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.कडक उन्हाच्या झळा अंगावर लाही-लाही होत असतानाही बागलाण तालुक्यात कांदा काढणीच्या कामे चालू आहेत. रणरणत्या उन्हाचा चटका गेला दहा-बरा दिवसापासून चांगलाच जाणवत असून,रात्रीच्या वेळेस थंडी,दिवसा कडक उन्हाचा चटका या वातावरणातील उकाडा चांगलाच जाणवत आहे. वटार, डोंगरेज, चौंधाणे, कंधाने, विंचुरे आदी गावांच्या परिसरात सध्या उन्हाळी कांद्याची काढणी सुरु असून,चालू वर्षी नदी, नाले, विहिरी, कुपनलिका यांनी पाणी बर्यापैकी असल्यामुळे परिसरात चालू वर्षी कांद्याचे लागवड क्षेत्रात वाढ झाली होती तसेच चालू वर्षी कांद्यासाठी पोषक वातावरण नसल्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत सरासरी उत्पन्नात ३० ते ४० टक्के घट झाली आहे.एकीकडे नागरिकांना उन्हामुळे घराच्या बाहेर न निघण्याचे सागितले जातेय तर दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकरी व मजूर वर्ग उन्हाच्या झळा अंगावार सोसत कष्ट करताना दिसतोय. दुपारच्या वेळेस कडक उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत असून,तापलेली जमीन व त्यातून निघणार्या तप्त झळा शेतात काम करणार्या महिला व पुरु षाच्या अंगावर चांगलेच चटके देऊन जात आहेत.काढणीस आलेले कांदा पिक उन्हाच्या चटकक्याने भाजू न्हाये म्हणून शेतकरी कांद्याची पात व उसाच्यापाचटाचा वापर करीत असताना दिसत आहेत तर काही ठिकाणी शेतातून कांदा काढून लगेचच चाळीत भरण्यावर शेतकर्यांनी भर दिल्याचे चित्र दिसत आहे. उन्हाच्या चटक्याने शेतातील पिके हि पाणी कमी पडल्याने सुकताना दिसत आहेत,दिवसभर काम करताना स्वसंरक्षणासाठी अंग झाकून घ्यावे लागत आहे.म्हणून संरक्षणासाठी मजूर वर्ग टोप्या उपरण्याचा वापर करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. बागलाण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचे उत्पादक घेतले जाते.व कांदा हे पिक शेतकर्याच्या अर्थकारणात महतवाची भूमिका बजावणारे पिक असल्याने त्याच्या बाजारभावावर शेतकर्यांची आर्थिक गणतिे अवलबून असतात.कांदा रोप उपलब्ध करण्यापासून ते कांदा लागवड,खुरपणी, औषध फवारणी,काढणी ,भरणी आदीपासून ते काढणीपर्यंत मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांची भांडवली गुंतवणूक होते.त्यातच समाधानकारक बाजारभाव मिळाला नाही तर भांडवलही सुटत नसल्याची खंत शेतकर्यांनी व्यक्त केली.कांद्याला हमीभाव देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकर्याकडून केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक