शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

निर्यातमूल्य हटविल्याने कांदा वधारला विंचूर उपबाजारात कांदा भावात सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 01:36 IST

नाशिक: केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातमूल्य पूर्णपणे हटविल्यानंतर नाशिक जिल्ह्यात शनिवारी झालेल्या लिलावांमध्ये कांद्याचे भाव वाढले असून ते दोन हजार रुपयांवर पोहोचले आहेत.

ठळक मुद्देबाजारभावामध्ये वाढशेतकºयांमध्ये समाधान व्यक्त

नाशिक: केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातमूल्य पूर्णपणे हटविल्यानंतर नाशिक जिल्ह्यात शनिवारी झालेल्या लिलावांमध्ये कांद्याचे भाव वाढले असून ते दोन हजार रुपयांवर पोहोचले आहेत. कांद्याच्या भावात वाढ झाल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे. लासलगाव बाजार समिती अंतर्गत विंचूर उपबाजार आवारात शनिवारी झालेल्या लिलावात बाजारभाव कमाल २०६०, किमान १२०० तर सरासरी १८०० रु पये प्रतिक्विंटल राहिले. आवक वाढूनही निर्यात मूल्य हटविल्याने बाजारभावामध्ये वाढ झाली आहे. पिंपळगाव बाजार समितीमध्ये शनिवार कांद्याच्या लिलावात बाजारभाव कमीतकमी १००० तर जास्तीतजास्त २१११ असे राहिले. याचाच अर्थ बाजारभावात आधीच्या दिवसापेक्षा चारशे ते पाचशे रुपयांची भरघोस वाढ झाली आहे . कांद्यावरील निर्यातमूल्य पूर्णपणे हटविल्याने लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारात शनिवारी झालेल्या लिलावात उच्च प्रतिच्या कांद्याला २०६० रुपये प्रतिक्वींटल भाव मिळाला. मागील आठवड्यापासून वेगाने कोसळत असलेल्या कांद्याच्या भावात वाढ झाली असून शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. विंचूर उपबाजार आवारात ३७०० असा उच्चांकी दर गाठलेल्या कांद्याचे दर गत आठवड्यापासून खाली येत होते. त्यामुळे निर्यातमूल्य हटवण्याच्या मागणीने जोर धरला होता. शुक्रवारी कांदा निर्यातमूल्य तडकाफडकी पूर्णत हटविण्याचा निर्णय वाणीज्य मंत्रालयाने जाहीर केल्याने शनिवारी येथील उपबाजार आवारात आवक वाढुन कांदा दरात ५५० रुपयांनी भाव वाढले. निर्यातमूल्य शुन्यावर आल्याने चीन, पाकिस्तान, श्रीलंका या देशांबरोबर स्पर्धा करता येणार असून, बाजारभाव स्थिर राहण्यास मदत होणार असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात आले. शनिवारी विंचूर उपबाजार आवारात दोन सत्रात लिलाव झाले. उपबाजार आवारात ३७४ नगांची (वाहनांची) आवक होऊन बाजारभाव कमाल २०६०, किमान १२०० तर सरासरी १८०० रुपये प्रतिक्विंटल राहिले.