शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

येवला तालुक्यात पीक विमाधारक शेतकऱ्यांच्या संख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव नेऊर : नैसर्गिक आपत्ती आल्यास शेती पिकासाठी केलेला खर्च पीक विम्यातून भरून निघेल या आशेतून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव नेऊर : नैसर्गिक आपत्ती आल्यास शेती पिकासाठी केलेला खर्च पीक विम्यातून भरून निघेल या आशेतून शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा काढत असतो; पण पीक विमा काढूनही त्याचा मोबदला मिळत नसेल तर पीक विमा काढायचा कशासाठी, अशी शेतकऱ्यांची धारणा झाल्याने दरवर्षी हजारो शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा काढण्याकडे पाठ फिरवत आहेत. यावर्षी शासनाने दिलेल्या मुदतीत येवला तालुक्यात फक्त ५२४१ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

सन २०१९ ला २२ हजार शेतकऱ्यांनी तर २०२० ला १४ हजार पाच शेतकऱ्यांनी आणि २०२१ ला फक्त ५२४१ शेतकऱ्यांनी विमा उतरविल्याची माहिती समोर आली आहे. दोन वर्षांपासून परतीचा पाऊस पडून पिकाचे नुकसान होत आहे. दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी काढलेल्या पीक विम्याचे पैसे सरसकट शेतकऱ्यांना मिळाले होते; पण मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांनी पिकाचा काढलेला विमा नुकसान होऊनही मात्र मंजूर न नसल्याने या वर्षी शेतकऱ्यांनी खरिपाचा पीक विमा भरण्याकडे पाठ फिरविल्याचे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. खरिपाच्या पेरणी करता शेतकरी कर्ज काढून, उसनवारीने किंवा आपले दागिने गहाण ठेवून शेतात खरिपाची पेरणी करीत असतो व उरलेल्या पैशातून पिकाचा विमा भरत असतो. त्यातच कधी काळी पिके जोमात असताना पाऊस दांडी मारतो तर कधी हातातोंडाशी आलेला घास अति पावसाने हिरावून घेतला जातो. पिकाचा काढलेल्या विमा मंजूर होईल व झालेले नुकसान भरून निघेल, अशी आशा शेतकऱ्याला असते.

इन्फो...

प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकरी संख्या

वर्ष शेतकरी संख्या

२०१९ २२०००

२०२० १४००५

२०२१ ५२४१

कोट...

मागील वर्षी चांगल्याप्रकारे पिके आल्यामुळे नुकसान कमी झाले व मोजक्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळाला. दरवर्षी पीक विमा काढला म्हणजे नुकसान भरपाई मिळतेच, अशी शेतकऱ्यांची धारणा झाल्यामुळे मागील वर्षी पिके चांगली आल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. त्यामुळे यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमाकडे पाठ फिरवली. पूर्वी कृषी कार्यालयाशी विमा केंद्र संलग्न होते; परंतु आता स्वतंत्र विमा केंद्र कार्यालय झाल्याने त्यामुळे त्वरित शेतकऱ्यांना झालेले नुकसान कळवता येणार आहे.

- कारभारी नवले, कृषी अधिकारी येवला

फोयो - २७ जळगाव नेऊर १

270821\27nsk_30_27082021_13.jpg

पिकाचे झालेले नुकसान