शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने ओढ दिल्याने भाताच्या उत्पन्नात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 15:14 IST

घोटी : आरंभीच्या काळात समाधानकारक झालेल्या पावसाने मात्र ऐन धान्यावर पीक आलेले असताना दडी मारल्याने गरी जातीचे भात जळण्याच्या मार्गावर आहे.दरम्यान कमी पावसात उत्पन्न येणा्या हळी जातीचे भात कापणीच्या कामाला वेग आला असून या भाताला बाजारपेठेत मातीमोल भाव मिळत असल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असून आर्थिक संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देसाधारणत: तीन महिन्यात हे पीक येते तसेच या पिकाला पाण्याची अधिक गरज असते.मात्र पावसाच्या भरवशावर लावलेल्या या भाताला पावसाने दगा दिल्याने ही पिके वाचविण्यासाठी शेतकº्यांची केविलवाणी धडपड तालुक्यात पाहण्यास मिळत आहे.

घोटी : आरंभीच्या काळात समाधानकारक झालेल्या पावसाने मात्र ऐन धान्यावर पीक आलेले असताना दडी मारल्याने गरी जातीचे भात जळण्याच्या मार्गावर आहे.दरम्यान कमी पावसात उत्पन्न येणा्या हळी जातीचे भात कापणीच्या कामाला वेग आला असून या भाताला बाजारपेठेत मातीमोल भाव मिळत असल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असून आर्थिक संकटात सापडला आहे.पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाº्या इगतपुरी तालुक्याच्या काही भागात आरंभीच्या काळात समाधानकारक पाऊस झाला या पावसामुळे तालुक्याच्या धरणसाठ्यात अल्पावधीतच लक्षणीय वाढ होऊन धरणे भरली मात्र नंतरच्या काळात पावसाने सातत्याने ओढ दिली.यामुळे ऐन पिकावर पावसाची गरज असताना पावसाने ओढ दिल्याने उन्हाच्या तिव्रतेमुळे हातातोंडाशी आलेले भाताचे पीक शेतकº्यांच्या डोळ्यादेखत जळून जात आहे.दरम्यान पावसाने ओढ दिल्याने भाताच्या उत्पन्नांत प्रचंड घट झाल्याचे चित्र तालुक्यात पाहण्यास मिळत आहे.यामुळे तालुक्यातील शेतकरी दिवाळी पूर्वीच आर्थिक संकटात सापडला आहे.पिके वाचिवण्यासाठी केविलवाणी धडपडदरम्यान तालुक्यात सर्वाधिक गरी जातीचे भाताची लागवड केली जाते.हे पीक उत्पनास अधिक असल्याने ही पिके घेण्याकडे शेतकऱ्याचा कल अधिक आहे.या पिकांना जगविण्यासाठी शेतकºयांच्या सर्व कुटुंबाला रात्रीचा दिवस करून जवळच्या नदी,नाले,बंधारा,धरण आणि विहिरीतून पाणी दयावे लागत आहे.पावसाच्या आकडेवारीत फरकदरम्यान इगतपुरी तालुक्यात सहा ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र असल्याने सहा ही ठिकाणी पावसाच्या आकडेवारीत तफावत असते.तालुक्याच्या घाट माथ्यावर असणाº्या इगतपुरी शहर परिसरात सर्वाधिक पाऊस पडतो तर पूर्व भागात पावसाची आकडेवारी निम्म्याहून कमी असते.असे असताना शहरातील आकडेवारी शासन गेली अनेक वर्षांपासून गृहीत धरीत असल्याने तालुक्यात दुष्काळ जाहीर होत नसे.यावर्षीपासून पावसाची सरासरी काढल्याने शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे.पंचनामे करण्याची मागणीदरम्यान तालुक्यात शेवटच्या टप्प्यात पावसाने ओढ दिल्याने भात पिके जळून जाण्याच्या मार्गावर असल्याने शासनाने या पिकाचे तात्काळ पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकº्यांना भरपाई दयावी अशी मागणी तालुक्यातील शेतकº्यांनी केली आहे.