शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने ओढ दिल्याने भाताच्या उत्पन्नात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 15:14 IST

घोटी : आरंभीच्या काळात समाधानकारक झालेल्या पावसाने मात्र ऐन धान्यावर पीक आलेले असताना दडी मारल्याने गरी जातीचे भात जळण्याच्या मार्गावर आहे.दरम्यान कमी पावसात उत्पन्न येणा्या हळी जातीचे भात कापणीच्या कामाला वेग आला असून या भाताला बाजारपेठेत मातीमोल भाव मिळत असल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असून आर्थिक संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देसाधारणत: तीन महिन्यात हे पीक येते तसेच या पिकाला पाण्याची अधिक गरज असते.मात्र पावसाच्या भरवशावर लावलेल्या या भाताला पावसाने दगा दिल्याने ही पिके वाचविण्यासाठी शेतकº्यांची केविलवाणी धडपड तालुक्यात पाहण्यास मिळत आहे.

घोटी : आरंभीच्या काळात समाधानकारक झालेल्या पावसाने मात्र ऐन धान्यावर पीक आलेले असताना दडी मारल्याने गरी जातीचे भात जळण्याच्या मार्गावर आहे.दरम्यान कमी पावसात उत्पन्न येणा्या हळी जातीचे भात कापणीच्या कामाला वेग आला असून या भाताला बाजारपेठेत मातीमोल भाव मिळत असल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असून आर्थिक संकटात सापडला आहे.पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाº्या इगतपुरी तालुक्याच्या काही भागात आरंभीच्या काळात समाधानकारक पाऊस झाला या पावसामुळे तालुक्याच्या धरणसाठ्यात अल्पावधीतच लक्षणीय वाढ होऊन धरणे भरली मात्र नंतरच्या काळात पावसाने सातत्याने ओढ दिली.यामुळे ऐन पिकावर पावसाची गरज असताना पावसाने ओढ दिल्याने उन्हाच्या तिव्रतेमुळे हातातोंडाशी आलेले भाताचे पीक शेतकº्यांच्या डोळ्यादेखत जळून जात आहे.दरम्यान पावसाने ओढ दिल्याने भाताच्या उत्पन्नांत प्रचंड घट झाल्याचे चित्र तालुक्यात पाहण्यास मिळत आहे.यामुळे तालुक्यातील शेतकरी दिवाळी पूर्वीच आर्थिक संकटात सापडला आहे.पिके वाचिवण्यासाठी केविलवाणी धडपडदरम्यान तालुक्यात सर्वाधिक गरी जातीचे भाताची लागवड केली जाते.हे पीक उत्पनास अधिक असल्याने ही पिके घेण्याकडे शेतकऱ्याचा कल अधिक आहे.या पिकांना जगविण्यासाठी शेतकºयांच्या सर्व कुटुंबाला रात्रीचा दिवस करून जवळच्या नदी,नाले,बंधारा,धरण आणि विहिरीतून पाणी दयावे लागत आहे.पावसाच्या आकडेवारीत फरकदरम्यान इगतपुरी तालुक्यात सहा ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र असल्याने सहा ही ठिकाणी पावसाच्या आकडेवारीत तफावत असते.तालुक्याच्या घाट माथ्यावर असणाº्या इगतपुरी शहर परिसरात सर्वाधिक पाऊस पडतो तर पूर्व भागात पावसाची आकडेवारी निम्म्याहून कमी असते.असे असताना शहरातील आकडेवारी शासन गेली अनेक वर्षांपासून गृहीत धरीत असल्याने तालुक्यात दुष्काळ जाहीर होत नसे.यावर्षीपासून पावसाची सरासरी काढल्याने शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे.पंचनामे करण्याची मागणीदरम्यान तालुक्यात शेवटच्या टप्प्यात पावसाने ओढ दिल्याने भात पिके जळून जाण्याच्या मार्गावर असल्याने शासनाने या पिकाचे तात्काळ पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकº्यांना भरपाई दयावी अशी मागणी तालुक्यातील शेतकº्यांनी केली आहे.