शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

 उत्तर महाराष्ट्रात कोरोना बाधीतांच्या मृत्यू दरात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 01:25 IST

नाशिक- उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्'ात गत आठवड्याच्या तुलनेत यंदा रूग्णांची संख्या वाढली असली तरी एकुण रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणात आणि मृत्यू ...

ठळक मुद्दे१.९ टक्के:  बरे होण्याच्या प्रमाणात तीन टक्क्यांनी वाढ

नाशिक- उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्'ात गत आठवड्याच्या तुलनेत यंदा रूग्णांची संख्या वाढली असली तरी एकुण रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणात आणि मृत्यू दरात घट झाली आहे. गेल्या आठवड्यात बरे होण्याचे प्रमाण ८५.९४ टक्के होते. ते आता ८८.१ टक्के इतके झाले आहेत. तर गेल्या आठवड्यात मृत्यू दर २.०२ टक्के इतका होता. तो आता १.९९ टक्के इतका झाला आहे.उत्तर महाराष्ट्रातील नाशिक , अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या पाच जिल्'ात गेल्या आठवड्यात १ लाख ७७ हजार ३५१ रूग्ण होते. यात आठवडभरात वाढ झाली आहे. रविवारपर्यंत ही संख्या एक लाख ९३ हजार पर्यंत पोहोचली आहे. त्यातील १ लाख ६९ हजार १५३ रुग्ण उपचार केल्याने बरे झाले आहेत.कोरोना रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ८८.०१ टक्के इतके आहे. तर करोनामुळे आतापर्यंत विभागात ३८१७ जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर १.९९ टक्के आहे. उत्तर महाराष्ट्राच्या पाच जिल्'ात गेल्या २४ तासात विभागात १९५० नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर उपचाराअंती १८३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर चोविस तासातच ५३ करोनाबाधितांचा मृत्यू झाला.आतापर्यंत उत्तर महाराष्ट्रात पाच लाख ७७ हजार ५३८ रुग्णांची चाचणी करण्यात आली. त्यातील ३३.२७ टक्के रूग्ण पॉझीटीव्ह आले तर तीन लाख ८१ हजार ७१३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. अजुनही दोन हजार नमुन्यांचे अहवाल सध्या प्रलंबित आहेत. सध्या विभागात १९ हजार २१९ रुग्ण उपचार घेत आहेत.उत्तर महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक म्हणजे ७९ हजार २८० रुग्ण नाशिक जिल्'ाात आढळले आहेत. मात्र, यातील ६८ हजार ४०९ रुग्ण उपचाराअंती करोनामुक्त झाले. तर १४२७ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या नऊ हजार ४४४ रुग्ण नाशिक जिल्'ात उपचार घेत आहेत. जळगाव जिल्'ाात कोरोना बाधीतांची संख्या ५० हजाराच्या टप्पात आहे. त्यापैकी ४३ हजार १४८ रुग्ण बरे झाले. तर ११९८ जणांचा मृत्यू झाला. या जिल्'ात सध्या चार हजार ७६० रुग्ण उपचार घेत आहेत.अहमदनगर जिल्'ाात कोरोनाचा प्रसार वाढत असून आतापर्यंत ४५ हजार ६१७ रुग्ण आढळले. त्यातील ४१ हजार ३६९ रुग्ण बरे झाले. तर ७०३ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या ३५४५ रुग्ण उपचार घेत आहेत. धुळे जिल्'ाात करोनाबाधितांची संख्या १२ हजार पाचशेवर गेली आहे.त्यातील ११ हजार ४७६ रुग्ण बरे झाले आहेत तर ३६५ रूग्णांचा मृत्यू झाला. सध्या धुळे येथे ६६९ रुग्ण उपचार घेत आहेत. नंदुरबार जिल्'ात आतापर्यंत ५ हजार ६७६ रुग्ण आढळले. त्यातील ४ हजार ७५१ रुग्ण बरे झाले तर १२४ जणांचा मृत्यू झाला. सध्या ८०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.घरीच उपचारांना प्राधान्यगेल्या काही दिवसात कोरोनाबाधीतांच्या उपचारासाठी शासकिय रूग्णालये आणि खासगी रूग्णालयांची संख्या वाढत असली तरी घरी राहून उपचार घेणा-यांची संख्या वाढु लागली आहे. उत्तर महाराष्ट्रात सध्या २५ हजार ७०३ रूग्ण हे गृहविलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल