शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाणांमुळे मक्याच्या उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:50 IST

येवला : तालुक्यातील महालखेडा येथील सुमारे ५० शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी केलेले मका बियाणे सदोष निघाल्याने मका उत्पादनात मोठी घट येणार आहे. या मका पिकाचा पंचनामा करून शेतकºयांना नुकसानभरपाई देण्यात यावी, मका बियाणे उत्पादक कंपनीवर कारवाई करावी, अन्यथा येवला तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी

येवला : तालुक्यातील महालखेडा येथील सुमारे ५० शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी केलेले मका बियाणे सदोष निघाल्याने मका उत्पादनात मोठी घट येणार आहे. या मका पिकाचा पंचनामा करून शेतकºयांना नुकसानभरपाई देण्यात यावी, मका बियाणे उत्पादक कंपनीवर कारवाई करावी, अन्यथा येवला तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे.मे महिन्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांच्या जाहिरातींना बळी पडून महालखेडा येथील रोशन कृषी सेवा केंद्राचे संजय पोमनर यांच्या दुकानातून येथील सुमारे ५०-५५ शेतकºयांनी एका कंपनीचे मका बियाणे खरेदी केले. कंपनीने जाहिरात करताना या परिसरात एकरी ४० क्विंटल उत्पादन निघेल, असे सांगितले होते. या भूलथापांना बळी पडून परिसरातील शेतकºयांनी या बियाणाची लागवड केली. महालखेडा परिसरातून दोन कालवे गेलेले असल्याने येथे मुबलक पाणी आहे.शेतकºयांनी गरजेनुसार पिकाला पाणीही दिले. पिकाची काळजी घेताना जे जे करणे आवश्यक होते ते सर्व सोपस्कार पूर्ण केले.योग्यवेळी मशागत केली. कृषी खात्याच्या शिफारशीनुसार योग्य प्रकारे पीक संरक्षणाचे उपाय, आंतरमशागत करूनही या मका पिकाचे एकरी ८ ते १० क्विंटल उत्पादन येईल, अशीच परिस्थिती उभ्या पिकाची आहे. ज्या शेतकºयांनी मका पीक तयार केले त्यांनाही ८ ते ९ क्विंटल प्रती एकर उत्पादन झाले आहे. त्यामुळे परिसरातील या वाणाची लागवड केलेल्या सर्व शेतकºयांचा हाहंगाम पूर्ण वाया गेला आहे. त्यामुळे कंपनी व रोशन कृषी सेवा केंद्र महालखेडा यांच्या विरोधात येथील शेतकºयांनी संबंधितांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. या तक्रारीचे निवारण करावे, अशी मागणी केली आहे.निवेदनावर जानकीराम खांडेकर, उमा खांडेकर, अंजनाबाई मुरडनर, सोपान पवार, संजय होंडे, बाबासाहेब होंडे, भागचंद खांडेकर, आबा खांडेकर, चांगदेव खांडेकर, संतोष भगत आदींच्या स्वाक्षºया आहेत. परवाना रद्द करानिवेदनात शेतकºयांनी म्हटले आहे की, मका बियाणामुळे परिसरातील शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दुष्काळी परिस्थितीत प्रत्येक शेतकºयाला एकरी ४० हजार रु पयांचे नुकसान सहन करणे शक्य नाही. त्यामुळे या पिकाचा त्वरित पंचनामा करून नुकसानभरपाई मिळवून द्यावी. कंपनीचा बियाणे उत्पादन परवाना बंद करावा. अन्यथा आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.