शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाणांमुळे मक्याच्या उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:50 IST

येवला : तालुक्यातील महालखेडा येथील सुमारे ५० शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी केलेले मका बियाणे सदोष निघाल्याने मका उत्पादनात मोठी घट येणार आहे. या मका पिकाचा पंचनामा करून शेतकºयांना नुकसानभरपाई देण्यात यावी, मका बियाणे उत्पादक कंपनीवर कारवाई करावी, अन्यथा येवला तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी

येवला : तालुक्यातील महालखेडा येथील सुमारे ५० शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी केलेले मका बियाणे सदोष निघाल्याने मका उत्पादनात मोठी घट येणार आहे. या मका पिकाचा पंचनामा करून शेतकºयांना नुकसानभरपाई देण्यात यावी, मका बियाणे उत्पादक कंपनीवर कारवाई करावी, अन्यथा येवला तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे.मे महिन्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांच्या जाहिरातींना बळी पडून महालखेडा येथील रोशन कृषी सेवा केंद्राचे संजय पोमनर यांच्या दुकानातून येथील सुमारे ५०-५५ शेतकºयांनी एका कंपनीचे मका बियाणे खरेदी केले. कंपनीने जाहिरात करताना या परिसरात एकरी ४० क्विंटल उत्पादन निघेल, असे सांगितले होते. या भूलथापांना बळी पडून परिसरातील शेतकºयांनी या बियाणाची लागवड केली. महालखेडा परिसरातून दोन कालवे गेलेले असल्याने येथे मुबलक पाणी आहे.शेतकºयांनी गरजेनुसार पिकाला पाणीही दिले. पिकाची काळजी घेताना जे जे करणे आवश्यक होते ते सर्व सोपस्कार पूर्ण केले.योग्यवेळी मशागत केली. कृषी खात्याच्या शिफारशीनुसार योग्य प्रकारे पीक संरक्षणाचे उपाय, आंतरमशागत करूनही या मका पिकाचे एकरी ८ ते १० क्विंटल उत्पादन येईल, अशीच परिस्थिती उभ्या पिकाची आहे. ज्या शेतकºयांनी मका पीक तयार केले त्यांनाही ८ ते ९ क्विंटल प्रती एकर उत्पादन झाले आहे. त्यामुळे परिसरातील या वाणाची लागवड केलेल्या सर्व शेतकºयांचा हाहंगाम पूर्ण वाया गेला आहे. त्यामुळे कंपनी व रोशन कृषी सेवा केंद्र महालखेडा यांच्या विरोधात येथील शेतकºयांनी संबंधितांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. या तक्रारीचे निवारण करावे, अशी मागणी केली आहे.निवेदनावर जानकीराम खांडेकर, उमा खांडेकर, अंजनाबाई मुरडनर, सोपान पवार, संजय होंडे, बाबासाहेब होंडे, भागचंद खांडेकर, आबा खांडेकर, चांगदेव खांडेकर, संतोष भगत आदींच्या स्वाक्षºया आहेत. परवाना रद्द करानिवेदनात शेतकºयांनी म्हटले आहे की, मका बियाणामुळे परिसरातील शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दुष्काळी परिस्थितीत प्रत्येक शेतकºयाला एकरी ४० हजार रु पयांचे नुकसान सहन करणे शक्य नाही. त्यामुळे या पिकाचा त्वरित पंचनामा करून नुकसानभरपाई मिळवून द्यावी. कंपनीचा बियाणे उत्पादन परवाना बंद करावा. अन्यथा आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.