शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

येवला तालुक्यात कापूस, मक्याच्या क्षेत्रात घट; सोयाबीन, बाजरीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 00:33 IST

येवला : तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण ५९ हजार २०० हेक्टर क्षेत्र असताना गेल्या काही वर्षांमध्ये या क्षेत्रात वाढ होत गेल्याने सध्या ७९, ६८७ हेक्टर खरीप क्षेत्र झाले आहे. तर कृषी विभागाने खरीप क्षेत्राचा लक्षांक ८८ हजार ५६३ हेक्टर ठेवला आहे. यंदा तालुक्यात खरिपातील पीक पॅटर्नमध्ये बदल होत असून कापूस, मका क्षेत्रात घट होऊन सोयाबीन, बाजरी क्षेत्रात वाढ होणार असल्याचे चित्र आहे.

येवला : तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण ५९ हजार २०० हेक्टर क्षेत्र असताना गेल्या काही वर्षांमध्ये या क्षेत्रात वाढ होत गेल्याने सध्या ७९, ६८७ हेक्टर खरीप क्षेत्र झाले आहे. तर कृषी विभागाने खरीप क्षेत्राचा लक्षांक ८८ हजार ५६३ हेक्टर ठेवला आहे. यंदा तालुक्यात खरिपातील पीक पॅटर्नमध्ये बदल होत असून कापूस, मका क्षेत्रात घट होऊन सोयाबीन, बाजरी क्षेत्रात वाढ होणार असल्याचे चित्र आहे.गेल्या हंगामात सेंद्रिय व गुलाबी अळीच्या आक्र मणामुळे कापूस पिकाचे उत्पादन घटले तर कापसाला अपेक्षित दरही मिळाला नाही. परिणामी सद्यस्थितीत गेल्यावर्षीचा कापूस अजूनही शेतकरीवर्गाकडे पडून आहे. मका पिकाला लष्करी अळीचा फटका बसल्यामुळे अपेक्षित दर मिळाला नाही. त्यामुळे तालुक्यात यंदा कापूस, मका पिकांचे क्षेत्र घटले आहे. १ येवला तालुक्यात कृषी विभागाची येवला, पाटोदा, अंदरसूल अशी तीन मंडळे आहेत. तालुक्यातील खरिपाच्या ७९ हजार ६८७ हेक्टर क्षेत्रापैकी २६ हजार ६४४ हेक्टर क्षेत्रावर १५ जून अखेर पेरण्या झालेल्या असून, पेरणीची टक्केवारी ३३ टक्के आहे. तालुक्यात १५ जून अखेर क्षेत्रनिहाय झालेल्या पेरण्या अशा, तृणधान्य १९ हजार १५ हेक्टर, कडधान्य २,७६० हेक्टर, अन्नधान्य २१ हजार ७७५ हेक्टर, कापूस २ हजार ८३४ हेक्टर. २ शासनाच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यातील ममदापूर, साताळी, वाईबोथी, देवळाणे, सत्यगाव, सायगाव, खिर्डीसाठे, अनकाई या आठ गावांत फळबाग लागवड योजना राबविण्यात येत आहे. येवला तालुक्यात कृषी विभागातर्फे शेतीशाळा उपक्र म सुरू करण्यात आला आहे. या उपक्र मा- अंतर्गत तालुक्यात ४१ ठिकाणी शेती शाळा घेतल्या जाणार आहे.३ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कृषी विभागाने बांधावर खत-बियाणे पोहोच करण्याची योजना राबविली आहे. या योजनेअंर्तगत येवला तालुक्यातील १२४ गावांमध्ये ४०३ शेतकरी गटांमार्फत २ हजार ६६५ टन खत व ६२९ क्विंटल बियाणे ५ हजार २६ शेतकऱ्यांना बांधावर पोहोचविण्यात आले आहे.--------------------यंदा येवला तालुक्याचा पीक पॅटर्न बदलला आहे. तालुक्यात सोयाबीन, बाजरीचे क्षेत्र यंदा वाढणार असून, कापूस व मका क्षेत्रात घट होणार आहे. यंदा कोरोनामुळे बाजारात सोयाबीन बियाणांचा तुटवडा निर्माण झालेला असल्याने घरची बियाणे वापरण्याचा सल्ला शेतकरीवर्गाला कृषी विभागाने दिलेला आहे.- कारभारी नवले, तालुका कृषी अधिकारी, येवला

टॅग्स :Nashikनाशिक