शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

येवला तालुक्यात कापूस, मक्याच्या क्षेत्रात घट; सोयाबीन, बाजरीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 00:33 IST

येवला : तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण ५९ हजार २०० हेक्टर क्षेत्र असताना गेल्या काही वर्षांमध्ये या क्षेत्रात वाढ होत गेल्याने सध्या ७९, ६८७ हेक्टर खरीप क्षेत्र झाले आहे. तर कृषी विभागाने खरीप क्षेत्राचा लक्षांक ८८ हजार ५६३ हेक्टर ठेवला आहे. यंदा तालुक्यात खरिपातील पीक पॅटर्नमध्ये बदल होत असून कापूस, मका क्षेत्रात घट होऊन सोयाबीन, बाजरी क्षेत्रात वाढ होणार असल्याचे चित्र आहे.

येवला : तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण ५९ हजार २०० हेक्टर क्षेत्र असताना गेल्या काही वर्षांमध्ये या क्षेत्रात वाढ होत गेल्याने सध्या ७९, ६८७ हेक्टर खरीप क्षेत्र झाले आहे. तर कृषी विभागाने खरीप क्षेत्राचा लक्षांक ८८ हजार ५६३ हेक्टर ठेवला आहे. यंदा तालुक्यात खरिपातील पीक पॅटर्नमध्ये बदल होत असून कापूस, मका क्षेत्रात घट होऊन सोयाबीन, बाजरी क्षेत्रात वाढ होणार असल्याचे चित्र आहे.गेल्या हंगामात सेंद्रिय व गुलाबी अळीच्या आक्र मणामुळे कापूस पिकाचे उत्पादन घटले तर कापसाला अपेक्षित दरही मिळाला नाही. परिणामी सद्यस्थितीत गेल्यावर्षीचा कापूस अजूनही शेतकरीवर्गाकडे पडून आहे. मका पिकाला लष्करी अळीचा फटका बसल्यामुळे अपेक्षित दर मिळाला नाही. त्यामुळे तालुक्यात यंदा कापूस, मका पिकांचे क्षेत्र घटले आहे. १ येवला तालुक्यात कृषी विभागाची येवला, पाटोदा, अंदरसूल अशी तीन मंडळे आहेत. तालुक्यातील खरिपाच्या ७९ हजार ६८७ हेक्टर क्षेत्रापैकी २६ हजार ६४४ हेक्टर क्षेत्रावर १५ जून अखेर पेरण्या झालेल्या असून, पेरणीची टक्केवारी ३३ टक्के आहे. तालुक्यात १५ जून अखेर क्षेत्रनिहाय झालेल्या पेरण्या अशा, तृणधान्य १९ हजार १५ हेक्टर, कडधान्य २,७६० हेक्टर, अन्नधान्य २१ हजार ७७५ हेक्टर, कापूस २ हजार ८३४ हेक्टर. २ शासनाच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यातील ममदापूर, साताळी, वाईबोथी, देवळाणे, सत्यगाव, सायगाव, खिर्डीसाठे, अनकाई या आठ गावांत फळबाग लागवड योजना राबविण्यात येत आहे. येवला तालुक्यात कृषी विभागातर्फे शेतीशाळा उपक्र म सुरू करण्यात आला आहे. या उपक्र मा- अंतर्गत तालुक्यात ४१ ठिकाणी शेती शाळा घेतल्या जाणार आहे.३ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कृषी विभागाने बांधावर खत-बियाणे पोहोच करण्याची योजना राबविली आहे. या योजनेअंर्तगत येवला तालुक्यातील १२४ गावांमध्ये ४०३ शेतकरी गटांमार्फत २ हजार ६६५ टन खत व ६२९ क्विंटल बियाणे ५ हजार २६ शेतकऱ्यांना बांधावर पोहोचविण्यात आले आहे.--------------------यंदा येवला तालुक्याचा पीक पॅटर्न बदलला आहे. तालुक्यात सोयाबीन, बाजरीचे क्षेत्र यंदा वाढणार असून, कापूस व मका क्षेत्रात घट होणार आहे. यंदा कोरोनामुळे बाजारात सोयाबीन बियाणांचा तुटवडा निर्माण झालेला असल्याने घरची बियाणे वापरण्याचा सल्ला शेतकरीवर्गाला कृषी विभागाने दिलेला आहे.- कारभारी नवले, तालुका कृषी अधिकारी, येवला

टॅग्स :Nashikनाशिक