शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यासाठी आर्थिक पॅकेज घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 23:55 IST

मालेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी आर्थिक पॅकेज घोषित करण्याच्या विविध मागण्यांचे निवेदन भाजपतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. संपूर्ण देशामध्ये कोविड- १९चे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात होत आहेत. राज्य सरकारचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने महाराष्ट्रातल्या जनतेची दयनीय अवस्था झालेली आहे.

मालेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी आर्थिक पॅकेज घोषित करण्याच्या विविध मागण्यांचे निवेदन भाजपतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.संपूर्ण देशामध्ये कोविड- १९चे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात होत आहेत. राज्य सरकारचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने महाराष्ट्रातल्या जनतेची दयनीय अवस्था झालेली आहे. कोविड-१९ विरोधात केंद्र सरकारने ज्या मार्गदर्शक सूचना आखून दिल्या त्या संदर्भात ज्या उपाययोजना केल्या त्या उपाययोजनांचा पुढचं पाऊल उचलण्यामध्ये राज्य सरकार संपूर्णत: अपयशी ठरले आहे. मग पीपीई किट असतील, हॉस्पिटलची निर्मिती असेल. मुख्यमंत्री जिल्ह्या- जिल्ह्यांमध्ये जाऊन या सर्व गोष्टींची पाहणी करतील, अशी लोकांची अपेक्षा होती. राज्यातील पोलिसांना केवळ कोविडची लागणच झाली नसून राज्यातील पोलिसांवरील हल्ल्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. केंद्र सरकारने अनेक माध्यमातून राज्य सरकारला कोविड - १९च्या विरोधात लढण्याकरिता पैसे दिले आहेत हे पैसे नक्की कुठे आणि कसे खर्च होत आहेत? याची माहिती जनतेला त्वरित उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांकरिता आर्थिक पॅकेज घोषित करावे आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. यावेळी जिल्हा अध्यक्ष सुरेश निकम, तालुका अध्यक्ष नीलेश कचवे, जिल्हा उपाध्यक्ष लकी गिल, ज्येष्ठ नेते हरिप्रसाद गुप्ता, उद्योग आघाडीचे मुकेश झुनझुनवाला, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष देवा पाटील, पप्पू पाटील आदी उपस्थित होते.--------------------------------------मंत्री-प्रशासनात समन्वयाचा अभावकेंद्र सरकारने आधारभूत किमतीच्या आधारावर शेतमाल खरेदी करण्याची यंत्रणा उभी केल्यानंतरसुद्धा राज्य सरकार शेतमाल खरेदी करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज तातडीने उपलब्ध करून देणे त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाईसुद्धा देण्यात यावी. राज्य सरकारने आपल्या जनतेकरता कुठल्याही स्वरूपाचं पॅकेज जाहीर केलेले नाही. स्थलांतरित मजूरची अवस्था या सरकारने इतकी वाईट करून ठेवली की लाखो मजूर राज्यातून आपापल्या गावी चालत जाण्यासाठी निघाल्याचे हृदयद्रावक चित्र निर्माण झाले आहे. राज्याच्या मंत्र्यांमध्ये व प्रशासनामध्ये कोणताही समन्वय नाही.

टॅग्स :Nashikनाशिक