शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

कळवणमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:02 IST

कळवण, सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व शेजारील तालुक्यांमध्ये मुख्यत: भात व नागली, वरई ही पिके घेतली जातात. मात्र पावसाअभावी ती संकटात आली असून, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह कळवण, सुरगाणा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करावा व आदिवासी शेतकऱ्यांच्या पीकरोपांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी व दुष्काळी कामे त्वरित सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना साकडे : पावसाअभावी पिके करपल्याने बळीराजा चिंतित

कळवण : कळवण, सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व शेजारील तालुक्यांमध्ये मुख्यत: भात व नागली, वरई ही पिके घेतली जातात. मात्र पावसाअभावी ती संकटात आली असून, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह कळवण, सुरगाणा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करावा व आदिवासी शेतकऱ्यांच्या पीकरोपांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी व दुष्काळी कामे त्वरित सुरू करावी, अशी मागणी होत आहे.नाशिक जिल्ह्यातील शेतकरी कोरोनाच्या विळख्यात सापडलेला असताना पावसाने पाठ फिरवली, पावसाअभावी पिके करपू लागली असून, शासनस्तरावरून पंचनामे करण्याची मागणी होत आहे.विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, हिरामण खोसकर यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. आमदार पवारांनी कळवण, सुरगाणा तालुक्यातील दुष्काळसदृश स्थितीमुळे आदिवासी बांधवांचे आर्थिक गणित कोलमडल्यामुळे नाशिक जिल्ह्यासह कळवण, सुरगाणा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. कोरोनाच्या फैलावामुळे देशासह महाराष्ट्र राज्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे. संचारबंदीमुळे व पावसाने पाठ फिरविल्याने सुरगाणा तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. सुरगाणा तालुक्यातील मुख्य पीक भात असून, ते पूर्णत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पावसाअभावी भात शेतीची लागवड २५ टक्केसुद्धा झालेली नाही अणि जी लागवड बाकी आहे ती रोपे जवळपास ९० दिवसांच्या वर वाढ झाल्याने पाण्याअभावी करपू लागली आहेत. रब्बी पिकेही जमीनदोस्त होत आहेत. कळवण व सुरगाणा मतदारसंघातील माळरानात डोंगरमाथ्यावर भुईमूग, वरई, नागली ही पिके घेतली जातात; मात्र अपुºया पावसामुळे पिके करपून उद्ध्वस्त झाली आहेत. काबाडकष्ट करणारा शेतकरी आधीच कोरोनाच्या विळख्यात सापडला असून, लॉकडाऊनमुळे मोलमजुरीचे दरवाजेही बंद झाले आहे. त्यात पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, आर्थिक कोंडीत सापडला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी