शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कळवणमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:02 IST

कळवण, सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व शेजारील तालुक्यांमध्ये मुख्यत: भात व नागली, वरई ही पिके घेतली जातात. मात्र पावसाअभावी ती संकटात आली असून, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह कळवण, सुरगाणा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करावा व आदिवासी शेतकऱ्यांच्या पीकरोपांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी व दुष्काळी कामे त्वरित सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना साकडे : पावसाअभावी पिके करपल्याने बळीराजा चिंतित

कळवण : कळवण, सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व शेजारील तालुक्यांमध्ये मुख्यत: भात व नागली, वरई ही पिके घेतली जातात. मात्र पावसाअभावी ती संकटात आली असून, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह कळवण, सुरगाणा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करावा व आदिवासी शेतकऱ्यांच्या पीकरोपांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी व दुष्काळी कामे त्वरित सुरू करावी, अशी मागणी होत आहे.नाशिक जिल्ह्यातील शेतकरी कोरोनाच्या विळख्यात सापडलेला असताना पावसाने पाठ फिरवली, पावसाअभावी पिके करपू लागली असून, शासनस्तरावरून पंचनामे करण्याची मागणी होत आहे.विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, हिरामण खोसकर यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. आमदार पवारांनी कळवण, सुरगाणा तालुक्यातील दुष्काळसदृश स्थितीमुळे आदिवासी बांधवांचे आर्थिक गणित कोलमडल्यामुळे नाशिक जिल्ह्यासह कळवण, सुरगाणा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. कोरोनाच्या फैलावामुळे देशासह महाराष्ट्र राज्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे. संचारबंदीमुळे व पावसाने पाठ फिरविल्याने सुरगाणा तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. सुरगाणा तालुक्यातील मुख्य पीक भात असून, ते पूर्णत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पावसाअभावी भात शेतीची लागवड २५ टक्केसुद्धा झालेली नाही अणि जी लागवड बाकी आहे ती रोपे जवळपास ९० दिवसांच्या वर वाढ झाल्याने पाण्याअभावी करपू लागली आहेत. रब्बी पिकेही जमीनदोस्त होत आहेत. कळवण व सुरगाणा मतदारसंघातील माळरानात डोंगरमाथ्यावर भुईमूग, वरई, नागली ही पिके घेतली जातात; मात्र अपुºया पावसामुळे पिके करपून उद्ध्वस्त झाली आहेत. काबाडकष्ट करणारा शेतकरी आधीच कोरोनाच्या विळख्यात सापडला असून, लॉकडाऊनमुळे मोलमजुरीचे दरवाजेही बंद झाले आहे. त्यात पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, आर्थिक कोंडीत सापडला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी