शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

ठेवीदार संघर्ष समितीचा संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा निर्धार,हुतात्मा स्मारकातील बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 18:48 IST

राज्यभरातील डबघाईला आलेल्या व अवसायनात निघालेल्या विविध सहकारी बँका व पतसंस्थांच्या ठेविदारांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे.

ठळक मुद्देसंसदेच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा निर्धारअवसायनात निघालेल्या संस्थांच्या ठेवीदारांची बैठक ठेवी परत मिळविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन

नाशिक : जिल्ह्यासह राज्यभरातील डबघाईला आलेल्या व अवसायनात निघालेल्या विविध सहकारी बँका व पतसंस्थांच्या ठेविदारांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे.हुतात्मा स्मारक येथे शुक्रवारी (दि.1) श्रीकृष्ण शिरोडे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी बीएचआर , तापी , कपालेश्वर आदिंसह राज्यभरातील विविध पतसंस्थांमध्ये व वेगवेगळ्या पोन्झी स्कीमद्वारे फसवले गेलेल्या गुतवणूकदाकरांना मार्गदर्शन करताना श्रीकृष्ण शिरोडे यांनी एकत्रित येण्याचे आवाहन केले. अधिक दराने मिळणाऱ्या व्याजाच्या लालसेपोटी तसेच दाम दुप्पट मोबदला मिळण्याच्या आशेने नाशिक शहरासह संपूर्ण राज्यभरातील विविध भागातील नागरिकांनी सहकारी पतसंस्था आणि वेगवेळ पोन्झी स्कीममध्ये पैसे अडकवले आहेत. या गुंतवणूकदारांमध्ये राष्ट्रीयकृत बँकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह वेगवेगळ्य़ा शासकीय विभागांमध्ये काम करणा:या उच्च पदस्थ अधिका:यांचाही समावेश आहे. मात्र बहूतांश गुंतवणूकदार हे निवृत्त कर्मचारी तथा ज्येष्ठ नागरिक असून या सर्वानी आपल्या ठेवी परत मिळविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन शिरोडे यांनी केले आहे. ते म्हणाले,फसवल्या गेलेल्या ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत मिळविण्यासाठी एकजुटीची वज्रमुठ आवळण्याची गरज असून एकत्रित प्रयत्न केले तरच गुंतवणुकदारांना आपल्या ठेवी परत मिळू शकतात. त्यासाठी सर्वानी एकत्र येत संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. या बैठकीत नशिक शहरासह जिल्ह्यातील येवला, सिन्नर, दिंडोरी, इगतपुरी, पुणे, अहमदनगर आदि भागातील ठेवीदारही सहभागी झाले होते.न्यायमंचच्या निकालानंतरही नाही मिळाल्या ठेवी

दिंडोरीचे मधुकर भालेराव यांनी बीएचआरमध्ये सुमारे 5 लाखांच्या ठेवी ठेवलेल्या आहे.या ठेवींची रक्कम त्यांना परत करण्याचे आदेश न्यायमंचने जानेवरी महिन्यातच दिले होते. परंतु सस्थेच्या शाखेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती भालेराव यांनी दिली. त्यांनी 13 टक्के व्याजदराने दोन व पाच लाख रुपयांच्या दोन ठेली ठेवलेल्या असून न्यायमंचच्या निकालानंतरही पैसे मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :bankबँकagitationआंदोलन