शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

शेतकºयांना वीज बिलासाठी डिसेंबरअखेरची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 01:12 IST

शेतकºयांच्या थकीत वीज बिलासाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना जाहीर करूनही अपेक्षित कृषी वीज बिल भरणा होऊ शकला नसल्याने शेतकºयांनी योजनेला फारसा  प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून येते. योजना लागू करूनही शेतकºयांचे बिलासंदर्भातील प्रश्न कायम असल्याने राज्यातील ग्राहक संघटनांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन शेतकºयांना वीज बिलातच दुरुस्ती आणि सवलत देण्याची मागणी केली होती. त्यानुसार शेतकºयांची वीज बिले दुरुस्त करण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत देण्यात आली आहे.

नाशिक : शेतकºयांच्या थकीत वीज बिलासाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना जाहीर करूनही अपेक्षित कृषी वीज बिल भरणा होऊ शकला नसल्याने शेतकºयांनी योजनेला फारसा  प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून येते. योजना लागू करूनही शेतकºयांचे बिलासंदर्भातील प्रश्न कायम असल्याने राज्यातील ग्राहक संघटनांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन शेतकºयांना वीज बिलातच दुरुस्ती आणि सवलत देण्याची मागणी केली होती. त्यानुसार शेतकºयांची वीज बिले दुरुस्त करण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत देण्यात आली आहे.  राज्य शासनाने महावितरणमार्फत शेतकरी वीज ग्राहकांसाठी कृषी संजीवनी योजना जाहीर केली होती. मात्र मुदतवाढ देऊनही योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही. शेतकºयांना आलेली अवास्तव वीज बिले तसेच अंदाजित बिलांमुळे शेतकºयांवर मोठा आर्थिक बोजा आला होता. अनेक शेतकºयांना तर पुरवठा नसतानाही त्यांना देयके देण्यात आली होती. हा मूळ प्रश्न कायम असताना केवळ बिल भरण्यावर सवलत देण्यासाठी कृषी संजीवनी योजना जाहीर करण्यात आली होती. याबाबतच्या तक्रारी ग्राहक संघटनांकडे आल्यानंतर राज्यातील प्रमुख ग्राहक प्रतिनिधींनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर वावनकुळे यांची भेट घेत चर्चा केली होती. यावेळी ऊर्जा सचिव, महातिरणचे व्यवस्थापकीय संचालक हेही उपस्थित होते. यावेळी बावनकुळे यांनी मूळ बिलातील दोष दूर करण्यात येईल, असे जाहीर करून सवलतही जाहीर केली.  यासंदर्भात नाशिक वीज ग्राहक समितीचे सचिव सिद्धार्थ सोनी यांनी सांगितले की, ज्या शेतकरी ग्राहकांचे कृषी बिल ३० हजारापेक्षा कमी असेल त्यांना ३ हजार रुपये तर ज्यांची थकबाकी ३० हजारापेक्षा जास्त असेल त्यांना ५ हजार रुपये भरून कृषी संजीवनी योजनेत सहभागी करून घेण्याचे बावनकुळे यांनी जाहीर केले आहे. तसेच ज्या शेतकºयांची बिले जास्त आहेत त्यांनी तक्रार नोंदविल्यास त्यांची बिले तपासून ३१ डिसेंबरपर्यंत दुरुस्त करून दिली जातील, असेही आश्वासन दिले आहे. ज्या शेतकरी ग्राहकांना विजेच्या बिलाबाबत अडचणी असतील त्यांनी वीज ग्राहक समितीकडे लेखी तक्रार नोंदवावी, असे आवाहन समितीने केले आहे. सर्व शेतकरी ग्राहकांची बिले तपासणी केली जाणार आहेत. तसेच ज्यांना विनामीटर पुरवठा दिलेला आहे त्या शेतकरी ग्राहकांचा जोडभार तपासला जाणार आहे. बंद मीटरच्या प्रकरणात फिडरनिहाय इनपूट बघून बिल दुरुस्त केले जाणार असल्याचे वीज ग्राहक समितीचे सचिव सिद्धार्थ सोनी यांनी कळविले आहे.

टॅग्स :ministerमंत्रीFarmerशेतकरी