शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
7
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
8
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
9
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
10
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
11
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
12
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
13
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
14
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
15
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
16
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
17
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
18
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
19
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
20
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?

शेतकºयांना वीज बिलासाठी डिसेंबरअखेरची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 01:12 IST

शेतकºयांच्या थकीत वीज बिलासाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना जाहीर करूनही अपेक्षित कृषी वीज बिल भरणा होऊ शकला नसल्याने शेतकºयांनी योजनेला फारसा  प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून येते. योजना लागू करूनही शेतकºयांचे बिलासंदर्भातील प्रश्न कायम असल्याने राज्यातील ग्राहक संघटनांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन शेतकºयांना वीज बिलातच दुरुस्ती आणि सवलत देण्याची मागणी केली होती. त्यानुसार शेतकºयांची वीज बिले दुरुस्त करण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत देण्यात आली आहे.

नाशिक : शेतकºयांच्या थकीत वीज बिलासाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना जाहीर करूनही अपेक्षित कृषी वीज बिल भरणा होऊ शकला नसल्याने शेतकºयांनी योजनेला फारसा  प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून येते. योजना लागू करूनही शेतकºयांचे बिलासंदर्भातील प्रश्न कायम असल्याने राज्यातील ग्राहक संघटनांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन शेतकºयांना वीज बिलातच दुरुस्ती आणि सवलत देण्याची मागणी केली होती. त्यानुसार शेतकºयांची वीज बिले दुरुस्त करण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत देण्यात आली आहे.  राज्य शासनाने महावितरणमार्फत शेतकरी वीज ग्राहकांसाठी कृषी संजीवनी योजना जाहीर केली होती. मात्र मुदतवाढ देऊनही योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही. शेतकºयांना आलेली अवास्तव वीज बिले तसेच अंदाजित बिलांमुळे शेतकºयांवर मोठा आर्थिक बोजा आला होता. अनेक शेतकºयांना तर पुरवठा नसतानाही त्यांना देयके देण्यात आली होती. हा मूळ प्रश्न कायम असताना केवळ बिल भरण्यावर सवलत देण्यासाठी कृषी संजीवनी योजना जाहीर करण्यात आली होती. याबाबतच्या तक्रारी ग्राहक संघटनांकडे आल्यानंतर राज्यातील प्रमुख ग्राहक प्रतिनिधींनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर वावनकुळे यांची भेट घेत चर्चा केली होती. यावेळी ऊर्जा सचिव, महातिरणचे व्यवस्थापकीय संचालक हेही उपस्थित होते. यावेळी बावनकुळे यांनी मूळ बिलातील दोष दूर करण्यात येईल, असे जाहीर करून सवलतही जाहीर केली.  यासंदर्भात नाशिक वीज ग्राहक समितीचे सचिव सिद्धार्थ सोनी यांनी सांगितले की, ज्या शेतकरी ग्राहकांचे कृषी बिल ३० हजारापेक्षा कमी असेल त्यांना ३ हजार रुपये तर ज्यांची थकबाकी ३० हजारापेक्षा जास्त असेल त्यांना ५ हजार रुपये भरून कृषी संजीवनी योजनेत सहभागी करून घेण्याचे बावनकुळे यांनी जाहीर केले आहे. तसेच ज्या शेतकºयांची बिले जास्त आहेत त्यांनी तक्रार नोंदविल्यास त्यांची बिले तपासून ३१ डिसेंबरपर्यंत दुरुस्त करून दिली जातील, असेही आश्वासन दिले आहे. ज्या शेतकरी ग्राहकांना विजेच्या बिलाबाबत अडचणी असतील त्यांनी वीज ग्राहक समितीकडे लेखी तक्रार नोंदवावी, असे आवाहन समितीने केले आहे. सर्व शेतकरी ग्राहकांची बिले तपासणी केली जाणार आहेत. तसेच ज्यांना विनामीटर पुरवठा दिलेला आहे त्या शेतकरी ग्राहकांचा जोडभार तपासला जाणार आहे. बंद मीटरच्या प्रकरणात फिडरनिहाय इनपूट बघून बिल दुरुस्त केले जाणार असल्याचे वीज ग्राहक समितीचे सचिव सिद्धार्थ सोनी यांनी कळविले आहे.

टॅग्स :ministerमंत्रीFarmerशेतकरी