शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

शेतकºयांना वीज बिलासाठी डिसेंबरअखेरची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 01:12 IST

शेतकºयांच्या थकीत वीज बिलासाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना जाहीर करूनही अपेक्षित कृषी वीज बिल भरणा होऊ शकला नसल्याने शेतकºयांनी योजनेला फारसा  प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून येते. योजना लागू करूनही शेतकºयांचे बिलासंदर्भातील प्रश्न कायम असल्याने राज्यातील ग्राहक संघटनांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन शेतकºयांना वीज बिलातच दुरुस्ती आणि सवलत देण्याची मागणी केली होती. त्यानुसार शेतकºयांची वीज बिले दुरुस्त करण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत देण्यात आली आहे.

नाशिक : शेतकºयांच्या थकीत वीज बिलासाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना जाहीर करूनही अपेक्षित कृषी वीज बिल भरणा होऊ शकला नसल्याने शेतकºयांनी योजनेला फारसा  प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून येते. योजना लागू करूनही शेतकºयांचे बिलासंदर्भातील प्रश्न कायम असल्याने राज्यातील ग्राहक संघटनांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन शेतकºयांना वीज बिलातच दुरुस्ती आणि सवलत देण्याची मागणी केली होती. त्यानुसार शेतकºयांची वीज बिले दुरुस्त करण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत देण्यात आली आहे.  राज्य शासनाने महावितरणमार्फत शेतकरी वीज ग्राहकांसाठी कृषी संजीवनी योजना जाहीर केली होती. मात्र मुदतवाढ देऊनही योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही. शेतकºयांना आलेली अवास्तव वीज बिले तसेच अंदाजित बिलांमुळे शेतकºयांवर मोठा आर्थिक बोजा आला होता. अनेक शेतकºयांना तर पुरवठा नसतानाही त्यांना देयके देण्यात आली होती. हा मूळ प्रश्न कायम असताना केवळ बिल भरण्यावर सवलत देण्यासाठी कृषी संजीवनी योजना जाहीर करण्यात आली होती. याबाबतच्या तक्रारी ग्राहक संघटनांकडे आल्यानंतर राज्यातील प्रमुख ग्राहक प्रतिनिधींनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर वावनकुळे यांची भेट घेत चर्चा केली होती. यावेळी ऊर्जा सचिव, महातिरणचे व्यवस्थापकीय संचालक हेही उपस्थित होते. यावेळी बावनकुळे यांनी मूळ बिलातील दोष दूर करण्यात येईल, असे जाहीर करून सवलतही जाहीर केली.  यासंदर्भात नाशिक वीज ग्राहक समितीचे सचिव सिद्धार्थ सोनी यांनी सांगितले की, ज्या शेतकरी ग्राहकांचे कृषी बिल ३० हजारापेक्षा कमी असेल त्यांना ३ हजार रुपये तर ज्यांची थकबाकी ३० हजारापेक्षा जास्त असेल त्यांना ५ हजार रुपये भरून कृषी संजीवनी योजनेत सहभागी करून घेण्याचे बावनकुळे यांनी जाहीर केले आहे. तसेच ज्या शेतकºयांची बिले जास्त आहेत त्यांनी तक्रार नोंदविल्यास त्यांची बिले तपासून ३१ डिसेंबरपर्यंत दुरुस्त करून दिली जातील, असेही आश्वासन दिले आहे. ज्या शेतकरी ग्राहकांना विजेच्या बिलाबाबत अडचणी असतील त्यांनी वीज ग्राहक समितीकडे लेखी तक्रार नोंदवावी, असे आवाहन समितीने केले आहे. सर्व शेतकरी ग्राहकांची बिले तपासणी केली जाणार आहेत. तसेच ज्यांना विनामीटर पुरवठा दिलेला आहे त्या शेतकरी ग्राहकांचा जोडभार तपासला जाणार आहे. बंद मीटरच्या प्रकरणात फिडरनिहाय इनपूट बघून बिल दुरुस्त केले जाणार असल्याचे वीज ग्राहक समितीचे सचिव सिद्धार्थ सोनी यांनी कळविले आहे.

टॅग्स :ministerमंत्रीFarmerशेतकरी