शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

सातपूरच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपीची फाशीची शिक्षा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:44 IST

सातपूरच्या शिवाजीनगर कार्बननाका येथे राहणाऱ्या पल्लवी संसारे (३४) व मुलगा विशाल (७) या दोघांच्या दुहेरी हत्याकांडात जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेले रामदास शिंदे याची मुंबई उच्च न्यायालयाने खटल्यातून निर्दाेष मुक्तता केली आहे.

नाशिक : सातपूरच्या शिवाजीनगर कार्बननाका येथे राहणाऱ्या पल्लवी संसारे (३४) व मुलगा विशाल (७) या दोघांच्या दुहेरी हत्याकांडात जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेले रामदास शिंदे याची मुंबई उच्च न्यायालयाने खटल्यातून निर्दाेष मुक्तता केली आहे. ज्या परिस्थितीजन्य पुराव्यावर जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले होते, पुराव्यांनाच उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यात न्यायालयाने उपरोक्त निर्णय दिला.१८ एप्रिल २०१६ मध्ये ही घटना घडली होती. संशयित रामदास शिंदे याच्या घरात भाडेकरू म्हणून राहत असलेल्या पल्लवी संसारे व मुलगा विशाल यांचा हत्याकांड करण्यात आले होते. त्यानंतर पल्लवीेचे पती कचरू संसारे यांनी फिर्याद दिली होती. घरमालक रामदास शिंदे हा फरार असल्याने त्याच्यावर संशय बळावला होता व नंतर त्याला अटक करून त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने गेल्या वर्षी २६ एप्रिल २०१८ रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी रामदास शिंदे यास फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध शिंदे याच्या वतीने अ‍ॅड. अनिकेत निकम यांनी उच्च न्यायालयात अपील केले, त्याची सुनावणी झाली. सरकारपक्षातर्फे श्ािंदे याच्याविरुद्ध सादर करण्यात आलेले पुराव्यांवरच अ‍ॅड. निकम यांनी संशय व्यक्तकरून आरोपीला फाशी ठोठावण्या इतपत कोणताच पुरावा न्यायालय पुढे नाही, तसेच खटल्यात कोणताच प्रथमदर्शनी साक्षीदार नसून संपूर्ण केस परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित आहे आणि परिस्थितीजन्य पुराव्याची सबळ साखळी सरकारी वकिलांनी कोर्टात मांडली नाही आणि अशा परिस्थितीत रामदास शिंदे यास फाशीची शिक्षा देणे चुकीचे असून, त्यांची निर्दोेष मुक्तता करण्यात यावी, असा युक्तिवाद केला व त्याच्या पुराव्यादाखल काही निवाडेही सादर केले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी, प्रकाश नाईक यांनी शिंदे याची दुहेरी हत्याकांडातून निर्दोष मुक्तता केली.खटल्यात स्पेक्ट्रोग्रापीची टेस्टया खटल्यात पहिल्यांदाच आरोपीच्या आवाजाची स्पेक्ट्रोग्रापी टेस्ट घेण्यात आली होती. त्याचे पुरावे जिल्हा न्यायालयासमोर सादर करण्यात आले होते. परंतु ज्या दिवशी घटना घडली त्यावेळी अन्य नागरिकांना कोणताही आवाज आला नसल्याची बाब न्यायालयापुढे मांडण्यात आली. मयत दोन्ही मायलेकावर एकूण ५४ घाव करण्यात आले, त्यावेळी आरडाओरड झाली असती. असा प्रश्न अनुत्तरित असल्याचे न्यायालयासमोर मांडण्यात आले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCrime Newsगुन्हेगारी