शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

त्र्यंबकेश्वर शहरात दिवसाआड पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 22:45 IST

त्र्यंबकेश्वर : शहरात यांत्रिक बिघाडामुळे अंबोली लघुपाट धरण ओव्हरफ्लो झाले असतांना शहरात तीन महिन्यांपासुन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर बेझे येथील गौतमी प्रकल्प जवळपास ४५ टक्के भरले असतांना त्र्यंबकेश्वर शहरातील श्री निरंजनी अखाडा परिसरातील आनंद आखाडा, कैलासराजा नगर, तलाठी कॉलनी, श्रीस्वामी समर्थ केंद्र ,गुळवेवाडी, पेगलवाडी या परिसरातील रहिवासीयांना गेल्या सात दिवसांपासुन पाणीच नसल्याने इतरत्र जलाशयातुन पाणी भरुन नेण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देतांत्रिक बिघाड : निरंजनी आखाडा परिसर सात दिवसांपासुन कोरडाच

त्र्यंबकेश्वर : शहरात यांत्रिक बिघाडामुळे अंबोली लघुपाट धरण ओव्हरफ्लो झाले असतांना शहरात तीन महिन्यांपासुन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर बेझे येथील गौतमी प्रकल्प जवळपास ४५ टक्के भरले असतांना त्र्यंबकेश्वर शहरातील श्री निरंजनी अखाडा परिसरातील आनंद आखाडा, कैलासराजा नगर, तलाठी कॉलनी, श्रीस्वामी समर्थ केंद्र ,गुळवेवाडी, पेगलवाडी या परिसरातील रहिवासीयांना गेल्या सात दिवसांपासुन पाणीच नसल्याने इतरत्र जलाशयातुन पाणी भरुन नेण्याची वेळ आली आहे.त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत ह्यआंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातंयह्ण अशी परिस्थिती असतांना पाण्यासारख्या ज्वलंत प्रश्नावर नगरपरिषद गंभीर नाही. याचेच सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.वास्तविक अशा परिस्थितीत युध्द पातळीवर मोटार दुरुस्त करणे गरजेचे असतांना कासवगतीने व बेफिकीरीने मोटार दुरुस्तीला टाकण्यात आली ती आता दुरुस्त होवून झाली की नाही याबाबत कोणताच पाठपुरावा केलेला नाही.अखेर सोमवारी (दि.२६) सायंकाळी मोटार दुरुस्त करुन आणल्याचे समजले. तो पर्यंत ज्या रहिवासीयांना सात आठ दिवस पाणीच न आल्याने ते लोक विहीरी, झरे याचा वापर करीत असल्याचे पहावयास मिळाले.पावसाळी वातावरण त्यात अशुद्ध पाणी पिल्याने काहींना सर्दी, खोकला, जुलाब असा त्रास होत आहे. त्यामुळे अनेकांच्या डॉक्टरांकडे फऱ्या वाढल्या आहेत.वास्तविक नगरपरिषदेत अहिल्या धरण, अंबोली धरण, बेझे येथील गौतमी प्रकल्पातून नगरपरिषद पाणी उचलत असतांना त्र्यंबक पालिकेला आपल्या पदरी एखादी दोन मोटार जादा ठेवणे गरजेचे आहे. भविष्यात असा हलगर्जी पणाबद्दल नागरीकांनी तीव्र नाराजी बोलून दाखविली.

टॅग्स :water shortageपाणीकपातtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर