शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सांडपाण्यामुळे दारणा नदीचे पाणी आरोग्यासाठी घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 00:28 IST

भगूर शहरासह विविध गावांतील शेतीपिके आणि पिण्याच्या पाण्यासाठी वरदान लाभलेल्या दारणा नदीत भगूरसह देवळाली कॅम्प तसेच परिसरातील गावांतील सांडपाणी सोडले जात असल्यामुळे नदीचे पाणी आरोग्यासाठी धोकादायक झाले असून, गोदावरीप्रमाणेच दारणा नदीचीही स्वच्छता करण्याची मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देजनावरे, पिकांनाही धोका । दूषित पाणी रोखण्याची मागणी

भगूर : भगूर शहरासह विविध गावांतील शेतीपिके आणि पिण्याच्या पाण्यासाठी वरदान लाभलेल्या दारणा नदीत भगूरसह देवळाली कॅम्प तसेच परिसरातील गावांतील सांडपाणी सोडले जात असल्यामुळे नदीचे पाणी आरोग्यासाठी धोकादायक झाले असून, गोदावरीप्रमाणेच दारणा नदीचीही स्वच्छता करण्याची मागणी केली जात आहे.दारणा नदीच्या काठावरील भगूर, राहुरी, दोनवाडे, देवळाली कॅम्प, नानेगाव, संसरी, शेवगे दारणा अशा विविध गावांना वरदान ठरलेल्या दारणा नदीमुळे पिण्याचे पाणी, सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. नदीच्या पाण्यावर दुतर्फा बागायती पिके घेऊन येथील शेतकरी सुजलाम् सुफलाम् झाला असला तरी, गेल्या काही वर्षांपासून दारणा नदीच्या शुद्धीकरणाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. भगूर नगरपालिका, देवळाली छावणी परिषद आणि लगतच्या ग्रामपंचायती आपल्या गावातील नागरीवस्तीतील घाण, दुर्गंधीयुक्त सांडपाणी विविध नाले, गटारीद्वारे चक्क दारणा नदीच्या पात्रात सोडत असल्याने दारणा नदीला गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नदीच्या पाण्याचा विचित्र वास येत असून, याच पाण्यातून परिसरातील गावांना पाणीपुरवठा केला जात आहे तसेच शेतीपिके व जनावरांनादेखील हेच पाणी दिले जात आहे. सध्या दारणा धरणातून विसर्ग बंद करण्यात आला असून, वाळूमाफियांनी मोठ्या प्रमाणावर वाळूचे उत्खनन करून नेल्यामुळे नदीपात्रात ठिकठिकाणी खड्डे पडून त्यात दुर्गंधीयुक्त पाणी साचले आहे. दरम्यान, दारणा नदीत देवळाली कॅम्पसह बार्न स्कूल, श्ािंगवे बहुला आणि लष्करी वस्तीचे सांडपाणी विजयनगरमार्गे पांढुर्ली रस्त्याने दारणा पुलाखालून नदीत सोडले जाते. तर भगूर शहरातील सांडपाणी राममंदिररोड ते भिलाटी, राजवाडामधून नाल्याद्वारे खुलेआम सोडले जात आहे. त्यामुळे दारणा नदीला अवकळा प्राप्त झाली असून, या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रदूषण नियंत्रण विभागाने दारणा नदीची पाहणी करून पाणी प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.गटारगंगेची अवस्थाभगूरच्या दारणा नदीला इतिहास असून, या नदीपात्रात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, स्वातंत्र्य सैनिक नरसिंहराव बलकवडे, भाई प. प. कलंत्री यांच्यासह शेकडो पहिलवान दररोज सकाळी पोहण्याचा सराव करीत. त्यावेळी दारणा नदीचे सौंदर्य व पावित्र्य राखले गेले होते. आता मात्र गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून धरणातून मुबलक पाणी नदीत सोडले जात असल्यामुळेच नदीचे वैभव नष्ट होऊन गटारगंगेची अवस्था आल्याची खंत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण