शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
16
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
17
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
18
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
19
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
20
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'

सांडपाण्यामुळे दारणा नदीचे पाणी आरोग्यासाठी घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 00:28 IST

भगूर शहरासह विविध गावांतील शेतीपिके आणि पिण्याच्या पाण्यासाठी वरदान लाभलेल्या दारणा नदीत भगूरसह देवळाली कॅम्प तसेच परिसरातील गावांतील सांडपाणी सोडले जात असल्यामुळे नदीचे पाणी आरोग्यासाठी धोकादायक झाले असून, गोदावरीप्रमाणेच दारणा नदीचीही स्वच्छता करण्याची मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देजनावरे, पिकांनाही धोका । दूषित पाणी रोखण्याची मागणी

भगूर : भगूर शहरासह विविध गावांतील शेतीपिके आणि पिण्याच्या पाण्यासाठी वरदान लाभलेल्या दारणा नदीत भगूरसह देवळाली कॅम्प तसेच परिसरातील गावांतील सांडपाणी सोडले जात असल्यामुळे नदीचे पाणी आरोग्यासाठी धोकादायक झाले असून, गोदावरीप्रमाणेच दारणा नदीचीही स्वच्छता करण्याची मागणी केली जात आहे.दारणा नदीच्या काठावरील भगूर, राहुरी, दोनवाडे, देवळाली कॅम्प, नानेगाव, संसरी, शेवगे दारणा अशा विविध गावांना वरदान ठरलेल्या दारणा नदीमुळे पिण्याचे पाणी, सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. नदीच्या पाण्यावर दुतर्फा बागायती पिके घेऊन येथील शेतकरी सुजलाम् सुफलाम् झाला असला तरी, गेल्या काही वर्षांपासून दारणा नदीच्या शुद्धीकरणाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. भगूर नगरपालिका, देवळाली छावणी परिषद आणि लगतच्या ग्रामपंचायती आपल्या गावातील नागरीवस्तीतील घाण, दुर्गंधीयुक्त सांडपाणी विविध नाले, गटारीद्वारे चक्क दारणा नदीच्या पात्रात सोडत असल्याने दारणा नदीला गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नदीच्या पाण्याचा विचित्र वास येत असून, याच पाण्यातून परिसरातील गावांना पाणीपुरवठा केला जात आहे तसेच शेतीपिके व जनावरांनादेखील हेच पाणी दिले जात आहे. सध्या दारणा धरणातून विसर्ग बंद करण्यात आला असून, वाळूमाफियांनी मोठ्या प्रमाणावर वाळूचे उत्खनन करून नेल्यामुळे नदीपात्रात ठिकठिकाणी खड्डे पडून त्यात दुर्गंधीयुक्त पाणी साचले आहे. दरम्यान, दारणा नदीत देवळाली कॅम्पसह बार्न स्कूल, श्ािंगवे बहुला आणि लष्करी वस्तीचे सांडपाणी विजयनगरमार्गे पांढुर्ली रस्त्याने दारणा पुलाखालून नदीत सोडले जाते. तर भगूर शहरातील सांडपाणी राममंदिररोड ते भिलाटी, राजवाडामधून नाल्याद्वारे खुलेआम सोडले जात आहे. त्यामुळे दारणा नदीला अवकळा प्राप्त झाली असून, या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रदूषण नियंत्रण विभागाने दारणा नदीची पाहणी करून पाणी प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.गटारगंगेची अवस्थाभगूरच्या दारणा नदीला इतिहास असून, या नदीपात्रात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, स्वातंत्र्य सैनिक नरसिंहराव बलकवडे, भाई प. प. कलंत्री यांच्यासह शेकडो पहिलवान दररोज सकाळी पोहण्याचा सराव करीत. त्यावेळी दारणा नदीचे सौंदर्य व पावित्र्य राखले गेले होते. आता मात्र गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून धरणातून मुबलक पाणी नदीत सोडले जात असल्यामुळेच नदीचे वैभव नष्ट होऊन गटारगंगेची अवस्था आल्याची खंत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण