शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

डेंग्यूचा डंख !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 16:07 IST

आकडेवारी आणि तुलनेत जेव्हा यंत्रणा अडकते किंवा त्यातील अनुकूलतेच्या आधारे बचावाच्या भूमिकेत शिरते, तेव्हा मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष घडून आल्याशिवाय राहत नाही. नाशकात डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढल्याच्या प्रकाराबाबतही तसेच काहीसे होताना दिसत आहे, हे दुर्दैवी म्हणायला हवे.

आकडेवारी आणि तुलनेत जेव्हा यंत्रणा अडकते किंवा त्यातील अनुकूलतेच्या आधारे बचावाच्या भूमिकेत शिरते, तेव्हा मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष घडून आल्याशिवाय राहत नाही. नाशकात डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढल्याच्या प्रकाराबाबतही तसेच काहीसे होताना दिसत आहे, हे दुर्दैवी म्हणायला हवे.नाशकात भीती वाटावी अशा प्रमाणात डेंग्यूचा फैलाव होताना दिसत आहे. चालू वर्षाच्या प्रारंभीच्या काही महिन्यांमध्ये प्रतिमाह अवघी २ ते ६ इतकीच राहिलेली या आजाराच्या रुग्णांची संख्या गेल्या दोन महिन्यांत थेट शंभरावर पोहोचली आहे. यातही आॅक्टोबरमध्ये या वर्षातील सर्वाधिक १४३ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जानेवारीपासून आजपर्यंतचा आढावा घेता या चालू वर्षात एक हजारावर संशयित रुग्ण आढळले असून, त्यातील सुमारे चारशे जणांना डेंग्यू झाल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले आहे. ही आकडेवारी खरे तर चिंताजनक आहे. विशेषत: नाशिक पूर्व व सिडको-सातपूरमधले डेंग्यूचे प्रमाण अधिक असून, सिडकोत तर एकाच परिसरात पन्नासपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत, कारण तेथील एका बंद पडलेल्या बांधकामाच्या ठिकाणी डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातून महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेची कुचराई उघड होणारी आहे. म्हणायला कागदोपत्री तिसेक धूर फवारणी यंत्रांद्वारे धुरळणी केली जाते. परंतु ती पुरेशी आहे का व उपयोगी ठरते आहे का याचा आढावाच घेतला जाताना दिसत नाही. आजही अनेक भागातून त्याबाबतच्या तक्रारी येताना दिसतात. धूर फवारणी करणारे कर्मचारी कामचुकारपणा करतात, त्यांच्यावर कारवाईची मागणीही होते; पण त्याबाबतही काही होताना दिसत नाही. त्याउलट महापालिकेची यंत्रणा गेल्यावर्षीपेक्षा यंदा स्थिती कशी आटोक्यात आहे, हे सांगण्यात धन्यता मानताना दिसते. गेल्यावर्षी आॅक्टोबरपर्यंत सातशेपेक्षा अधिक रुग्ण आढळले होते, यंदा ती संख्या चारशेच आहे. शिवाय गेल्यावर्षी चारजण मृत्युमुखी पडले होते, यंदा तसे काही घडलेले नाही, असे म्हणून यंत्रणा याबाबतीतले गांभीर्य बाळगताना दिसत नाही. दुपारी उन्हाचा चटका बसतो व सायंकाळनंतर थंडी वाजते, या वातावरणात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती वाढते, असे कारण देऊनही बचावण्याचा प्रयत्न होतो. तेव्हा जबाबदारीपासून बचावाची कारणे शोधण्यापेक्षा ती निभावण्याची भूमिका महापालिकेतील आरोग्य विभागाने घेणे गरजेचे आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा डेंग्यूबाधितांचे प्रमाण कमी आहे, ही बाब कागदोपत्री समाधानाची मानली जात असली तरी, ते समाधान समस्येकडे दुर्लक्ष घडविणारे तसेच त्यासंबंधाने होत असलेल्या कुचराईला निमंत्रण देणारेही ठरते. आकडा कमी म्हणून अशा प्रश्नांकडे पाठ फिरवता येणार नाही. दुर्दैव असे की, महापालिकेतील आरोग्य विभाग नेतृत्वबदलाच्या प्रक्रियेत गुरफटलेला आहे. त्यामुळे यंत्रणा बेफिकिरीने काम करताना दिसते. डेंग्यूप्रमाणेच कावीळ व मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दूषित पाणीपुरवठ्यातून ही बिमारी ओढवते आहे. पण, त्याहीबाबत अनास्थेचीच स्थिती आहे. नागरिक स्वत:च्या आरोग्याबद्दल तितकेसे सजग नाहीत हा भाग आहेच; परंतु आरोग्यविषयक समस्यांना बºयाचअंशी महापालिकेच्या यंत्रणांचे दुर्लक्षही कारणीभूत ठरताना दिसून येते. म्हणूनच याकडे गांभीर्याने लक्ष पुरविले जाणे गरजेचे आहे.