शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यावर अमित शाहांना हसू आवलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
2
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
3
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
4
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
5
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
6
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
7
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
8
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
9
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
10
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
11
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
12
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
13
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
14
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
15
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
16
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
17
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
18
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
19
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
Daily Top 2Weekly Top 5

घाटातील धोकादायक वळण रस्त्याला टिपड्यांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 19:40 IST

आंबेनळी घाटात झालेल्या दुर्घटनेत ३३ जणांचा बळी गेल्यानंतर महाराष्ट्रभर प्रशासन सतर्कझाले. नाशिक-गुजरात राष्ट्रीय महामार्गावरील सावळघाटातील धोकादायक वळणाचे संबंधित यंत्रणेला कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

पेठ : आंबेनळी घाटात झालेल्या दुर्घटनेत ३३ जणांचा बळी गेल्यानंतर महाराष्ट्रभर प्रशासन सतर्कझाले. नाशिक-गुजरात राष्ट्रीय महामार्गावरील सावळघाटातील धोकादायक वळणाचे संबंधित यंत्रणेला कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. या धोकादायक वळणावर चक्क लोखंडी टिपड्यांना प्लॅस्टिकच्या पट्ट्या बांधून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्याने अशा प्रकारची उपाययोजना अपघात कसे रोखू शकेल? असा प्रश्न निर्माण झाला आहे.  नाशिकपासून पेठकडे जाताना दिंडोरी व पेठ तालुक्याच्या सीमारेषेवर सावळघाट आहे. एका बाजूला उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूला खोल दरी असल्याने या घाटातून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. घाटाच्या संरक्षक भिंती ढासळल्या आहेत. अनेक वळणांवर धोकादायक स्थिती निर्माण झाली असताना घाटाच्या मध्यभागी एका अवघड वळणावर दरीच्या दिशेने संरक्षक कठडाच नसल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित यंत्रणेने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी रस्त्याच्या कडेला लोखंडी टिपडे ठेवून त्याला दोरी बांधून तात्पुरती मलमपट्टी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.दिशादर्शक फलक झाले गायबसावळघाट सुरू होतानाच तीव्र वळण असल्याने रात्रीच्या अंधारात व दाट धुक्यात हे वळण दिसत नसल्याने वाहने सरळ जाऊन आदळतात. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दिशादर्शक फलक नसल्याने वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मध्यंतरी घाटात लावलेल्या दिशादर्शक फलकांवर चक्क गणपतीच्या रेडियम प्रतिमा चिटकविण्याची किमया प्रशासनाकडून करण्यात आली होती. यावर भाविकांनी आक्षेप नोंदविल्याने ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन अशा प्रतिमा काढून टाकण्यात आल्या असल्या तरी त्यानंतर त्यावर रेडियम लावले नसल्याने अपघाताला आमंत्रण देण्याची वेळ आली आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक