शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जीर्ण पुलांमुळे प्रवास धोक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 01:10 IST

सटाणा : बागलाण तालुक्यात आजही पुल व रस्त्यांचा अनुशेष मोठा आहे. पुल अभावी आजही मोसम, आरम, हत्ती, कान्हेरी, करंजाडी या नद्यांवर योग्य पुल नसल्यामुळे तसेच आहेत ते पुल धोकेदायक बनल्याने पावसाळ्यात खेड्यापाड्यांचा संपर्क तुटून ग्रामीण भागाचे दळणवळण ठप्प होत आहे. ही पावसाळ्यातील मोठी डोकेदुखी आहे.

सटाणा : बागलाण तालुक्यात आजही पुल व रस्त्यांचा अनुशेष मोठा आहे. पुल अभावी आजही मोसम, आरम, हत्ती, कान्हेरी, करंजाडी या नद्यांवर योग्य पुल नसल्यामुळे तसेच आहेत ते पुल धोकेदायक बनल्याने पावसाळ्यात खेड्यापाड्यांचा संपर्क तुटून ग्रामीण भागाचे दळणवळण ठप्प होत आहे. ही पावसाळ्यातील मोठी डोकेदुखी आहे. त्यामुळे शासनाने पुलांचा अनुशेष भरून काढल्यास बागलाण मधील रस्त्यांचे जाळे भक्कम होऊन विकासाला मोठा हातभार लागणार आहे.बागलाण तालुक्यातील भडाणे, पिंपळकोठे, दरेगाव, नांदीन, तांदुळवाडी, धुळे जिल्ह्याला जोडणारी पिसोळबारी, वाडीपिसोळ, मेंढीपाडे, जयपूर, श्रीपूरवडे, टिंगरी, बिलपुरी, बोढरी, तळवाडे ही गावे मोसम नदीच्या उत्तरेकडील सोळा गाव काटवन मध्ये येणारी आहेत. दळणवळण सुरळीत व्हावे म्हणून आणि साक्र ी तालुक्याकडे जाणारा जवळच मार्ग म्हणून सोमपूर नजीक मोसम नदीपात्रावर गेल्या वीस वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आला. मात्र नदीचे पात्र मोठे असतांना सुरुवातील कमी गाळ्याचा पूल बांधण्यात आला. यामुळे नदीला पावसाळ्यात आलेल्या पुरात भराव वाहून गेल्यामुळे वाहतूकठप्प होऊन गावांचा संपर्क तुटला. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने भराव टाकून वाहतूक सुरळीत केली मात्र पुन्हा एक वर्षांनी तीच डोकेदुखी. यामुळे पुन्हा तीन गाळे वाढविण्यात आले. हत्ती नदीवर धोका कायम बागलाण तालुक्यातील वनोली, चौंधाणे रस्त्यावरील हत्ती नदीवरील पुल पूर्णपणे धोकेदायक बनला आहे .गेल्या सहा ते सात वर्षांपूर्वी लाखो रु पये खर्चून पुल उभारण्यात आला होता .मात्र निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे अतिशय धोकेदायक बनला आहे .पुल अक्षरश: वाळूच्या आधारावर असल्यामुळे केव्हाही मोठी दुर्घटना घडू शकते .हा मार्ग पश्चिम भागातील २५ ते ३० गावांना जोडणारा जवळचा मार्ग आहे. हा पुल धोकेदायक बनल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने प्रवाशांना वीस किलोमीटरचा फेरा मारून वीरगाव व वनोलीकडे जावे लागत आहे.जायखेडा, मुल्हेर, वाघळे येथील मोसम नदीपात्रावरील फरशी पुलांची डोकेदुखी नेहमीची आहे. पावसाळ्यात नदीला पूर आल्यास हे चारही फरशी पूल पाण्याखाली जावून गावांचा संपर्क तुटत असतो.शासनाने या मार्गावरील वाहनाच्या वर्दळीचा विचार करून उंच पूल उभारण्याची गरज आहे. सटाणा-डांगसौंदाणे रस्त्यावरील चौधाणे गावानजीक असलेल्या पुलाची देखील अत्यंत दुरवस्था झाली आहे. कळवण तालुका व गुजरातला जोडणारा जवळचा मार्ग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. यंदा पहिल्याच पावसात या पुलाची रेलिंग तुटल्याने सदर पुल वाहतुकीसाठी अतिशय धोकेदायक बनला आहे. या पुलाची उंची तसेच रु ंदी वाढविणे आवश्यक आहे. अन्यथा पावसाळ्यात नाल्याला पूर आल्यास हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होऊन जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता अधिक आहे.

टॅग्स :Nashikनाशिक