शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

जीर्ण पुलांमुळे प्रवास धोक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 01:10 IST

सटाणा : बागलाण तालुक्यात आजही पुल व रस्त्यांचा अनुशेष मोठा आहे. पुल अभावी आजही मोसम, आरम, हत्ती, कान्हेरी, करंजाडी या नद्यांवर योग्य पुल नसल्यामुळे तसेच आहेत ते पुल धोकेदायक बनल्याने पावसाळ्यात खेड्यापाड्यांचा संपर्क तुटून ग्रामीण भागाचे दळणवळण ठप्प होत आहे. ही पावसाळ्यातील मोठी डोकेदुखी आहे.

सटाणा : बागलाण तालुक्यात आजही पुल व रस्त्यांचा अनुशेष मोठा आहे. पुल अभावी आजही मोसम, आरम, हत्ती, कान्हेरी, करंजाडी या नद्यांवर योग्य पुल नसल्यामुळे तसेच आहेत ते पुल धोकेदायक बनल्याने पावसाळ्यात खेड्यापाड्यांचा संपर्क तुटून ग्रामीण भागाचे दळणवळण ठप्प होत आहे. ही पावसाळ्यातील मोठी डोकेदुखी आहे. त्यामुळे शासनाने पुलांचा अनुशेष भरून काढल्यास बागलाण मधील रस्त्यांचे जाळे भक्कम होऊन विकासाला मोठा हातभार लागणार आहे.बागलाण तालुक्यातील भडाणे, पिंपळकोठे, दरेगाव, नांदीन, तांदुळवाडी, धुळे जिल्ह्याला जोडणारी पिसोळबारी, वाडीपिसोळ, मेंढीपाडे, जयपूर, श्रीपूरवडे, टिंगरी, बिलपुरी, बोढरी, तळवाडे ही गावे मोसम नदीच्या उत्तरेकडील सोळा गाव काटवन मध्ये येणारी आहेत. दळणवळण सुरळीत व्हावे म्हणून आणि साक्र ी तालुक्याकडे जाणारा जवळच मार्ग म्हणून सोमपूर नजीक मोसम नदीपात्रावर गेल्या वीस वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आला. मात्र नदीचे पात्र मोठे असतांना सुरुवातील कमी गाळ्याचा पूल बांधण्यात आला. यामुळे नदीला पावसाळ्यात आलेल्या पुरात भराव वाहून गेल्यामुळे वाहतूकठप्प होऊन गावांचा संपर्क तुटला. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने भराव टाकून वाहतूक सुरळीत केली मात्र पुन्हा एक वर्षांनी तीच डोकेदुखी. यामुळे पुन्हा तीन गाळे वाढविण्यात आले. हत्ती नदीवर धोका कायम बागलाण तालुक्यातील वनोली, चौंधाणे रस्त्यावरील हत्ती नदीवरील पुल पूर्णपणे धोकेदायक बनला आहे .गेल्या सहा ते सात वर्षांपूर्वी लाखो रु पये खर्चून पुल उभारण्यात आला होता .मात्र निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे अतिशय धोकेदायक बनला आहे .पुल अक्षरश: वाळूच्या आधारावर असल्यामुळे केव्हाही मोठी दुर्घटना घडू शकते .हा मार्ग पश्चिम भागातील २५ ते ३० गावांना जोडणारा जवळचा मार्ग आहे. हा पुल धोकेदायक बनल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने प्रवाशांना वीस किलोमीटरचा फेरा मारून वीरगाव व वनोलीकडे जावे लागत आहे.जायखेडा, मुल्हेर, वाघळे येथील मोसम नदीपात्रावरील फरशी पुलांची डोकेदुखी नेहमीची आहे. पावसाळ्यात नदीला पूर आल्यास हे चारही फरशी पूल पाण्याखाली जावून गावांचा संपर्क तुटत असतो.शासनाने या मार्गावरील वाहनाच्या वर्दळीचा विचार करून उंच पूल उभारण्याची गरज आहे. सटाणा-डांगसौंदाणे रस्त्यावरील चौधाणे गावानजीक असलेल्या पुलाची देखील अत्यंत दुरवस्था झाली आहे. कळवण तालुका व गुजरातला जोडणारा जवळचा मार्ग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. यंदा पहिल्याच पावसात या पुलाची रेलिंग तुटल्याने सदर पुल वाहतुकीसाठी अतिशय धोकेदायक बनला आहे. या पुलाची उंची तसेच रु ंदी वाढविणे आवश्यक आहे. अन्यथा पावसाळ्यात नाल्याला पूर आल्यास हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होऊन जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता अधिक आहे.

टॅग्स :Nashikनाशिक