शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

जीर्ण पुलांमुळे प्रवास धोक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 01:10 IST

सटाणा : बागलाण तालुक्यात आजही पुल व रस्त्यांचा अनुशेष मोठा आहे. पुल अभावी आजही मोसम, आरम, हत्ती, कान्हेरी, करंजाडी या नद्यांवर योग्य पुल नसल्यामुळे तसेच आहेत ते पुल धोकेदायक बनल्याने पावसाळ्यात खेड्यापाड्यांचा संपर्क तुटून ग्रामीण भागाचे दळणवळण ठप्प होत आहे. ही पावसाळ्यातील मोठी डोकेदुखी आहे.

सटाणा : बागलाण तालुक्यात आजही पुल व रस्त्यांचा अनुशेष मोठा आहे. पुल अभावी आजही मोसम, आरम, हत्ती, कान्हेरी, करंजाडी या नद्यांवर योग्य पुल नसल्यामुळे तसेच आहेत ते पुल धोकेदायक बनल्याने पावसाळ्यात खेड्यापाड्यांचा संपर्क तुटून ग्रामीण भागाचे दळणवळण ठप्प होत आहे. ही पावसाळ्यातील मोठी डोकेदुखी आहे. त्यामुळे शासनाने पुलांचा अनुशेष भरून काढल्यास बागलाण मधील रस्त्यांचे जाळे भक्कम होऊन विकासाला मोठा हातभार लागणार आहे.बागलाण तालुक्यातील भडाणे, पिंपळकोठे, दरेगाव, नांदीन, तांदुळवाडी, धुळे जिल्ह्याला जोडणारी पिसोळबारी, वाडीपिसोळ, मेंढीपाडे, जयपूर, श्रीपूरवडे, टिंगरी, बिलपुरी, बोढरी, तळवाडे ही गावे मोसम नदीच्या उत्तरेकडील सोळा गाव काटवन मध्ये येणारी आहेत. दळणवळण सुरळीत व्हावे म्हणून आणि साक्र ी तालुक्याकडे जाणारा जवळच मार्ग म्हणून सोमपूर नजीक मोसम नदीपात्रावर गेल्या वीस वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आला. मात्र नदीचे पात्र मोठे असतांना सुरुवातील कमी गाळ्याचा पूल बांधण्यात आला. यामुळे नदीला पावसाळ्यात आलेल्या पुरात भराव वाहून गेल्यामुळे वाहतूकठप्प होऊन गावांचा संपर्क तुटला. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने भराव टाकून वाहतूक सुरळीत केली मात्र पुन्हा एक वर्षांनी तीच डोकेदुखी. यामुळे पुन्हा तीन गाळे वाढविण्यात आले. हत्ती नदीवर धोका कायम बागलाण तालुक्यातील वनोली, चौंधाणे रस्त्यावरील हत्ती नदीवरील पुल पूर्णपणे धोकेदायक बनला आहे .गेल्या सहा ते सात वर्षांपूर्वी लाखो रु पये खर्चून पुल उभारण्यात आला होता .मात्र निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे अतिशय धोकेदायक बनला आहे .पुल अक्षरश: वाळूच्या आधारावर असल्यामुळे केव्हाही मोठी दुर्घटना घडू शकते .हा मार्ग पश्चिम भागातील २५ ते ३० गावांना जोडणारा जवळचा मार्ग आहे. हा पुल धोकेदायक बनल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने प्रवाशांना वीस किलोमीटरचा फेरा मारून वीरगाव व वनोलीकडे जावे लागत आहे.जायखेडा, मुल्हेर, वाघळे येथील मोसम नदीपात्रावरील फरशी पुलांची डोकेदुखी नेहमीची आहे. पावसाळ्यात नदीला पूर आल्यास हे चारही फरशी पूल पाण्याखाली जावून गावांचा संपर्क तुटत असतो.शासनाने या मार्गावरील वाहनाच्या वर्दळीचा विचार करून उंच पूल उभारण्याची गरज आहे. सटाणा-डांगसौंदाणे रस्त्यावरील चौधाणे गावानजीक असलेल्या पुलाची देखील अत्यंत दुरवस्था झाली आहे. कळवण तालुका व गुजरातला जोडणारा जवळचा मार्ग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. यंदा पहिल्याच पावसात या पुलाची रेलिंग तुटल्याने सदर पुल वाहतुकीसाठी अतिशय धोकेदायक बनला आहे. या पुलाची उंची तसेच रु ंदी वाढविणे आवश्यक आहे. अन्यथा पावसाळ्यात नाल्याला पूर आल्यास हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होऊन जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता अधिक आहे.

टॅग्स :Nashikनाशिक