शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मुंबई-आग्रा महामार्गावरील बसथांबे धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:14 IST

मुंबई-आग्रा महामार्गावरील धात्रक फाटा, समर्थनगर, कोणार्क येथील शहर बसथांबा प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. प्रवाशांचे केंद्र असलेले हे बसथांबे महामार्गाच्या विस्तारीकरणानंतर अडचणीचे ठरत असून, वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागत आहे.

आडगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील धात्रक फाटा, समर्थनगर, कोणार्क येथील शहर बसथांबा प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. प्रवाशांचे केंद्र असलेले हे बसथांबे महामार्गाच्या विस्तारीकरणानंतर अडचणीचे ठरत असून, वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागत आहे.  सदरचे बसथांबे हे पूर्वी महामार्गावर होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण नव्हती. महामार्गाच्या विस्तारीकरणानंतर या मार्गावर तीन दुभाजक टाकले आहेत. हे दुभाजक टाकताना दोन्ही सर्व्हीस रस्त्यांच्या बाजूने हनुमाननगरपासून जत्रा हॉटेलपर्यंत लोखंडी जाळ्या टाकल्या आहेत. शहर वाहतुकीच्या बसेस या सर्व्हीस रोडने धावत असल्या तरी एक बाजूने प्रवाशांना प्रवाशांना बस पकडण्यासाठी या जाळ्यांवरून उडी मारून बस पकडावी लागते. तसेच महिलांना जाळी ओलांडणे शक्य होत नाही. त्यामुळे तासनतास प्रतीक्षा करावी लागते. या थांब्यावर स्थानिक नागरिक, एच.ए.एल.चे कर्मचारी, महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी यांची सदैव वर्दळ असते. बस आल्यानंतर पकडण्यासाठी एकच झुंबड उडत असल्याने अनेक जण जाळ्यांवरून पडून जखमी होतात. तसेच सर्व्हिस रोडवरील वाहनांना या गर्दीमुळे अडथळा येऊन अपघातही होतात.  पालकांना यामुळे आपल्या शालेय पाल्यांना सोडण्यासाठी हनुमाननगर किवा जत्रा थांबा येथे जावे लागते. यामुळे अंतर तर वाढतेच, पण या दोन्ही थांब्यांवर वाहतुकीची गर्दी होते. दुभाजकांमुळे दुखापती होण्याची व मोठ्या अपघाताला आमंत्रण मिळण्याची शक्यता यामुळे बळावली आहे. त्यामुळे येथील बसथांबे अडचणीचे ठरत आहे.रिक्षाचालक घेतात फायदामहामार्गारील या बसथांब्यावर लोखंडी दुभाजक ओलांडणे वयोवृद्ध, महिलांना अडचणीचे ठरते. त्यामुळे त्यांना नाईलाजाने रिक्षाने जावे लागते किंवा काही किलोमीटर अंतरावरून दुसऱ्या बसस्थानकावर बस पकडण्यासाठी जावे लागते त्यामुळे या परिस्थितीचा रिक्षाचालकांकडून गैरफायदा जास्तीची भाडे आकारून लूट केली जाते.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा