शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धुक्यामुळे द्राक्षबागायतदार धास्तावले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 13:01 IST

पांडाणे : दिंडोरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून अचानक आलेल्या धुक्यामुळे व वाढलेल्या थंडीमुळे द्राक्षबागायतदार धास्तावले आहे.

पांडाणे : दिंडोरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून अचानक आलेल्या धुक्यामुळे व वाढलेल्या थंडीमुळे द्राक्षबागायतदार धास्तावले आहे.दिंडोरी तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून वातावरणात सातत्याने बदल होत असल्यामुळे कधी धुके , कधी थंडी कधी ऊन , कधी गारवा सुटल्यामुळे द्राक्षबागायतदारांचे तोंडाचे पाणी पळाले आहे. द्राक्षबागा वाचविण्यासाठी कसरत करावी लागत असल्यामुळे महागडी औषधांचा काही परिणाम होत नसल्याचे उत्पादक श्रीराम चौरे यांनी सांगितले .दिंडोरी तालुक्यात ७० ते ८० टक्के बागायतदार आपले द्राक्ष हे निर्यातक्षम बनवून निर्यात करत असतात. परंतु या वर्षी द्राक्षबाग छाटणी केल्यानंतर सतत पावसामुळे आपले द्राक्ष पिक वाचविण्यासाठी अतोनात पर्यत करून पोग्यातल्या राणापासून ते फुलारा पास करु न द्राक्षमनी सेंटींगपर्यत द्राक्षांना आपल्या लहान मुलाप्रमाणे निगा ठेवली. मात्र आता अचानक वाढलेल्या थंडीमुळे व धुक्यामुळे द्राक्ष पिकावर डावणी व भूरी रोगाचा प्रार्दूभाव होत असल्यामुळे दिवसातून दोन वेळा महागडी औषधांची फवारणी करावी लागत आहे. उत्पन्नापेक्षा खर्च वाढत असून अशा लहरी वातावरणापासून द्राक्ष पिक व्यापाऱ्याकडे जाईपर्यत भितीने द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त झाला आहे .

टॅग्स :Nashikनाशिक