शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई नाका ते आडगाव नाक्यापर्यंत धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 00:58 IST

नाशिक : शहरात प्रवेश करताना मुंबई नाका येथून थेट द्वारकेच्या पुढे स्वामीनारायण मंदिरापर्यंतचा मुंबई-आग्रा महामार्ग सुमारे दहा दिवसांपासून बॅरिकेड्स ...

ठळक मुद्देमहामार्गावर प्रवेश ‘बंद’दहा दिवसांपासून बॅरिकेड्स ।

नाशिक : शहरात प्रवेश करताना मुंबई नाका येथून थेट द्वारकेच्या पुढे स्वामीनारायण मंदिरापर्यंतचा मुंबई-आग्रा महामार्ग सुमारे दहा दिवसांपासून बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला आहे. यामुळे समांतर रस्त्यावर दुतर्फा वाहतुकीचा ताण निर्माण होत आहे. पावसाच्या रिपरिपमुळे आणि उड्डाणपुलाच्या गळक्या पाइपलाइन-मधून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याने महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. ठिकठिकाणी रस्ता निसरडा बनल्याने वाहने घसरून अपघातांना निमंत्रण मिळू लागल्याने रस्ता बंद केला गेला; मात्र महामार्ग प्राधिकरणाकडून रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला गती दिली जात नसल्याने वाहनचालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.मुंबई-आग्रा महामार्गावर मुंबई नाक्यापासून तर थेट स्वामीनारायण मंदिरापर्यंत ठिकठिकाणी चिखल पसरल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून मुंबई नाका, द्वारका, वडाळा नाका, टाकळी फाटा, जुना आडगाव नाका आदी चौफुल्यांवर बॅरिकेड्स लावून महामार्ग बंद करण्यात आला आहे. द्वारकेवरून आडगावकडे ‘नो एण्ट्री’एकीकडे महामार्ग निसरडा व धोकादायक झाला असताना द्वारका चौकातून आडगावकडे जाण्यासाठी उड्डाणपुलावरदेखील अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. यामुळे अवजड व शहरातील हलकी वाहने समांतर रस्त्यावरून मार्गस्थ होत आहेत. त्यामुळे रस्त्याची चाळण झाली असून, लहान-मोठे अपघात घडत आहेत.महामार्ग तत्काळ सुरक्षित कराशहर वाहतूक शाखेचे अधिकारी व प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या भागाची पाहणी करून स्वच्छतेचे काम मार्गी लावण्याचे आदेश द्यावेत आणि वाहतूक सुरळीत करण्यास हातभार लावावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. सोमवारी (दि.३१) पावसाने उघडीप दिली होती तसेच दुपारनंतर अधूनमधून सूर्यदर्शनही घडल्याने चिखल कोरडा होण्यास मदत झाली. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने तातडीने मुंबई नाका ते स्वामीनारायण मंदिरापर्यंतचा महामार्ग सुरक्षित करून तो खुला करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.या मार्गावरील वाहतूक समांतर रस्त्याने वळवण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. गेल्या सोमवारपासून हा रस्ता बंद करण्यात आला असून, अग्निशमन दलाच्या मदतीनेतसेच प्राधिकरणाकडून ठिकठिकाणचा चिखल काढून रस्ता सुरक्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र हे काम अत्यंत संथ गतीने होत असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग