शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

मुंबई नाका ते आडगाव नाक्यापर्यंत धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 00:58 IST

नाशिक : शहरात प्रवेश करताना मुंबई नाका येथून थेट द्वारकेच्या पुढे स्वामीनारायण मंदिरापर्यंतचा मुंबई-आग्रा महामार्ग सुमारे दहा दिवसांपासून बॅरिकेड्स ...

ठळक मुद्देमहामार्गावर प्रवेश ‘बंद’दहा दिवसांपासून बॅरिकेड्स ।

नाशिक : शहरात प्रवेश करताना मुंबई नाका येथून थेट द्वारकेच्या पुढे स्वामीनारायण मंदिरापर्यंतचा मुंबई-आग्रा महामार्ग सुमारे दहा दिवसांपासून बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला आहे. यामुळे समांतर रस्त्यावर दुतर्फा वाहतुकीचा ताण निर्माण होत आहे. पावसाच्या रिपरिपमुळे आणि उड्डाणपुलाच्या गळक्या पाइपलाइन-मधून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याने महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. ठिकठिकाणी रस्ता निसरडा बनल्याने वाहने घसरून अपघातांना निमंत्रण मिळू लागल्याने रस्ता बंद केला गेला; मात्र महामार्ग प्राधिकरणाकडून रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला गती दिली जात नसल्याने वाहनचालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.मुंबई-आग्रा महामार्गावर मुंबई नाक्यापासून तर थेट स्वामीनारायण मंदिरापर्यंत ठिकठिकाणी चिखल पसरल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून मुंबई नाका, द्वारका, वडाळा नाका, टाकळी फाटा, जुना आडगाव नाका आदी चौफुल्यांवर बॅरिकेड्स लावून महामार्ग बंद करण्यात आला आहे. द्वारकेवरून आडगावकडे ‘नो एण्ट्री’एकीकडे महामार्ग निसरडा व धोकादायक झाला असताना द्वारका चौकातून आडगावकडे जाण्यासाठी उड्डाणपुलावरदेखील अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. यामुळे अवजड व शहरातील हलकी वाहने समांतर रस्त्यावरून मार्गस्थ होत आहेत. त्यामुळे रस्त्याची चाळण झाली असून, लहान-मोठे अपघात घडत आहेत.महामार्ग तत्काळ सुरक्षित कराशहर वाहतूक शाखेचे अधिकारी व प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या भागाची पाहणी करून स्वच्छतेचे काम मार्गी लावण्याचे आदेश द्यावेत आणि वाहतूक सुरळीत करण्यास हातभार लावावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. सोमवारी (दि.३१) पावसाने उघडीप दिली होती तसेच दुपारनंतर अधूनमधून सूर्यदर्शनही घडल्याने चिखल कोरडा होण्यास मदत झाली. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने तातडीने मुंबई नाका ते स्वामीनारायण मंदिरापर्यंतचा महामार्ग सुरक्षित करून तो खुला करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.या मार्गावरील वाहतूक समांतर रस्त्याने वळवण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. गेल्या सोमवारपासून हा रस्ता बंद करण्यात आला असून, अग्निशमन दलाच्या मदतीनेतसेच प्राधिकरणाकडून ठिकठिकाणचा चिखल काढून रस्ता सुरक्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र हे काम अत्यंत संथ गतीने होत असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग