शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

‘स्वाभिमानी’चे धरणे

By admin | Updated: September 13, 2014 00:53 IST

‘स्वाभिमानी’चे धरणे

 

नाशिक : कांद्याचे कोसळलेले भाव व डाळिंबाच्या होणाऱ्या नुकसानीस केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला. दरम्यान, संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाला छावणीचे रूप प्राप्त झाले होते.संघटनेचे प्रांतिक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. त्यात प्रामुख्याने कांदा व डाळींब उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदी यांनी मागच्याच सरकारचे धोरण राबविण्यास सुरुवात केल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. केंद्र सरकारने परदेशातून कांद्याची आयात केल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, कांदा व बटाट्याला जीवनावश्यक वस्तूंमध्ये समाविष्ट करण्यात आल्याने आता त्यांची आधारभूत किंमतही जाहीर करण्यात यावी. शासनाने परदेशातून तीन हजार रुपये क्विंटलने कांदा आयात केला; मग देशातील शेतकऱ्यांचा कांदा याच दराने का खरेदी केला जात नाही, असा सवाल उपस्थित केला. डाळिंबावर तेल्या रोगाने आक्रमण केल्याने शासनाने त्यासाठी पॅकेज जाहीर करावे, कांदा निर्यातीला केंद्र सरकारने अनुदान द्यावे, कांदा निर्यातमुक्त करावा, कांदा-बटाट्याला जीवनावश्यक वस्तूंमधून वगळण्यात यावे, किमान निर्यातमूल्य शून्य करावे, तीन हजार रुपये आधारमूल्य ठरवावे, डाळिंबाची निर्यात वाढवून अनुदानाचे प्रोत्साहन द्यावे, टोमॅटो निर्यातीला प्रोत्साहन देऊन आयातीला निर्बंध आणावेत अन्यथा सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. या आंदोलनात गोविंद पगार, दीपक पगार, शरद चव्हाण, हंसराज वडघुले, संजय वाघ, बापू जाधव, डोंगर पाटील आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)