शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

‘स्वाभिमानी’चे धरणे

By admin | Updated: September 13, 2014 00:53 IST

‘स्वाभिमानी’चे धरणे

 

नाशिक : कांद्याचे कोसळलेले भाव व डाळिंबाच्या होणाऱ्या नुकसानीस केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला. दरम्यान, संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाला छावणीचे रूप प्राप्त झाले होते.संघटनेचे प्रांतिक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. त्यात प्रामुख्याने कांदा व डाळींब उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदी यांनी मागच्याच सरकारचे धोरण राबविण्यास सुरुवात केल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. केंद्र सरकारने परदेशातून कांद्याची आयात केल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, कांदा व बटाट्याला जीवनावश्यक वस्तूंमध्ये समाविष्ट करण्यात आल्याने आता त्यांची आधारभूत किंमतही जाहीर करण्यात यावी. शासनाने परदेशातून तीन हजार रुपये क्विंटलने कांदा आयात केला; मग देशातील शेतकऱ्यांचा कांदा याच दराने का खरेदी केला जात नाही, असा सवाल उपस्थित केला. डाळिंबावर तेल्या रोगाने आक्रमण केल्याने शासनाने त्यासाठी पॅकेज जाहीर करावे, कांदा निर्यातीला केंद्र सरकारने अनुदान द्यावे, कांदा निर्यातमुक्त करावा, कांदा-बटाट्याला जीवनावश्यक वस्तूंमधून वगळण्यात यावे, किमान निर्यातमूल्य शून्य करावे, तीन हजार रुपये आधारमूल्य ठरवावे, डाळिंबाची निर्यात वाढवून अनुदानाचे प्रोत्साहन द्यावे, टोमॅटो निर्यातीला प्रोत्साहन देऊन आयातीला निर्बंध आणावेत अन्यथा सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. या आंदोलनात गोविंद पगार, दीपक पगार, शरद चव्हाण, हंसराज वडघुले, संजय वाघ, बापू जाधव, डोंगर पाटील आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)