शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

गोदाकाठावरील नुकसानीचे पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:21 IST

गोदावरी नदीला आलेल्या महापुरात नदीकाठ भागातील जवळपास पंचवीस ते तीस किलोमीटर हजारो हेक्टरचा परिसर जलमय झाला होता, या परिघातील दारणसांगवी, शिंपीटाकळी, नागापूर, चाटोरी, सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव, तारु खेडले, चापडगाव, मांजरगाव, गोंडेगाव शिवार या गावांना सर्वाधिक फटका बसला. आता शासनामार्फत नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

ठळक मुद्देशासनाकडून कार्यवाही : वस्तुनिष्ठ पंचनाम्याची मागणी

सायखेडा : गोदावरी नदीला आलेल्या महापुरात नदीकाठ भागातील जवळपास पंचवीस ते तीस किलोमीटर हजारो हेक्टरचा परिसर जलमय झाला होता, या परिघातील दारणसांगवी, शिंपीटाकळी, नागापूर, चाटोरी, सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव, तारु खेडले, चापडगाव, मांजरगाव, गोंडेगाव शिवार या गावांना सर्वाधिक फटका बसला. आता शासनामार्फत नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.गोदावरीला आलेल्या महापुरामुळे अनेक गावांना वेढले होते तर अनेक गावातील शिवारात अद्यापही पाणी साचले आहे. काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे तर अनेक दुकानात पाणी घुसल्याने लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान झाले आहे. घरातील भांडे, कपडे, धान्य वाहून गेल्याने संसार उघड्यावर पडला आहे. कांदा चाळींचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सलग चार दिवस पाणी राहिल्याने रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. झाडे उन्मळून पडली आहे. सर्वत्र कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अनेकांची जनावरे वाहून गेली आहे. शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.कर्मचाऱ्यांची संख्या वाढवातलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्यामार्फत पंचनामे सुरू झाले असले तरी पुराने मोठी जागा व्यापली असल्याने नागरिकांच्या घरांची योग्य आवरासावर होईपर्यंत पंचनामा करणारे पथक पोहोचणार नाही. त्यामुळे नुकसान होऊनही प्रत्यक्ष दर्शनी दिसणार नसल्याने पंचनामा होणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पंचनामे करणाºया कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.अनेक पिकांमध्ये अजूनही पाणी असल्याने उभे पीक सडून जात आहे, जनावरांचा चारा सडून गेल्याने चाºयाचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार