शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

कांदा आयातीनेच केले शेतकºयांचे नुकसान : पाशा पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:49 IST

नाशिक : भाववाढीमुळे कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा मिळाला असताना, दरांवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने इजिप्तहून कांदा आयात केल्यानेच शेतकºयांचे नुकसान झाल्याचा आरोप कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केला. कांदा आयातीला विरोध करणार असल्याचे सांगत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी मोदी सरकारला घरचा अहेर दिला आहे.

नाशिक : भाववाढीमुळे कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा मिळाला असताना, दरांवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने इजिप्तहून कांदा आयात केल्यानेच शेतकºयांचे नुकसान झाल्याचा आरोप कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केला. कांदा आयातीला विरोध करणार असल्याचे सांगत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी मोदी सरकारला घरचा अहेर दिला आहे.नाशवंत शेतमालाच्या उत्पादनाला चांगला दर मिळवून देण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समिती सदस्यांची सोमवारी तिसरी बैठक (दि. ११) नाशिक येथे झाली. या बैठकीनंतर पाशा पटेल यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्य सरकारने शेतमालासह फळपिकांना चांगले दर मिळवून देण्यासाठी कृषी पणन मंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या अध्यक्षतेखाली राज्य कृषी मूल्य आयोग गठित केला असून, या आयोगाची तिसरी बैठक सोमवारी नाशिकला झाली. बैठकीस पाशा पटेल यांच्यासह सह्णाद्री अ‍ॅग्रोचे विलास शिंदे, महाग्रेप्सचे सोपान कांचन, शेतकरी अंकुश पडवळ यांच्यासह राज्यभरातील ६० सदस्य उपस्थित होते. यावेळी पाशा पटेल म्हणाले, कांदा जीवनावश्यक पीक नाही. कांदा उत्पादक शेतकºयांना न्याय देण्यासाठी शीतगृहांसह निर्यातीचे धोरण ठरवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. कांदा उत्पादक शेतकºयांना भाववाढीमुळे चांगले पैसे मिळू लागले होते. परंतु, दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी इजिप्तहून कांदा आयात करण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा होता. त्यामुळे दरात घसरण झाली हा निर्णय शेतकºयांवर अन्याय करणारा ठरला आहे. कांदा आयातीच्या निर्णयाला यापुढे विरोध करणार असल्याचे सांगत पाशा पटेल यांनी केंद्र सरकारचा निर्णय चुकल्याचे म्हटले आहे. पाशा पटेल यांनी पुढे सांगितले की, भारतीय कांद्याला मागणी असणाºया देशांमध्ये कांदा निर्यात करण्यासाठी प्रयत्न केले जात असून, पुढील पाच वर्षांचे निर्यातीचे धोरण आखले जात आहे. गेल्या साठ वर्षांत शेतीमालाची व्यवस्था सडली असून, ती नव्याने उभारण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. कांद्याला चांगला हमीभाव देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी पाशा पटेल यांनी सांगितले.