शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
2
मुंबईत दुबार मतदारांचा गोंधळात गोंधळ सुरुच; पहिल्याच प्रयोगात नावाशी साधर्म्य असणारेच सर्वाधिक मतदार
3
पतीची हत्या करून ड्रममध्ये टाकणाऱ्या मुस्कानची नवी मागणी; तुरुंगात प्रियकरासाठी केली ही मागणी
4
कर्जासाठी कायपण! पाकिस्तानला विकावी लागणार सरकारी विमान कंपनी; 'फिल्ड मार्शल' मुनीर यांचा डोळा
5
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
6
"डोळे मिट, मनात इच्छा धर, फुंकर मार"... रोहित शर्मा- ऋषभ पंत यांचा भर मैदानात वेगळाच 'खेळ'; व्हिडिओ व्हायरल
7
भाजपाचं धक्कातंत्र सुरूच...! श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील शिंदेसेनेचे बडे नेते लावले गळाला
8
Post Office मध्ये ६० महिन्यांसाठी २ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल? पटापट चेक करा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
10
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
11
Bike Taxi: बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ' रॅपिडो, उबेर 'ला बसणार दणका; कंपन्यांवर गुन्हे दाखल होणार
12
संयुक्त राष्ट्रात १० दिवसांत भारताविरोधात ३ प्रस्ताव; रशियानं 'व्हेटो' वापरत निभावली मैत्री
13
प्रशिक्षणादरम्यान F-16C लढाऊ विमान वाळवंटात कोसळलं; कॅलिफोर्नियातील थरारक घटना!
14
रुपया नव्वदीपार, गाठला ऐतिहासिक तळ; महागाई वाढणार, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांना बसणार फटका
15
हळद पिवळी पोर कवळी...! तेजस्वीनी लोणारीची लगीनघाई, हळदी समारंभाचे फोटो समोर
16
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
17
चापलूस एआय तुमची हुजरेगिरी करायला सोकावले आहे!
18
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
19
विशेष लेख: व्हेंटिलेटरवर ठेवलेली ‘राज्यघटना’ समजून घेताना...
20
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरच्या पश्चिम पट्ट्यात कांदा, बटाटा पिकासह द्राक्षबागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 18:51 IST

सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गुरुवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ठाणगाव, विंचुरदळवी व पांढुर्ली परिसरातील शेतकऱ्यांच्या कांदा, बटाट्यासह द्राक्षबागांचे नुकसान झाले. तालुक्यातील विंचुरीदळवी, पांढुर्ली व ठाणगाव परिसरात गुरुवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान गारांसह अवकाळी पावसाने तुफान हजेरी लावली. या पावसामुळे कांदा, बटाटा पिकांना मोठा फटका बसला असून द्राक्षाचे नुकसान झाले आहे. शासनाने त्वरित नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा तडाखा : गारपिटीमुळे बळीराजा हवालदिल

सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गुरुवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ठाणगाव, विंचुरदळवी व पांढुर्ली परिसरातील शेतकऱ्यांच्या कांदा, बटाट्यासह द्राक्षबागांचे नुकसान झाले. तालुक्यातील विंचुरीदळवी, पांढुर्ली व ठाणगाव परिसरात गुरुवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान गारांसह अवकाळी पावसाने तुफान हजेरी लावली. या पावसामुळे कांदा, बटाटा पिकांना मोठा फटका बसला असून द्राक्षाचे नुकसान झाले आहे. शासनाने त्वरित नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.गुरुवारी सकाळपासूनच परिसरात ढगाळ वातावरण होते. अशातच सायंकाळी अचानक वादळ व पावसाला सुरुवात झाली. काही प्रमाणात गारांही पडल्या. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवडे, विंचुरीदळवी, घोरवड, पांढुर्ली, आगसखिंड, बेलू गावांमध्ये शेकडो एकरावर बटाटा व कांदा लागवड झालेली आहे. पावसामुळे कांदा व बटाटा पिकासह द्राक्ष बागांचेसुद्धा अतोनात नुकसान झाले. कांदा व बटाटा पिकावर करपा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.वातावरण बदलाने सुरुवातीपासूनच कांदा व बटाट्याला महागडी कीटकनाशके शेतकऱ्यांनी फवारली होती. त्यातच अवकाळीचा तडाखा, बाजारभावाची शाश्वती नाही अशा संकटात शेतकरी सापडला आहे. जगावे तरी कसे असे शेतकऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पुढील पिकांसाठीचे नियोजन कोलमडले आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना धीर द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.वातावरण बदलामुळे शेतकरी हवालदिलसततच्या वातावरण बदलामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे कांदा व बटाटा पीक हे पूर्णपणे वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. बटाटा बियाणे शेतकऱ्यांनी चढ्या दराने खरेदी केले होते. कांदा रोप बनविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली होती. बटाटा पिकाला अगदी लागवडीपासून वातावरणाचा फटका बसला होता. लागवडीच्या वेळेलाही अवकाळीचा सामना पिकांना करावा लागला होता. कसेबसे पीक हातात येण्याची आशा होती, परंतु अवकाळीने ती धुळीस मिळविली. 

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती