शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

सिन्नरच्या पश्चिम पट्ट्यात कांदा, बटाटा पिकासह द्राक्षबागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 18:51 IST

सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गुरुवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ठाणगाव, विंचुरदळवी व पांढुर्ली परिसरातील शेतकऱ्यांच्या कांदा, बटाट्यासह द्राक्षबागांचे नुकसान झाले. तालुक्यातील विंचुरीदळवी, पांढुर्ली व ठाणगाव परिसरात गुरुवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान गारांसह अवकाळी पावसाने तुफान हजेरी लावली. या पावसामुळे कांदा, बटाटा पिकांना मोठा फटका बसला असून द्राक्षाचे नुकसान झाले आहे. शासनाने त्वरित नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा तडाखा : गारपिटीमुळे बळीराजा हवालदिल

सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गुरुवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ठाणगाव, विंचुरदळवी व पांढुर्ली परिसरातील शेतकऱ्यांच्या कांदा, बटाट्यासह द्राक्षबागांचे नुकसान झाले. तालुक्यातील विंचुरीदळवी, पांढुर्ली व ठाणगाव परिसरात गुरुवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान गारांसह अवकाळी पावसाने तुफान हजेरी लावली. या पावसामुळे कांदा, बटाटा पिकांना मोठा फटका बसला असून द्राक्षाचे नुकसान झाले आहे. शासनाने त्वरित नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.गुरुवारी सकाळपासूनच परिसरात ढगाळ वातावरण होते. अशातच सायंकाळी अचानक वादळ व पावसाला सुरुवात झाली. काही प्रमाणात गारांही पडल्या. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवडे, विंचुरीदळवी, घोरवड, पांढुर्ली, आगसखिंड, बेलू गावांमध्ये शेकडो एकरावर बटाटा व कांदा लागवड झालेली आहे. पावसामुळे कांदा व बटाटा पिकासह द्राक्ष बागांचेसुद्धा अतोनात नुकसान झाले. कांदा व बटाटा पिकावर करपा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.वातावरण बदलाने सुरुवातीपासूनच कांदा व बटाट्याला महागडी कीटकनाशके शेतकऱ्यांनी फवारली होती. त्यातच अवकाळीचा तडाखा, बाजारभावाची शाश्वती नाही अशा संकटात शेतकरी सापडला आहे. जगावे तरी कसे असे शेतकऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पुढील पिकांसाठीचे नियोजन कोलमडले आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना धीर द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.वातावरण बदलामुळे शेतकरी हवालदिलसततच्या वातावरण बदलामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे कांदा व बटाटा पीक हे पूर्णपणे वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. बटाटा बियाणे शेतकऱ्यांनी चढ्या दराने खरेदी केले होते. कांदा रोप बनविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली होती. बटाटा पिकाला अगदी लागवडीपासून वातावरणाचा फटका बसला होता. लागवडीच्या वेळेलाही अवकाळीचा सामना पिकांना करावा लागला होता. कसेबसे पीक हातात येण्याची आशा होती, परंतु अवकाळीने ती धुळीस मिळविली. 

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती