शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

पाळे खुर्द परिसरात मुसळदार पाऊस शेती पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 22:06 IST

पाळे खुर्द : परिसरात गेल्या १० दिवसापासून धो धो कोसळणाऱ्या पावसाने गिरणा नदीला पूर आला आहे. त्याच प्रमाणे धरणक्षेत्रात पाउसाचा जोर अधिक असल्याने धरणामधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे.

ठळक मुद्दे विविध छोटी-मोठी धरणे १०० टक्के भरली आहेत.

पाळे खुर्द : परिसरात गेल्या १० दिवसापासून धो धो कोसळणाऱ्या पावसाने गिरणा नदीला पूर आला आहे. त्याच प्रमाणे धरणक्षेत्रात पाउसाचा जोर अधिक असल्याने धरणामधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे.चणकापूर मधून १७१९१ क्यूसेसने तर पुनंद मधून ७४७८ क्यूसेसने पूर पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. विविध धारणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. विविध छोटी-मोठी धरणे १०० टक्के भरली आहेत.पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे नदी काठावरील शेतीसाठी धरणातील पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असले तरी जनजीवन विस्कळीत झाले आहे. बहुतांश आसोली, कळमथे, दह्याने, बर्डे गावांचा संपर्क तुटला आहे.तसेच आदिवासी पट्यातही विक्र मी पाऊस सुरू आहे. नाले, ओहळांना पूर परिस्थिती असल्याने तेथील खेड्या-पाड्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. सर्व नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे रस्ते जागोजागी बंद झाले आहेत. कळवण तालुक्यातील पाळे खुर्द परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.चणकापूर गिरणा नदी पत्रातील परिस्थिती अधिक गंभीर गिरणा नदी काठच्या दह्याने, कळमथे, विठेवडी, आसोली, पाळे खुर्द, पाळे बुद्रुक, मानूर, एकलहरे येथील शेतामध्ये पाणी घुसल्याने मका, ऊस, टमाटे, पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. तालुक्यात एकूण सुमारे ३०० मिमी पाऊस पडला आहे. गेल्या तीन चार वर्षापासून नद्या-नाल्यांना पूर आला नव्हता. यावेळी पूर आला आहे. गेल्या १० दिवसापासून जोरदार पाऊस पडल्याने शेतकºयांना मोठा आधार मिळाला आहे.अति पावसाने शेतीतील पिकाचे प्रचंड नुकसान पिके पिवळी पडली आहेत काही शेतकºयांची जमिनी उपळून उठल्या आहेत. पावसामुळे शेतीकाम ठप्प झाली आहे. सतत पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकºयांनी घरातच थांबणे पसंत केले आहे. सतत पडणाºया पावसाने आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहेत. यावर्षी उशिरा पावसाने सुरुवात केली, मात्र पाळे खुर्द परिसरात पाणीच पाणी झले आहे.