शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

देवळा तालुक्यात कांदा रोपांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 17:34 IST

देवळा : तालुक्यात पावसामुळे नवीन लागवड केलेल्या पोळ कांद्याचे तसेच कांद्याच्या रोपांचे नुकसान झाले आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकर्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. उन्हाळी कांदा बियाण्याचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला असून बियाण्याच्या दरांनी उच्चांक गाठला आहे.

ठळक मुद्देअतिवृष्टीमुळे जमिनीची सुपीकता खालावली

देवळा : तालुक्यात पावसामुळे नवीन लागवड केलेल्या पोळ कांद्याचे तसेच कांद्याच्या रोपांचे नुकसान झाले आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकर्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. उन्हाळी कांदा बियाण्याचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला असून बियाण्याच्या दरांनी उच्चांक गाठला आहे.महिनाभरापासून दिवसभर अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत व नंतर उघडीप होत होती. यामुळे शेतीची कामांचा खोळंबा होत आहे. रब्बीची तयारी लांबणीवर पडत चालल्यामुळे शेतकरी चिंतित झाले आहेत. पावसामुळे शेतात उभे असलेले मक्याचे पीक अनेक ठिकाणी भुईसपाट झाले आहे. परतीच्या पावसामुळे नवीन लागवड केलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक कांदा उत्पादक शेतकर्यांनी रब्बी हंगामासाठी आतापर्यंत दोन ते तीन वेळा कांद्याचे बियाणे शेतात टाकले. परंतु सततच्या पावसामुळे हे बियाणे खराब झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. शेतकरी उन्हाळी कांदा बियाणे मिळवण्यासाठी शोधाशोध करीत असून कांदा बियाण्याचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे बियाण्याचे दर गगाणाला भिडले आहेत.तालुक्यातील बहुतेक नदी नाल्यांना पाणी वाहत असून काही धरणे व पाझरतलाव पाण्याने ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर आहेत.अतिवृष्टीमुळे जमिनीची सुपीकता खालावलीडोंगरगाव येथे सततच्या पावसाने डाळिंब, मका, कांदा रोपे पूर्णपणे खराब झाली आहेत. डाळींब फळे गळून गेली असून लागवड केलेल्या कांद्यावर विविध रोगांचे आक्र मण झाले आहे. अतिवृष्टीमुळे जमिनीची सुपीकता खालावल्यामुळे खते किंवा औषध फवारणी करूनही पिकांमध्ये सुधारणा होत नाही. शासनाने केलेल्या पीक पंचनाम्याची दखल घेऊन विमा कंपनीने शेतकर्यांना त्वरीत नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी डोंगरगावचे सरपंच दयाराम सावंत, खंडू सावंत, लालजी सावंत, मोठभाऊ सावंत ,पंढरीनाथ सावंत, शंकर सावंत ,विनोद सावंत आदी शेतकर्यांनी केली आहे.फोटो :डोंगरगाव येथे कांदा, डाळींब पीकांचे झालेले नुकसान.(फोटो : 14देवळा1,2)

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती