शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात भात शेतांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 20:55 IST

वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यातील पश्चिम पट्यात गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसाने भात शेती धोक्यात आली असुन अतिवृष्टीमुळे बांध फुटल्याने बहुतांश ठिकाणी भात शेती भुईसपाट झाली आहे. दरम्यान नुकसान झालेल्या भात शेतीचे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.

ठळक मुद्देशेवगेडांग - वैतरणा परिसरात नुकसादीचे पंचनामे करण्याची मागणी

वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यातील पश्चिम पट्यात गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसाने भात शेती धोक्यात आली असुन अतिवृष्टीमुळे बांध फुटल्याने बहुतांश ठिकाणी भात शेती भुईसपाट झाली आहे. दरम्यान नुकसान झालेल्या भात शेतीचे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.वैतरणा धरण परिसरात यावर्षी सर्वाधिक पावसाची नोंद झाली असुन अतिवृष्टीमुळे शेवगेडांग, म्हसुर्ली, वांजोळे, आहुर्ली, आवळी, सातुर्ली, ओंडली, नागोसली, वैतरणा, धारगाव आदी भागामध्ये भात शेतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे काही ठिकाणी बांध फुटुन शेती भुईसपाट झाली आहे, तर काही ठिकाणी शेती मलब्याखाली दबली गेली आहे. यामुळे शेतांचे मोठे नुकसान झाल्याने गतवर्षी भात पिके संकटात आली आहेत.वैतरणा परिसरात पावसाने सरासरी ओलांडली असुन इतिहासात प्रथम अशाप्रकारची अतिवृष्टी झाल्याचे बोलले जात असुन वैतरणा धरण गतवर्षी प्रथमच मृतसाठ्यापर्यंत पोहचले होते, यामुळे धरण भरते की नाही. अशा चर्चा रंगु लागल्या होत्या मात्र आठ दिवस झालेल्या अतिवृष्टी धरण तुडुंब भरून वाहु लागले. दरम्यान अतिवृष्टीने भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ प्रशासनाने पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी करत आहेत.वैतरणा - शेवगेडांग परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असुन भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील शेतांचे बांध फुटल्याने शेत पुर्णपणे भुईसपाट झाले आहेत. या नुकसानग्रस्तांचे तात्काळ पंचनामे करून भरपाई मिळावी.- विष्णू पोरजे,चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष.