शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

नुकसान पन्नास गावांचे, भरपाई दहा गावांना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 22:34 IST

सटाणा : तालुक्यात गेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे पन्नासहून अधिक गावातील पिकांची हानी झाली असताना राज्य शासनाने अवघ्या दहा गावांना दीड कोटी रुपयांची तुटपुंजी मदत करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कमीत कमी एकरी २५ हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देबागलाण तालुका : गारपीटची अवघी दीड कोटी रुपयांची मदत

सटाणा : तालुक्यात गेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे पन्नासहून अधिक गावातील पिकांची हानी झाली असताना राज्य शासनाने अवघ्या दहा गावांना दीड कोटी रुपयांची तुटपुंजी मदत करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कमीत कमी एकरी २५ हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.बागलाण तालुक्यात गेल्या १८ फेब्रुवारी रोजी गारपीट व अवकाळी पावसाने थैमान घालून मोसम, करंजाडी, कान्हेरी खोऱ्याला झोडपले होते. यात पन्नासहून अधिक गावातील पिकांची हानी झाली होती. पाच हजार हेक्टरपेक्षा अधिक कांदा पीक बाधित झाले तर गहू , हरभरा टमाटा, मिरची, अन्य भाजीपाला पीक, डाळिंब पिकाची हानी झाली होती. असे असताना बागलाण तालुक्यातील दहा गावांना फक्त १ कोटी ५४ लाख रुपयांची तुटपुंजी भरपाई देऊन बोळवण केली असल्याची टीका आमदार दिलीप बोरसे यांनी केली आहे. राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये भरपाई देण्यासोबतच उर्वरित नुकसानग्रस्त गावातील शेतकऱ्यांनाही भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.या गावांना मिळणार भरपाई१८ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या फळ पीक वगळून कांदा, कारले, मिरची, टमाटा, गहू, हरभरा पिकांना १ कोटी ५४ लाख ६७ हजार ४५ रुपये भरपाई अनुदान जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये शेवरे येथील २, पिंगळवाडे येथील १७, विजय नगर येथील ४९, ताहाराबाद येथील १२७ ,रावेर येथील २४३ , मुल्हेर येथील ९, अंतापूर येथील ९०३ ,अंबासन येथील १५८ ,मोराणे येथील ५३ आणि काकडगाव येथील १२ अशा एकूण १५७३ शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे.

टॅग्स :Governmentसरकारagricultureशेती