शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान पन्नास गावांचे, भरपाई दहा गावांना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 22:34 IST

सटाणा : तालुक्यात गेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे पन्नासहून अधिक गावातील पिकांची हानी झाली असताना राज्य शासनाने अवघ्या दहा गावांना दीड कोटी रुपयांची तुटपुंजी मदत करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कमीत कमी एकरी २५ हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देबागलाण तालुका : गारपीटची अवघी दीड कोटी रुपयांची मदत

सटाणा : तालुक्यात गेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे पन्नासहून अधिक गावातील पिकांची हानी झाली असताना राज्य शासनाने अवघ्या दहा गावांना दीड कोटी रुपयांची तुटपुंजी मदत करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कमीत कमी एकरी २५ हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.बागलाण तालुक्यात गेल्या १८ फेब्रुवारी रोजी गारपीट व अवकाळी पावसाने थैमान घालून मोसम, करंजाडी, कान्हेरी खोऱ्याला झोडपले होते. यात पन्नासहून अधिक गावातील पिकांची हानी झाली होती. पाच हजार हेक्टरपेक्षा अधिक कांदा पीक बाधित झाले तर गहू , हरभरा टमाटा, मिरची, अन्य भाजीपाला पीक, डाळिंब पिकाची हानी झाली होती. असे असताना बागलाण तालुक्यातील दहा गावांना फक्त १ कोटी ५४ लाख रुपयांची तुटपुंजी भरपाई देऊन बोळवण केली असल्याची टीका आमदार दिलीप बोरसे यांनी केली आहे. राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये भरपाई देण्यासोबतच उर्वरित नुकसानग्रस्त गावातील शेतकऱ्यांनाही भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.या गावांना मिळणार भरपाई१८ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या फळ पीक वगळून कांदा, कारले, मिरची, टमाटा, गहू, हरभरा पिकांना १ कोटी ५४ लाख ६७ हजार ४५ रुपये भरपाई अनुदान जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये शेवरे येथील २, पिंगळवाडे येथील १७, विजय नगर येथील ४९, ताहाराबाद येथील १२७ ,रावेर येथील २४३ , मुल्हेर येथील ९, अंतापूर येथील ९०३ ,अंबासन येथील १५८ ,मोराणे येथील ५३ आणि काकडगाव येथील १२ अशा एकूण १५७३ शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे.

टॅग्स :Governmentसरकारagricultureशेती