शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

अतिवृष्टीमुळे २१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:54 IST

जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पंचानामे सुरू करण्यात आले असून, जिल्ह्यातील २१ हजार ९०१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, तर ३२ हजार ४३३ शेतकरी बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्देप्राथमिक अहवाल : ३२ हजार शेतकरी बाधित

नाशिक : जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पंचानामे सुरू करण्यात आले असून, जिल्ह्यातील २१ हजार ९०१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, तर ३२ हजार ४३३ शेतकरी बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. सर्वाधिक नुकसान हे निफाड आणि इगतपुरी तालुक्यांत झाल्याची नोंद करण्यात आली आहे, तर बाधीत होणाऱ्या घरांची संख्या दिंडोरी तालुक्यात अधिक आहे. दरम्यान, प्राप्त होणाºया अहवालानुसार शासनाकडे तत्काळ मदतीसाठी अहवाल पाठविणार जाणार आहे.जिल्ह्यातील भयंकर पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रांताने दिले असून, त्यानुसार प्रांताधिकाऱ्यांनी पथके तयार करून शुक्रवारपासून (दि.९) पंचनामे सुरू केले आहेत. प्राथमिक अहवालात २१ हजार ९०१ हेक्टरवरील पिके बाधित झाल्याची माहिती समोर आली असून, ८८ गावे बाधीत झाली आहे, तर ३२ हजार ४३३ शेतकºयांना शेत नुकसानीचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात सातत्याने सुरू असलेला पाऊस आणि धरण क्षेत्रात झालेल्या विक्रमी पावसामुळे धरणातून विसर्ग करण्यात आल्यामुळे गोदावरी नदीला आलेल्या महापुरात अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे तीन हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेहोते. एनडीआरफच्या पथकाबरोबरच जिल्हा आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने मदतकार्य करण्यात आले. पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक कुटुंबे बाधित झाली, तर शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसला. उभी पिके पाण्यात गेल्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. दोन ते तीन दिवसांपासून लोक आपल्या घराकडेदेखील परतलेले नाही तर पुराची परिस्थिती भीषण असल्यामुळे लोक अजूनही पुरातून सावरलेले नाही.तालुकानिहाय बाधित झालेली गावे, क्षेत्रप्रांताधिकाºयांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात करण्यात आलेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची महिती प्रशासनाला प्राप्त झाली आहे. त्यानुसार नाशिक तालुक्यात ८८ गावे बाधित आहेत, तर २५,७३ हेक्टर पिके बाधित झाली आहेत. इगतपुरीत १२६ गावे, ९३९० शेतकरी बाधीत आहेत, तर १०३४९ हेक्टर पिके पाण्यात गेली आहेत. देवळा येथील सात गावांमध्ये ३४ हेक्टर, पेठ तालुक्यातील १४५ गावांमधील २१२ कुटुंबे बाधित आहेत, तर ३४ टक्के पिके अडचणीत आले आहेत. बागलाणमधील १४५ गावे, २२२ शेतकरी बाधित आहेत. पेठमध्ये ५५९ हेक्टर इतक्या पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. बागलाणमध्ये ३९ गावे तर ८०७ शेतकरी अडचणीत आहेत. निफाडमध्ये ४९ गावे बाधीत आहेत ६२१७ क्षेत्र, तर ३५०० शेतकरी बाधित आहेत. दिंडोरीत १५६ गावे, ४०० हेक्टर क्षेत्र, ७०० शेतकरी बाधित, त्र्यंबकेश्वर ८६ बाधित गावे आहेत, तर ६२० हेक्टर क्षेत्र तर ८५० शेतकरी बाधित झाले आहेत. सुरगाणा ३३ गावे ४८ हेक्टर क्षेत्र तर ७४ बाधित शेतकºयांची संख्या आहे. सिन्नर तालुक्यात २८ गावे बाधित असून, ५६१ हेक्टर क्षेत्र, तर ११७६ बाधित शेतकºयांची संख्या आहे. कळवणमधील अवघे गाव बाधित आहे. या गावातील ०.६४ क्षेत्र बाधित आहे, तर ५ शेतकरी पावसामुळे बाधित झाले आहेत.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयFarmerशेतकरीagricultureशेती