शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

धरण साठ्यात १० टक्क्यांनी वाढ

By admin | Updated: September 19, 2015 23:28 IST

२४ तासात सरासरी ९० मिलीमीटरची नोेंद

नाशिक : शुक्रवारी पहाटेपासून झालेल्या सलग १८ तासांच्या पावसामुळे जिल्ह्यातील धरण साठा सरासरी १० टक्क्यांनी वाढल्याचे वृत्त आहे. शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात १११६.२ (९० टक्के) मिलीमीटर पावसाची नोेंद करण्यात आली आहे. शनिवारी (दि. १९) सकाळी मात्र स्वच्छ सूर्यप्रकाश झाल्यानंतर दुपारी पावसाने तुरळक व मध्यम स्वरूपात हजेरी लावली.जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे ३ वाजेपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत सलग १८ तास पावसाने सर्वदूर हजेरी लावली. शनिवारी (दि. १९) सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ९० (१११६.२) मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात तालुकानिहाय नोेंदविण्यात आलेल्या पावसाची मिलीमीटरमध्ये आकडेवारी पुढीलप्रमाणे- नाशिक-८३.६, इगतपुरी- १२६, दिंडोरी- ९७, पेठ- ९५.५, त्र्यंबकेश्वर- २८, मालेगाव - २२, नांदगाव- २३, चांदवड - ४५.२, कळवण - १४८.१, बागलाण - ७८, सुरगाणा - ११५, देवळा - ४२.६, निफाड - ९७.२, सिन्नर - ५२, येवला - ६१ असा एकूण - १११६.२ (सरासरी ९० टक्के) नोंदविण्यात आला. पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून, खरिपास या पावसाचा फारसा फायदा होणार नसला तरी रब्बी हंगामासाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

जिल्ह्यातील धरण साठा

जिल्ह्यात शुक्रवारचा पाऊस होण्याआधी जेमतेम सरासरी ३२ टक्केपाणीसाठा होता. शुक्रवारच्या पावसानंतर तो थेट सरासरी ४२ टक्के इतका झाला आहे. जिल्ह्यातील धरण साठा दलघफूमध्ये पुढीलप्रमाणे - कंसात एकूण टक्केवारी- गंगापूर- ३७६६ (६७ टक्के),  काश्यपी - ९११ (४९), गौतम गोदावरी- ८८0 (४७), पालखेड- ६४७ (८६),  करंजवण- १७५८ (३३), वाघाड- १३0३ (५२), ओझरखेड- ५८१ (२७),  पुणेगाव- ४१५ (६७), तिसगाव- १७९ (४0), दारणा- ४९४९ (६९), भावली-१३८७ (९७), मुकणे- २२३७ (३१), वालदेवी- ८६१ (७६), नांदुरमधमेश्‍वर-१६९ (६६), कडवा- १४७0 (७९), आळंदी- ५५५ (५७), भोजापूर- ८२ (१८),  चणकापूर- २२५२ (८३), पुनंद- १0११ (७२),  हरणबारी- १0५४ (९0), केळझर- ४५८ (८0), नागासाक्या- 00 (0), गिरणा- ६५६ (४) असा एकूण जिल्ह्यातील लहान-मोठे प्रकल्प मिळून ६६ हजार ३५४ पैकी २७ हजार ५८१ (४२ टक्के ) दलघफू इतका झाला आहे.