शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
2
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
3
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
4
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
5
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
6
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
7
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
8
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
9
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
10
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केले दुःख
11
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
12
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
13
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
14
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
15
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
16
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
17
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
18
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
19
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
20
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
Daily Top 2Weekly Top 5

धरण साठ्यात १० टक्क्यांनी वाढ

By admin | Updated: September 19, 2015 23:28 IST

२४ तासात सरासरी ९० मिलीमीटरची नोेंद

नाशिक : शुक्रवारी पहाटेपासून झालेल्या सलग १८ तासांच्या पावसामुळे जिल्ह्यातील धरण साठा सरासरी १० टक्क्यांनी वाढल्याचे वृत्त आहे. शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात १११६.२ (९० टक्के) मिलीमीटर पावसाची नोेंद करण्यात आली आहे. शनिवारी (दि. १९) सकाळी मात्र स्वच्छ सूर्यप्रकाश झाल्यानंतर दुपारी पावसाने तुरळक व मध्यम स्वरूपात हजेरी लावली.जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे ३ वाजेपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत सलग १८ तास पावसाने सर्वदूर हजेरी लावली. शनिवारी (दि. १९) सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ९० (१११६.२) मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात तालुकानिहाय नोेंदविण्यात आलेल्या पावसाची मिलीमीटरमध्ये आकडेवारी पुढीलप्रमाणे- नाशिक-८३.६, इगतपुरी- १२६, दिंडोरी- ९७, पेठ- ९५.५, त्र्यंबकेश्वर- २८, मालेगाव - २२, नांदगाव- २३, चांदवड - ४५.२, कळवण - १४८.१, बागलाण - ७८, सुरगाणा - ११५, देवळा - ४२.६, निफाड - ९७.२, सिन्नर - ५२, येवला - ६१ असा एकूण - १११६.२ (सरासरी ९० टक्के) नोंदविण्यात आला. पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून, खरिपास या पावसाचा फारसा फायदा होणार नसला तरी रब्बी हंगामासाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

जिल्ह्यातील धरण साठा

जिल्ह्यात शुक्रवारचा पाऊस होण्याआधी जेमतेम सरासरी ३२ टक्केपाणीसाठा होता. शुक्रवारच्या पावसानंतर तो थेट सरासरी ४२ टक्के इतका झाला आहे. जिल्ह्यातील धरण साठा दलघफूमध्ये पुढीलप्रमाणे - कंसात एकूण टक्केवारी- गंगापूर- ३७६६ (६७ टक्के),  काश्यपी - ९११ (४९), गौतम गोदावरी- ८८0 (४७), पालखेड- ६४७ (८६),  करंजवण- १७५८ (३३), वाघाड- १३0३ (५२), ओझरखेड- ५८१ (२७),  पुणेगाव- ४१५ (६७), तिसगाव- १७९ (४0), दारणा- ४९४९ (६९), भावली-१३८७ (९७), मुकणे- २२३७ (३१), वालदेवी- ८६१ (७६), नांदुरमधमेश्‍वर-१६९ (६६), कडवा- १४७0 (७९), आळंदी- ५५५ (५७), भोजापूर- ८२ (१८),  चणकापूर- २२५२ (८३), पुनंद- १0११ (७२),  हरणबारी- १0५४ (९0), केळझर- ४५८ (८0), नागासाक्या- 00 (0), गिरणा- ६५६ (४) असा एकूण जिल्ह्यातील लहान-मोठे प्रकल्प मिळून ६६ हजार ३५४ पैकी २७ हजार ५८१ (४२ टक्के ) दलघफू इतका झाला आहे.