शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

पाटोदा परिसरात वादळी पावसाने नुकसान, अंगावर भिंत पडून चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 00:26 IST

पाटोदा : परिसरात मंगळवारी (दि. १६) सायंकाळी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने परिसरात मोठे नुकसान झाले आहे. वादळी पावसाने घर अंगावर कोसळल्याने शिवाजी बोरनारे यांच्या कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले आहे. मंगेश केंगे यांचे सुमारे दोन एकर शेतीचे पॉलिहाउस उडून गेले तर काही शेतकऱ्यांच्या कांदा चाळीचे पत्रे उडून गेल्याने चाळीत साठवून ठेवलेला कांदा भिजल्याने नुकसान झाले आहे.

पाटोदा : परिसरात मंगळवारी (दि. १६) सायंकाळी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने परिसरात मोठे नुकसान झाले आहे. वादळी पावसाने घर अंगावर कोसळल्याने शिवाजी बोरनारे यांच्या कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले आहे. मंगेश केंगे यांचे सुमारे दोन एकर शेतीचे पॉलिहाउस उडून गेले तर काही शेतकऱ्यांच्या कांदा चाळीचे पत्रे उडून गेल्याने चाळीत साठवून ठेवलेला कांदा भिजल्याने नुकसान झाले आहे.दरम्यान, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संजय बनकर यांनी परिसरात भेट देऊन पाहणी केली. अपघातग्रस्त बोरनारे कुटुंबीयांना उपचारासाठी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. पाटोदा सजाचे तलाठी सुनील तळवे यांनी नुकसानीचे पंचनामे करून तहसीलदारांना अहवाल सादर केला.--------------महिलेस गंभीर दुखापतपाटोदा येथील शिवाजी पुंजा बोरनारे यांच्या राहत्या घरावरील पत्रे उडून शेतात जाऊन पडले, तर पत्रे उडाल्यानंतर संपूर्ण घर जमीनदोस्त झाले. पत्रे उडाल्याने घरातील काही माणसे घरातील पलंगाखाली लपले मात्र संपूर्ण भिंत पलंगावर पडल्याने लपलेली माणसे दबली गेली. त्यात शिवाजी बोरनारे, सविता बोरनारे, गोरख बोरनारे व लहान बालिका निर्जला बोरनारे जखमी झाले असून, या सर्वांना येवला येथील खासगी रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सविता बोरनारे यांच्या हात पाय व तोंडाला मोठ्या प्रमाणात गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना मुका मारदेखील लागला.-----------------१ पाटोदा परिसरात सुमारे दोन तास झालेल्या या वादळी पावसाने विजेच्या तारा तुटून पडल्या. अनेक झाडे व विद्युत खांब उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. कैºया पडल्याने मोठे नुकसान झाले.२ वाºयाचा वेग प्रचंड असल्याने मंगेश श्रीकांत केंगे यांच्या गट २३५ मध्ये असलेले पॉलिहाउस वादळाने जमीनदोस्त झाले असून, त्यांचे सुमारे पंधरा ते अठरा लाखांचे नुकसान झाले आहे. ताराबाई अशोक बैरागी यांच्याही पॉलिहाउसचे सुमारे बारा ते पंधरा लाखांचे नुकसान झाले आहे.३ परिसरातील राजेंद्र विश्वनाथ शिंदे, बबन माणिक जाधव या शेतकºयांच्या द्राक्षबागा जमीनदोस्त झाल्या असून साहेबराव आहेर, जानकीदास बैरागी यांच्या डाळिंबबागांचे नुकसान झाले आहे. सिंधूबाई बैरागी, अशुदुला चौधरी, गीताबाई आहेर यांच्या घराचेही नुकसान झाले आहे. ज्ञानेश्वर जाधव, विठाबाई शेटे यांच्या कांदा चाळीचे पत्रे उडून गेल्याने संपूर्ण कांदा भिजून लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक