शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अवेळी पावसामुळे शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 19:02 IST

सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात सध्याच्या खराब हवामान व अवेळी पावसामुळे शेतीला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देरब्बी पिकामध्ये हरबरा, गहू, मसूर यांची अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली

सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात सध्याच्या खराब हवामान व अवेळी पावसामुळे शेतीला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सध्या परिसरात ढगाळ वातावरण आहे. दिवसभर धुक्याचे साम्राज्य, कोंदट वातावरण, सूर्यदर्शन नाही. यामळे सर्वत्र नैराश्य पसरलेले आहे. त्यातच रविवारी रात्री व सोमवारी सकाळी अनेक ठिकाणी अवेळी पडलेल्या रिमझिम व मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान होणार आहे.यावर्षी अवेळी पावसामुळे भातशेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. यावर्षी निम्म्याहून अधिक प्रमाणात उत्पादन घटले आहे. त्यातच बाजारभाव कमी असल्याने शेतकरी तोट्यातच आहे.या वर्षी भातसोंगणीतच पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले. परिसरातील आंबेवाडी, खडकेद, इंदोरे मांजरगाव, वासाळी, खेड, सोनोशी, बारशिंगवे, टाकेद, अडसरे, धामणगाव, भरवीर या सर्वच परिसरात दुषित वातावरण तयार झाले आहे.रब्बी पिकामध्ये हरबरा, गहू, मसूर यांची अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. तसेच बागायत क्षेत्रामध्ये बटाटा टॉम्याटो, फ्लावर यांच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल. हरबरा, तूर पिकावर रोग पसरून ती वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच ज्यांनी नुकतीच पेरणी केली आहे, त्यांना दुबार पेरणी करावी लागेल. यामुळे ढगाळ वातावरण व खराब हवामानामुळे सर्वांचेच नुकसान होईल असे शेतकरी बोलत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती