शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

धरणग्रस्त मुळ मालकांना जमिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 00:20 IST

वैतरणानगर : वैतरणा धरण लाभक्षेत्राबाहेरील जमिनी मूळ मालकांना परत देण्यासाठी सरकार तयार असून, याबाबतचे धोरण जलसंपदा विभाग निश्चित करणार आहे. येत्या बुधवारी मंत्रालयात यावर बैठक घेत प्रश्न मार्गी लावू. सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे आश्वासन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले.

वैतरणानगर : वैतरणा धरण लाभक्षेत्राबाहेरील जमिनी मूळ मालकांना परत देण्यासाठी सरकार तयार असून, याबाबतचे धोरण जलसंपदा विभाग निश्चित करणार आहे. येत्या बुधवारी मंत्रालयात यावर बैठक घेत प्रश्न मार्गी लावू. सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे आश्वासन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले.शनिवारी (दि.२५) वैतरणा येथे झालेल्या आढावा बैठकीत धरणग्रस्तांशी झालेल्या चर्चेप्रसंगी ते बोलत होते. वैतरणा धरण प्रकल्पबाधित शेतकºयांनी आपले म्हणणे मांडताना सांगितले की, प्रकल्प पूर्ण होऊन ५० वर्षे झाली, धरणक्षेत्र सोडून ६२३ हेक्टर जागा पडून आहे. ती मूळ मालकांच्या नावावर नसल्याने अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. यात १५ गावांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. जमीन मूळ मालकांना देताना लिलाव पद्धत नको, ती आहे त्या कुटुंबातील सदस्यांना मिळायला हवी. याउपर या तालुक्याची आठवण मुंबई-मराठवाड्याला केवळ पाण्यासाठी होते. मात्र बेरोजगार युवक, युवतींना नाशिक-मुंबई-मराठवाड्यात सरकारी नोकरीत प्राधान्य द्यायला हवे, अशी मागणी शेतकरी कृती समितीच्या वतीने जाधव यांच्याकडे करण्यात आली. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार समीर भुजबळ, देवीदास पिंगळे, माजी आमदार जयंत जाधव, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक एन. व्ही. शिंदे, मुख्य अभियंता किरण कुलकर्णी, अलका अहिरराव, राजेंद्र शिंपी, विजय घोगरे, योगेश पाटील, नीलेश वन्नरे, शाखा अभियंता भूषण दळवी, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासोळे, जि. प. सदस्य उदय जाधव आदी उपस्थित होते.-----------------विद्युत उपकेंद्राला जागा देण्याची मागणीनांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणाच्या पाण्यावर परिसरातील नांदूरवैद्य, नांदगाव बुद्रुक, कृष्णानगर, जानोरी, कुºहेगाव आदी गावांसह अनेक गावांतील शेती अवलंबून असून, परिसरातील शेतकºयांना पिकांना व्यवस्थित व व्यत्यय न येता पाणी वापरता यावे यासाठी या दारणा धरणाच्या पायथ्याशी वापरत नसलेली जमीन विद्युत उपकेंद्रासाठी देण्यात यावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ यांच्यासह शेतकºयांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील व आमदार हिरामण खोसकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक