शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

धरणग्रस्त मुळ मालकांना जमिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 00:20 IST

वैतरणानगर : वैतरणा धरण लाभक्षेत्राबाहेरील जमिनी मूळ मालकांना परत देण्यासाठी सरकार तयार असून, याबाबतचे धोरण जलसंपदा विभाग निश्चित करणार आहे. येत्या बुधवारी मंत्रालयात यावर बैठक घेत प्रश्न मार्गी लावू. सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे आश्वासन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले.

वैतरणानगर : वैतरणा धरण लाभक्षेत्राबाहेरील जमिनी मूळ मालकांना परत देण्यासाठी सरकार तयार असून, याबाबतचे धोरण जलसंपदा विभाग निश्चित करणार आहे. येत्या बुधवारी मंत्रालयात यावर बैठक घेत प्रश्न मार्गी लावू. सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे आश्वासन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले.शनिवारी (दि.२५) वैतरणा येथे झालेल्या आढावा बैठकीत धरणग्रस्तांशी झालेल्या चर्चेप्रसंगी ते बोलत होते. वैतरणा धरण प्रकल्पबाधित शेतकºयांनी आपले म्हणणे मांडताना सांगितले की, प्रकल्प पूर्ण होऊन ५० वर्षे झाली, धरणक्षेत्र सोडून ६२३ हेक्टर जागा पडून आहे. ती मूळ मालकांच्या नावावर नसल्याने अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. यात १५ गावांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. जमीन मूळ मालकांना देताना लिलाव पद्धत नको, ती आहे त्या कुटुंबातील सदस्यांना मिळायला हवी. याउपर या तालुक्याची आठवण मुंबई-मराठवाड्याला केवळ पाण्यासाठी होते. मात्र बेरोजगार युवक, युवतींना नाशिक-मुंबई-मराठवाड्यात सरकारी नोकरीत प्राधान्य द्यायला हवे, अशी मागणी शेतकरी कृती समितीच्या वतीने जाधव यांच्याकडे करण्यात आली. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार समीर भुजबळ, देवीदास पिंगळे, माजी आमदार जयंत जाधव, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक एन. व्ही. शिंदे, मुख्य अभियंता किरण कुलकर्णी, अलका अहिरराव, राजेंद्र शिंपी, विजय घोगरे, योगेश पाटील, नीलेश वन्नरे, शाखा अभियंता भूषण दळवी, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासोळे, जि. प. सदस्य उदय जाधव आदी उपस्थित होते.-----------------विद्युत उपकेंद्राला जागा देण्याची मागणीनांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणाच्या पाण्यावर परिसरातील नांदूरवैद्य, नांदगाव बुद्रुक, कृष्णानगर, जानोरी, कुºहेगाव आदी गावांसह अनेक गावांतील शेती अवलंबून असून, परिसरातील शेतकºयांना पिकांना व्यवस्थित व व्यत्यय न येता पाणी वापरता यावे यासाठी या दारणा धरणाच्या पायथ्याशी वापरत नसलेली जमीन विद्युत उपकेंद्रासाठी देण्यात यावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ यांच्यासह शेतकºयांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील व आमदार हिरामण खोसकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक