शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
2
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
3
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
4
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
5
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
6
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
7
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
9
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
10
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
11
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
12
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
13
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
14
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
15
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
16
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
17
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!
18
देशभरात इन्व्हेस्टमेंट स्कॅमचे जाळे; सहा महिन्यांत 30 हजार लोकांची फसवणूक, ₹1500 कोटी लुटले
19
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
20
LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन

जिल्ह्यातील धरणसाठा निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:14 IST

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात काठोकाठ भरलेल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये यंदा निम्माच जलसाठा शिल्लक राहिला आहे. मराठवाडा व नगर जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या नाशिक जिल्ह्यात गेल्या काही वर्षांनंतर पहिल्यांदाच अशाप्रकारची परिस्थिती उद्भवली असून, ५५ टक्के जलसाठ्यावर आगामी आठ महिने काढण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

ठळक मुद्देउन्हाळा कडक राहणार उपलब्ध जलसाठ्यावर आगामी आठ महिने काढण्याचे मोठे आव्हान

नाशिक : गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात काठोकाठ भरलेल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये यंदा निम्माच जलसाठा शिल्लक राहिला आहे. मराठवाडा व नगर जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या नाशिक जिल्ह्यात गेल्या काही वर्षांनंतर पहिल्यांदाच अशाप्रकारची परिस्थिती उद्भवली असून, ५५ टक्के जलसाठ्यावर आगामी आठ महिने काढण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.यंदा नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या ८३ टक्केच पर्जन्यमान नोंदविले गेले. त्यातही पावसाचे माहेरघर असलेल्या त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा व इगतपुरी या तालुक्यांतच पर्जन्यमान समाधानकारक राहिले. त्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या काही भागांत पडणाºया पावसाचा लाभ नाशिकच्या गंगापूर धरणासाठी, तर इगतपुरीच्या पावसाने काही प्रमाणात स्थानिक व काही पाणी थेट मुंबईसाठी बांधलेल्या धरणांमध्ये जाऊन पडले. पेठ, सुरगाणा या तालुक्यांच्या पाण्याचा आजवर फक्तगुजरात राज्यालाच फायदा झाला आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने यंदा पावसाळ्यात जिल्ह्यातील एकूण धरणांमध्ये जेमतेम ७७ टक्केच जलसाठा होऊ शकला. त्यातही मध्यंतरीच्या काळात समन्यायी पाणीवाटपाच्या निर्णयामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी जिल्ह्यातून साडेतीन टीएमसी पाणी सोडावे लागले, तर आगामी काळात नगर जिल्ह्याचे सिंचन व बिगरसिंचनाचे आवर्तन सोडणे बाकी आहे. त्यामुळे आॅक्टोबर, नोव्हेंबर या दोन महिन्यांत सुमारे २० टक्के पाण्याचा वापर करण्यात आला असून, सध्या ५६ टक्के जलसाठा शिल्लक आहे.गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील धरणांमध्ये ८८ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने पाण्याची काळजी मिटली होती. यंदा त्या उलट परिस्थिती आहे.उपलब्ध जलसाठ्यातून रब्बीचे आवर्तन सोडावे लागणार असून, प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांसाठी धरणांचे पाणी आरक्षित ठेवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत सध्या शिल्लक असलेल्या ५६ टक्के जलासाठ्यातून आगामी आठ महिन्यांसाठी प्रत्येक व्यक्तीला पिण्यासाठी पाणी पुरवावे लागणार आहे.गंगापूर धरणात ७० टक्के साठानाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात ७० टक्के साठा असून, समूहात ८१ टक्के साठा आहे त्यामुळे नाशिककरांनी चिंता करण्यासारखी परिस्थिती नसली तरी, यंदा हवामान खात्याने उन्हाळा कडक राहणार असल्याचे संकेत दिले आहे. अशावेळी गळती व बाष्पीभवनाचा विचार करता मोठे आव्हान उभे ठाकणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgangapur damगंगापूर धरण