शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील धरणसाठा निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:14 IST

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात काठोकाठ भरलेल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये यंदा निम्माच जलसाठा शिल्लक राहिला आहे. मराठवाडा व नगर जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या नाशिक जिल्ह्यात गेल्या काही वर्षांनंतर पहिल्यांदाच अशाप्रकारची परिस्थिती उद्भवली असून, ५५ टक्के जलसाठ्यावर आगामी आठ महिने काढण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

ठळक मुद्देउन्हाळा कडक राहणार उपलब्ध जलसाठ्यावर आगामी आठ महिने काढण्याचे मोठे आव्हान

नाशिक : गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात काठोकाठ भरलेल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये यंदा निम्माच जलसाठा शिल्लक राहिला आहे. मराठवाडा व नगर जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या नाशिक जिल्ह्यात गेल्या काही वर्षांनंतर पहिल्यांदाच अशाप्रकारची परिस्थिती उद्भवली असून, ५५ टक्के जलसाठ्यावर आगामी आठ महिने काढण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.यंदा नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या ८३ टक्केच पर्जन्यमान नोंदविले गेले. त्यातही पावसाचे माहेरघर असलेल्या त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा व इगतपुरी या तालुक्यांतच पर्जन्यमान समाधानकारक राहिले. त्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या काही भागांत पडणाºया पावसाचा लाभ नाशिकच्या गंगापूर धरणासाठी, तर इगतपुरीच्या पावसाने काही प्रमाणात स्थानिक व काही पाणी थेट मुंबईसाठी बांधलेल्या धरणांमध्ये जाऊन पडले. पेठ, सुरगाणा या तालुक्यांच्या पाण्याचा आजवर फक्तगुजरात राज्यालाच फायदा झाला आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने यंदा पावसाळ्यात जिल्ह्यातील एकूण धरणांमध्ये जेमतेम ७७ टक्केच जलसाठा होऊ शकला. त्यातही मध्यंतरीच्या काळात समन्यायी पाणीवाटपाच्या निर्णयामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी जिल्ह्यातून साडेतीन टीएमसी पाणी सोडावे लागले, तर आगामी काळात नगर जिल्ह्याचे सिंचन व बिगरसिंचनाचे आवर्तन सोडणे बाकी आहे. त्यामुळे आॅक्टोबर, नोव्हेंबर या दोन महिन्यांत सुमारे २० टक्के पाण्याचा वापर करण्यात आला असून, सध्या ५६ टक्के जलसाठा शिल्लक आहे.गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील धरणांमध्ये ८८ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने पाण्याची काळजी मिटली होती. यंदा त्या उलट परिस्थिती आहे.उपलब्ध जलसाठ्यातून रब्बीचे आवर्तन सोडावे लागणार असून, प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांसाठी धरणांचे पाणी आरक्षित ठेवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत सध्या शिल्लक असलेल्या ५६ टक्के जलासाठ्यातून आगामी आठ महिन्यांसाठी प्रत्येक व्यक्तीला पिण्यासाठी पाणी पुरवावे लागणार आहे.गंगापूर धरणात ७० टक्के साठानाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात ७० टक्के साठा असून, समूहात ८१ टक्के साठा आहे त्यामुळे नाशिककरांनी चिंता करण्यासारखी परिस्थिती नसली तरी, यंदा हवामान खात्याने उन्हाळा कडक राहणार असल्याचे संकेत दिले आहे. अशावेळी गळती व बाष्पीभवनाचा विचार करता मोठे आव्हान उभे ठाकणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgangapur damगंगापूर धरण