शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

जिल्ह्यातील धरणसाठा निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:14 IST

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात काठोकाठ भरलेल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये यंदा निम्माच जलसाठा शिल्लक राहिला आहे. मराठवाडा व नगर जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या नाशिक जिल्ह्यात गेल्या काही वर्षांनंतर पहिल्यांदाच अशाप्रकारची परिस्थिती उद्भवली असून, ५५ टक्के जलसाठ्यावर आगामी आठ महिने काढण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

ठळक मुद्देउन्हाळा कडक राहणार उपलब्ध जलसाठ्यावर आगामी आठ महिने काढण्याचे मोठे आव्हान

नाशिक : गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात काठोकाठ भरलेल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये यंदा निम्माच जलसाठा शिल्लक राहिला आहे. मराठवाडा व नगर जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या नाशिक जिल्ह्यात गेल्या काही वर्षांनंतर पहिल्यांदाच अशाप्रकारची परिस्थिती उद्भवली असून, ५५ टक्के जलसाठ्यावर आगामी आठ महिने काढण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.यंदा नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या ८३ टक्केच पर्जन्यमान नोंदविले गेले. त्यातही पावसाचे माहेरघर असलेल्या त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा व इगतपुरी या तालुक्यांतच पर्जन्यमान समाधानकारक राहिले. त्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या काही भागांत पडणाºया पावसाचा लाभ नाशिकच्या गंगापूर धरणासाठी, तर इगतपुरीच्या पावसाने काही प्रमाणात स्थानिक व काही पाणी थेट मुंबईसाठी बांधलेल्या धरणांमध्ये जाऊन पडले. पेठ, सुरगाणा या तालुक्यांच्या पाण्याचा आजवर फक्तगुजरात राज्यालाच फायदा झाला आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने यंदा पावसाळ्यात जिल्ह्यातील एकूण धरणांमध्ये जेमतेम ७७ टक्केच जलसाठा होऊ शकला. त्यातही मध्यंतरीच्या काळात समन्यायी पाणीवाटपाच्या निर्णयामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी जिल्ह्यातून साडेतीन टीएमसी पाणी सोडावे लागले, तर आगामी काळात नगर जिल्ह्याचे सिंचन व बिगरसिंचनाचे आवर्तन सोडणे बाकी आहे. त्यामुळे आॅक्टोबर, नोव्हेंबर या दोन महिन्यांत सुमारे २० टक्के पाण्याचा वापर करण्यात आला असून, सध्या ५६ टक्के जलसाठा शिल्लक आहे.गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील धरणांमध्ये ८८ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने पाण्याची काळजी मिटली होती. यंदा त्या उलट परिस्थिती आहे.उपलब्ध जलसाठ्यातून रब्बीचे आवर्तन सोडावे लागणार असून, प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांसाठी धरणांचे पाणी आरक्षित ठेवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत सध्या शिल्लक असलेल्या ५६ टक्के जलासाठ्यातून आगामी आठ महिन्यांसाठी प्रत्येक व्यक्तीला पिण्यासाठी पाणी पुरवावे लागणार आहे.गंगापूर धरणात ७० टक्के साठानाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात ७० टक्के साठा असून, समूहात ८१ टक्के साठा आहे त्यामुळे नाशिककरांनी चिंता करण्यासारखी परिस्थिती नसली तरी, यंदा हवामान खात्याने उन्हाळा कडक राहणार असल्याचे संकेत दिले आहे. अशावेळी गळती व बाष्पीभवनाचा विचार करता मोठे आव्हान उभे ठाकणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgangapur damगंगापूर धरण