शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
2
कुलदीप सेंगरचा जामीन रद्द; उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
3
स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १ 
4
जागावाटपाचे घोडे अडलेलेच! काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीचा दावा, जागा गुलदस्त्यात
5
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
6
आता १२५ दिवस रोजगाराची गॅरेंटी! पाहा G RAM G विधेयकामुळे ग्रामीण भागात कसा होणार फायदा?
7
मराठीच्या मुद्द्याला हिंदुत्वाने पलटवार! ठाकरे बंधूंच्या रणनीतीला शह देणार, भाजपानं आखला प्लॅन
8
“मुंबईसाठी अदानी अन् आमची नैतिक लढाई सुरूच राहणार, ती थांबवणार नाही”: संजय राऊत
9
Nagpur Municipal Election: महाविकास आघाडीचं अखेर ठरलं! काँग्रेस १२९, राष्ट्रवादी १२ जागा; उद्धवसेनेला किती जागा?
10
टीम इंडियाविरुद्ध चुलत भाऊ कॅप्टन झाला; दुसरीकडे संधी मिळेना म्हणून स्टार ऑलराउंडरनं क्रिकेट सोडलं
11
Health Tips: गुडघेदुखीने त्रस्त आहात? मग 'रिव्हर्स वॉकिंग' करून पहा; २ मिनिटांत मिळेल आराम!
12
भाजपविरोधात शिंदेसेना-अजित पवार गटाची युती, महापालिकेसाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता
13
FD-RD काहीच नाही! एलआयसीच्या 'या' योजनेत २४३ रुपयांची गुंतवणूक करा, मिळेल ५४ लाखांचा फंड
14
मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी 
15
आता PF च्या कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; 'पासपोर्ट केंद्रां'प्रमाणे मिळणार सेवा
16
कुलदीप सेंगर पुन्हा तुरुंगात जाणार? स्थगित शिक्षेविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय
17
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबूल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
18
सावधान! मोबाईलवर येणारा एक मेसेज तुमचं बँक खातं रिकामं करू शकतो; काय आहे हा नवा 'SIM Box Scam'?
19
राज-उद्धव एकत्र; भाजप-शिंदेसेना तह आणि युद्ध..!
20
'मला वाटलं पुढचा स्टीव्ह जॉब्स मीच आहे..;' सर्गेई ब्रिन यांनी गुगलच्या 'या' अपयशाबद्दल व्यक्त केली खंत
Daily Top 2Weekly Top 5

शहरात आज दाजिबा वीराची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2016 00:03 IST

होळीचे महत्त्व : तिसरी पिढी जपतेय परंपरा; नवसाला पावणारे वीर

 नाशिक : हुताशनी पौर्णिमेनंतर येणाऱ्या धूलिवंदनाला म्हणजेच फाल्गुन वद्य प्रतिपदेला शहरातून दाजिबा वीराची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.२४) देवीदेवतांचे अवतार धारण करून पारंपरिक पध्दतीने जुने नाशिक परिसरातून दाजिबा वीराच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या या वीर मिरवणुकीचे नेतृत्व तिसरी पिढी करते आहे.हे दाजिबा वीर नवसाला पावणारा असल्याची भावना असून मिरवणूक मार्गावर तसेच घरोघरी जाऊन वीराची भाविक मनोभावे पूजा करतात. धूलिवंदनाची सवाद्य मिरवणूक काढून गोदाकाठी यात्रेचे स्वरूप बघायला मिळणार आहे. जुने नाशिक परिसरातील दाजिबा वीर अर्थात बाशिंगे वीर अशी या वीराची ख्याती असून डोक्याला भरजरी वस्त्रे, कानात सोन्याच्या पगड्या, गळ्यात सरी, हातात सोन्याचे कडे, पायात मारवाडी जोडा, कमरेला धोतर असा वेश धारण करून हे वीर धूलिवंदनाच्या दिवशी दुपारी दोन वाजता मिरवणुकीसाठी प्रस्थान करतात. दुपारी निघालेली ही मिरवणूक दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता पूर्ण होते. मिरवणूक मार्गात भाविक वीराची पूजा करतात आणि नवस मागतात. यावेळी भाविकांकडून विविध फुलांचे हार, नारळ, उदबत्ती, बाशिंगाचा जोड अर्पण केला जातो.फाल्गुन वद्य प्रतिपदेला दाजिबा महाराज वीराची विशिष्ट कथा असल्याने या दिवशी ही मिरवणूक काढतात. नाशिक जवळच असलेल्या दिंडोरी तालुल्यातील जानोरी गावात एक गवळी राहात होता. खंडेराव आद्यदैवत असल्याने गवळी खंडेरायाची निस्सीम भक्ती करत होता. गावात दूध घालून झाल्यावर केवळ ईश्वरसेवेत आपला वेळ घालवणे असा त्याचा नित्यक्रम होता. वयाच्या १६ व्या वर्षी लग्न ठरते आणि अंगाला हळद लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी कर्म हीच सेवा म्हणत हा गवळी दूध घालण्यासाठी कावड आणि कुत्र्यासह निघतो आणि वाटेतच अज्ञाताकडून या गवळ्यावर हल्ला होतो आणि या हल्ल्यात गवळ्याचे निधन होते. हा दिवस फाल्गुन वद्य प्रतिपदेचा असल्याने या दिवसापासून ‘दाजिबा वीराची’ मिरवणूक काढण्याची प्रथा सुरू आहे. त्यावेळी दु:खी झालेले कुटुंबीय घरी परतत असताना गावात वाद्ये वाजण्यास सुरूवात होते. ज्याठिकाणी गवळी खंडेरायाची पूजा करीत असे त्याठिकाणी त्यांची प्रतिमा दिसू लागली आणि ती बोलूदेखील लागली. यावेळी जो कोणी माझी राहिलेली इच्छा पूर्ण करतील त्यांची मी इच्छा पूर्ण करेल, अशी आख्यायिका आहे. या आख्यायिकेनुसार हळदीचा नवरदेव बाशिंग लावून दरवर्षी उपवर पत्नीच्या शोधात फिरत असतो. लग्न मंडपात गेल्यावर दाजी म्हणतो म्हणून त्यांना ‘दाजीबा वीर’ तर हळद लावल्यावर बाशिंगे लावून मिरवतात म्हणून ‘बाशिंगे वीर’ असा प्रघात आहे. या बाशिंगे वीराची समाधी दिंडोरी येथील तळोदा येथे असून होळीच्या दिवशी याठिकाणी रात्री पूजा केली जात असल्याची माहिती वीर विनोद बेलगावकर यांनी दिली. (प्रतिनिधी)