शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

तळेगाव रोही परिसरात दुग्धव्यवसाय संकटात

By admin | Updated: September 23, 2015 23:28 IST

दुष्काळ : जनावरांची उपसमार

 तळेगाव रोही : परिसरात दुष्काळी परिस्थिती असून, चाऱ्या व पाण्याअभावी पशुधनाबरोबर दुग्धव्यवसायही धोक्यात आला आहे. १८ सप्टेंबरला सर्वत्र पावसाने हजेरी लावली असली तरी तळेगाव रोही, साळसाणे, विटावे, काळखोडे, वाहेगाव साळ, वाकी खुर्द, वाकी बुद्रुक आदि परिसरात स्प्रे (स्प्रिकंर) मारावा एवढाच पाऊस झाला. वरुणराजाने परिसरातील गावांवर अवकृपा का केली, असा संभ्रम गावकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. पावसाअभावी परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पशुधन धोक्यात आले असून, पशुपालक चिंताक्रांत झाला आहे. तळेगाव रोहीमध्ये एकूण पाच दूध संकलन केंद्र होते; त्यातील एक बंद पडले. परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर सर्वच दूध केंद्रे बंद पडतील असे चित्र दिसत आहे. चाऱ्याचा प्रश्न भेडसावत असल्याने शेतकऱ्यांकडून आपली दूध देणारी जनावरे, बैल डोंगरात सोडून दिली जात आहेत, तर काही शेतकरी कवडीमोल किमतीत जनावरांचा सौदा करत आहेत. आता परिसरावर वरुणराजाने कृपा केली तर शेतजमीन कसण्यासाठी बैल कसे मिळणार, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. यापूर्वी गायरान, गावठाण मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. परंतु आता खूपच कमी झाले आहे. तसेच काळखोडे, तळेगाव रोही, समिट स्टेशनजवळील शेतकरी रेल्वेलाइनच्या जवळील रेल्वे पटरीचे पोल दोनशे ते तीनशे रुपयात गवत चरावयास घेत आहेत. परंतु आता गवतच मिळेनासे झाल्याने पशुधन कसे जगवायचे, असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे. मनोहर वाकचौरे, साहेबराव ठाकरे, सुभाष ठाकरे, पुंजाराम भोकनळ, शरद कदम हे पाच दूध संकलनाचे काम करतात. त्यात दुष्काळामुळे शरद कदम यांचे दूध संकलन बंद झाले आहे. सर्व मिळून ४ ते ५ हजार लिटर दूध संकलन करत असत; परंतु आता रोज फक्त एक हजार लिटर दुधाचे संकलन होत आहे. शेतकऱ्यांना फक्त २० ते २१ रुपये दराने दुधाचे भाव मिळतात. त्यातही डिग्री, फॅट याप्रमाणेच भाव दिला जातो. त्यातून चारा, ढेप, उस, बांडी यांचा खर्चदेखील वसूल होत नसल्याने बळीराजा व पशुपालक अडचणीत आला आहे. (वार्ताहर)