शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

हक्कांप्रती जागृत राहिल्यास ग्राहकांची फसवणूक होणार नाही : मलिंद सोनवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 18:04 IST

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे अर्थव्यवस्थेतील पंचप्रमाणे असलेल्या घटकांतील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा पंचप्राण पुरस्काराने सन्मान करण्यात आला.  

नाशिक :ग्राहकाने आपल्या हक्क अधिकारांप्रती जागृत राहून वेगवेगळ्या घटनांमध्ये त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय व फसणुकीच्या प्रकारांविरोधात ग्राहक तक्रार निवारण मंचासमोर आपली बाजू मांडली तर ग्राहकांना निश्चित न्याय मिळून फसवणुकीचे प्रकारही नियंत्रित होऊन ग्राहकांचे हित जपले जाऊ शकेल. त्यासाठी ग्राहक संरक्षणासाठी झटणाऱ्या संस्थांनी ग्राहक संरक्षण कायद्याविषयी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांनी केले. ग्राहक ाच्या हक्कांविषयी अधिकारांची जागृती करताना नवीन ग्राहक संरक्षण कायद्यातील सुधारणांविषयी ग्राहकांना अवगत करण्याची त्यांची फसणूक टाळता येणे शक्य असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. नाशिक जिल्हा पुरवठा विभाग व ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेतील आदर्श पंचप्राण पुरस्कारांसह राष्ट्रीय ग्राहक दिन पंधरवड्याच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या शालेय व महाविद्यालयी वक्तृत्व स्पर्धांचे पारितोषिक वितरणही यावेळी करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यासपीठावर सहायक पुरवठा अधिकारी पंकज पवार, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे विभाग प्रमुख अरुण भार्गवे, जिल्हाध्यक्ष सुधीर काटकर, दत्ता शेळके आदी उपस्थित होते. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे विभागीय अध्यक्ष अरुण भार्गवे यांनी रेरा कायदा व गृहनिर्माण संस्थाच्या नोंदणीकरणाविषयीच्या समस्या उपस्थित करताना याविषयी ग्राहकांमध्ये जागृती होण्याची गरज व्यक्त केली. जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन डॉ. लता पवार यांनी केले. आभार धान्य वितरण अधिकारी श्वेता पाटोळे यांनी मानले. दरम्यान, नाशिकरोड येथील  बिंदू रामराम देशमुख महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनी ग्राहक जागृती, चंगळवादी ग्राहकांची निर्मिती आणि महागाई आदी विषयांवर जागृती करणारे पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली, तर अन्न व औषध प्रशासन, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, आरटीओ, कृषी व वजन मापे विभाग यांनी नियोजन भवनच्या आवारात माहितीपर प्रदर्शनातून ग्राहक जागृती केली.  

पंचप्राण पुरस्कारार्थी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे अर्थव्यवस्थेतील पंचप्रमाणे असलेल्या घटकांतील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा पंचप्राण पुरस्काराने सन्मान केला. यात मालेगावचे महिंद्र पवार यांना आदर्श शेतकरी, नाशिकचे देवेंद्र कुकडे यांना आदर्श व्यापारी, जयंत राऊत यांना आदर्श कारखानदार, सुनील माळी यांना आदर्श श्रमिक व उदय कुलकर्णी यांना आदर्श ग्राहक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  

टॅग्स :consumerग्राहकNashikनाशिक