शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

३१ मेपर्यंत जमावबंदी पुन्हा लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 00:35 IST

नाशिक : कोरोना आजाराचे थैमान रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन सुरू आहे. लॉकडाउनची मुदत रविवारी (दि.१७) संपली असली तरी राज्य सरकारकडून पुन्हा ३१ मेपर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. शहर आयुक्तालय व पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्या हद्दीत पुन्हा भादंवि कलम १४४ सोमवारी (दि.१८) दुपारी १ वाजेपासून लागू होणार असल्याची घोषणा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केली.

नाशिक : कोरोना आजाराचे थैमान रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन सुरू आहे. लॉकडाउनची मुदत रविवारी (दि.१७) संपली असली तरी राज्य सरकारकडून पुन्हा ३१ मेपर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. शहर आयुक्तालय व पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्या हद्दीत पुन्हा भादंवि कलम १४४ सोमवारी (दि.१८) दुपारी १ वाजेपासून लागू होणार असल्याची घोषणा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केली.सोमवारपासून शहरासह जिल्ह्यात सर्वच पोलीस ठाण्यांकडून धडक कारवाई केली जाणार आहे. लॉकडाउनच्या सर्व नियमांचे पालन करणे प्रत्येक नागरिकावर बंधनकारक तर आहेच, मात्र ते आपले कर्तव्यदेखील आहे हे विसरू नये, असे मांढरे म्हणाले. जमावबंदी, संचारबंदी कायम राहणार असल्याचे त्यांनी आदेशात म्हटले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त तसेच पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहेत.या यंत्रणेवर मात्र दिवसेंदिवस ताण वाढतच आहे. कोरोना आजाराला रोखण्यासाठी लॉकडाउन सातत्याने पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.मालेगावसह शहर, ग्रामीण भागातदेखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत कोरोनाबाधितांचा आकडा ४६वर पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनसह शासनाच्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे तरच कोरोनाची साखळी तोडणे शक्य होईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनीही स्पष्ट केले आहे.ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला तसेच दहा वर्षांखालील बालकांनी घरांमध्येच राहण्यास अधिकाधिक प्राधान्य द्यावे, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे. शहरासह जिल्ह्यात अपवादात्मक स्थितीत विवाहसाठी ५० तर अंत्यविधीकरिता जास्तीत जास्त २० लोकांना सर्व नियमांचे पालन करत एकत्र येण्यास मुभा देण्यात आली आहे.----------------------------------प्रशासनाकडून नागरिकांसाठी नियमावलीभाजीपाला, दूध, किराणा विक्री-खरेदी जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेतच करता येणार आहे. किरकोळ दूधविक्री सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे. यावेळी नागरिकांनी बाहेर पडताना ‘डिस्टन्स’ ठेवणे, तोंडाला मास्क बांधणे, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, मद्यपानासह थुंकणे टाळावे.

टॅग्स :Nashikनाशिक