शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

विभागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:12 IST

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नातून नाशिक विभागात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात दिलासादायक वाढ ...

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नातून नाशिक विभागात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात दिलासादायक वाढ झाली असून, हे प्रमाण ९५.१९ टक्क्यांवर आहे. तर मृत्यूदर १.३५ टक्के आहे.

विभागातून आजपर्यंत ८ लाख ६६ हजार २८७ रुग्णांपैकी ८ लाख २४ हजार ६९५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत २९ हजार ७९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत विभागात ११ हजार ७५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभाग, नाशिक परिमंडल कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली.

नाशिक विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये ३६ लाख ६१ हजार ३४९ अहवाल पाठविण्यात आले असून, त्यापैकी ८ लाख ६६ हजार २८७ अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गंडाळ यांनी दिली.

इन्फो

नाशिकला प्रमाण ९६.०६ टक्के

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख ८४ हजार ७८४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, ३ लाख ६९ हजार ६५२ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १० हजार ४९५ रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०६ टक्के इतके आहे. आजपर्यंत ४ हजार ६३७ रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा मृत्यूदर १.२० टक्के आहे.

इन्फो

अन्य जिल्ह्यांपैकी धुळ्यात सर्वाधिक

नगर जिल्ह्यात सध्या ११ हजार ६२९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३२ टक्के इतके आहे. आजपर्यंत ३ हजार ११२ रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा मृत्यूदर १.१९ टक्के आहे. धुळे जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या बाधितांचे प्रमाण ९६.३६ टक्के आहे. आजपर्यंत ६६४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा मृत्यूदर १.५७ टक्के आहे. जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ३९ हजार ६६६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, १ लाख ३० हजार ९५१ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ६ हजार १९१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.७६ टक्के आहे. आजपर्यंत २ हजार ५३४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा मृत्यूदर १.८० टक्के आहे. नंदुरबार जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३० टक्के आहे. नंदुरबारला आतापर्यंत ३९ हजार ९६४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, ३८ हजार ४८८ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ६१३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, जिल्ह्याचा मृत्यूदर २.०५ टक्के आहे.