शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
2
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
3
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
5
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
6
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
7
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
8
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
9
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
10
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
11
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
12
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
13
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
14
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
15
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
16
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
17
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
18
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
19
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
20
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे

विभागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:12 IST

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नातून नाशिक विभागात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात दिलासादायक वाढ ...

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नातून नाशिक विभागात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात दिलासादायक वाढ झाली असून, हे प्रमाण ९५.१९ टक्क्यांवर आहे. तर मृत्यूदर १.३५ टक्के आहे.

विभागातून आजपर्यंत ८ लाख ६६ हजार २८७ रुग्णांपैकी ८ लाख २४ हजार ६९५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत २९ हजार ७९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत विभागात ११ हजार ७५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभाग, नाशिक परिमंडल कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली.

नाशिक विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये ३६ लाख ६१ हजार ३४९ अहवाल पाठविण्यात आले असून, त्यापैकी ८ लाख ६६ हजार २८७ अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गंडाळ यांनी दिली.

इन्फो

नाशिकला प्रमाण ९६.०६ टक्के

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख ८४ हजार ७८४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, ३ लाख ६९ हजार ६५२ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १० हजार ४९५ रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०६ टक्के इतके आहे. आजपर्यंत ४ हजार ६३७ रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा मृत्यूदर १.२० टक्के आहे.

इन्फो

अन्य जिल्ह्यांपैकी धुळ्यात सर्वाधिक

नगर जिल्ह्यात सध्या ११ हजार ६२९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३२ टक्के इतके आहे. आजपर्यंत ३ हजार ११२ रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा मृत्यूदर १.१९ टक्के आहे. धुळे जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या बाधितांचे प्रमाण ९६.३६ टक्के आहे. आजपर्यंत ६६४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा मृत्यूदर १.५७ टक्के आहे. जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ३९ हजार ६६६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, १ लाख ३० हजार ९५१ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ६ हजार १९१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.७६ टक्के आहे. आजपर्यंत २ हजार ५३४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा मृत्यूदर १.८० टक्के आहे. नंदुरबार जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३० टक्के आहे. नंदुरबारला आतापर्यंत ३९ हजार ९६४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, ३८ हजार ४८८ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ६१३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, जिल्ह्याचा मृत्यूदर २.०५ टक्के आहे.