शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सात गावांमधील संचारबंदी शिथिल

By admin | Updated: October 16, 2016 02:56 IST

बंदोबस्त मात्र कायम

 नाशिक : तळेगाव येथील घटनेनंतर तणाव निर्माण झालेल्या जिल्ह्यातील सात गावांमधील संचारबंदी शिथिल करण्यात आली असून, या काळात कोणतीही अनुचित घटना न घडल्याने रात्री लावलेली संचारबंदी टप्प्याटप्प्याने मागे घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तथापि, संवेदनशील भागांमध्ये पोलीस व राज्य राखीव दलाचा बंदोबस्त कायम ठेवण्यात येणार आहे. रविवारच्या जाळपोळ, दगडफेक व लुटालुटीच्या घटनेनंतर इगतपुरी, नाशिक व त्र्यंबकेश्वर या तालुक्यातील आठ गावांमध्ये सोमवार पहाटेपासून संचारबंदी जारी करण्यात आली होती. समाजकंटकांनी मुंबई-आग्रा महामार्गावर तुफान दगडफेक करून वाहने पेटवून देण्याचे प्रकार केले, त्याचबरोबर प्रतिस्पर्धी गटावर चाल करून जाण्याचे प्रकारही घडले होते. त्यामुळे पोलिसांना लाठीमार, अश्रुधूराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या तर पाडळी येथे जमाव काबूत आणण्यासाठी गोळीबाराच्या फैरीही झाडाव्या लागल्या. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊनच विल्होळी, वाडीवऱ्हे, गोंदे, सांजेगाव, शेवगेडांग, महिरावणी, अंजनेरी, तळेगाव, तळवाडे या गावांमध्ये सलग ७२ तास संचारबंदी जारी करण्यात आली होती. या काळात कोणतीही अनुचित घटना घडली नसली तरी, खबरदारी म्हणून शुक्रवारी मुदत संपल्यानंतरही पोलीस व प्रशासनाने संचारबंदीत पुन्हा चोवीस तासांनी वाढ केली होती. त्याची मुदत शनिवारी दुपारी बारा वाजता संपल्याने नागरिकांचे दैनंदिन व्यवहार पूर्ववत सुरू झाले, परंतु वातावरणात तणाव कायम असल्याने परिस्थितीवर पूर्णत: नियंत्रण मिळविता आले नाही. समाजकंटकांकडून शनिवारी रात्री पुन्हा संचारबंदी शिथिलतेचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता वर्तवून पोलीस खात्याने शनिवारी सायंकाळी सहा ते रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत अशा बारा तासांसाठी पुन्हा वाडीवऱ्हे, गोंदे, सांजेगाव, महिरावणी, अंजनेरी, तळेगाव व तळवाडे या सहा गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. रविवारी परिस्थिती पाहून संचारबंदी वाढविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व नाशिक तालुक्यातील गावांमधील जनजीवन आता पूर्वपदावर येत असून पोलिसांकडून दंगलखोरांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे काम सुरूच आहे. ग्रामीण पोलिसांनी शनिवारी (दि़ १४) वाडीवऱ्हे, घोटी, गोंदे, तळेगाव-अंजनेरी, शेवगेदारणा या परिसरातून ८२ संशयित दंगलखोरांना अटक केली होती, त्यामध्ये आज आणखी संशयितांची भर पडली असून, १४७ दंगलखोरांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांकडून दंगलखोरांचा शोध सुरू आहे़